मुख्यमंत्र्यांनी दिली नव्या वाहतूक पर्यायांची जंत्री
म. टा. विशेष प्रतिनिधी
मुंबईतील रेल्वे असो किंवा बस वाहतूक व्यवस्थेत नागरिकांचे हाल होत आहेत. त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. परंतु आमचे सरकार येताच २० महिन्यांत मुंबईच्या विकासाचे अनेक निर्णय घेतले आहेत. मुंबईचा चेहरा-मोहरा बदलण्याची ब्ल्यू प्रिंट तयार आहे, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी केली.
मुंबई भाजपच्या षण्मुखानंद सभागृहात आयोजित केलेल्या मेळाव्यात मुख्यमंत्री फडणवीस यांनी मुंबईच्या विकासाचा लेखाजोखा मांडला. मुंबईकरांचे निम्मे आयुष्य आजही म्हाडाच्या संक्रमण शिबिरात काढावे लागत आहे. त्यांना चांगेल घर मिळावे, यासाठी सरकारने योजना आणली आहे. मागील काँग्रेस राष्ट्रवादी आघाडी सरकारच्या १५ वर्षांत जी कामे झाली नाहीत, त्यापेक्षा जास्त विकासाची कामे केवळ २० महिन्यांत झाली आहेत. मुंबईत मेट्रोचे जाळे विणले जाणार आहे. मुंबईत १६० किमी अंतराच्या मेट्रो मार्गाचे प्रकल्प प्रस्थापित आहेत. परंतु गेल्या १५ वर्षांत केवळ आठ किमीचेच मेट्रोचा मार्ग पूर्ण झाला. पण आमचे सरकार आता १५२ किमीचा मेट्रो मार्ग पूर्ण पुढील चार वर्षांत पूर्ण करेल, त्याच्या सर्व परवानग्या देण्यात येऊन आता निविदाही निघाल्या आहेत, अशी ग्वाही त्यांनी दिली.
एलिव्हेटेडचा डीपीआर लवकरच
उपनगरी रेल्वे प्रवाशांचा प्रवास सुसह्य करण्यासाठी एलिव्हेटेड रेल्वेचा प्रस्ताव रेल्वे आणि राज्य सरकार यांनी तयार केला आहे. १५ ऑगस्टपर्यंत या मार्गाचा डीपीआर तयार होईल. एलिव्हेटेड रेल्वे मार्ग झाला तर उपनगरीय रेल्वेची प्रवासी वाहतूक करण्याची क्षमता दुप्पट होईल, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले. यापुढे रेल्वे, बस या वाहतूकीसाठी एकच तयार असेल. बसस्टॉपवर उभे असतानाच प्रवाशांना मोबाईलवर कळेल, की बस आता किती अंतरावर आहे, त्यात किती गर्दी आहे. ट्रान्सहार्बर, कोस्टल रोड, नवी मुंबई विमानतळ, मेट्रो यासाठी लागणाऱ्या परवानग्या केंद्र सरकारने तातडीने दिल्या. त्या परवानग्या काँग्रेसच्या राज्यात १५ वर्षे मिळाल्या नव्हत्या, असा टोला मुख्यमंत्र्यांनी हाणला. मुंबईचा चेहरामोहरा हा सामान्य मुंबईकरांसाठी बदलायचा आहे. गरीब हा या विकासाचा केंद्र बिंदू आहे. धारावी पुनर्विकास प्रकल्प लवकर मार्गी लागेल, अशी ग्वाही त्यांनी दिली.
कोस्टल रोड आवश्यकच
पश्चिम द्रुतगती मार्गावरून मुंबईतील ६० टक्के वाहतूक होते व हे चित्र बदलायचे असल्यास कोस्टल रोड करावाच लागेल, हे मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सांगितले. तेव्हा त्यांनी तातडीने कोस्टल रोडच्या परवानग्या दिल्या. या रोडमुळे सामान्य मुंबईकरांचा प्रवास सुसह्य होईल, असे मुख्यमंत्री म्हणाले.
म. टा. विशेष प्रतिनिधी
मुंबईतील रेल्वे असो किंवा बस वाहतूक व्यवस्थेत नागरिकांचे हाल होत आहेत. त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. परंतु आमचे सरकार येताच २० महिन्यांत मुंबईच्या विकासाचे अनेक निर्णय घेतले आहेत. मुंबईचा चेहरा-मोहरा बदलण्याची ब्ल्यू प्रिंट तयार आहे, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी केली.
मुंबई भाजपच्या षण्मुखानंद सभागृहात आयोजित केलेल्या मेळाव्यात मुख्यमंत्री फडणवीस यांनी मुंबईच्या विकासाचा लेखाजोखा मांडला. मुंबईकरांचे निम्मे आयुष्य आजही म्हाडाच्या संक्रमण शिबिरात काढावे लागत आहे. त्यांना चांगेल घर मिळावे, यासाठी सरकारने योजना आणली आहे. मागील काँग्रेस राष्ट्रवादी आघाडी सरकारच्या १५ वर्षांत जी कामे झाली नाहीत, त्यापेक्षा जास्त विकासाची कामे केवळ २० महिन्यांत झाली आहेत. मुंबईत मेट्रोचे जाळे विणले जाणार आहे. मुंबईत १६० किमी अंतराच्या मेट्रो मार्गाचे प्रकल्प प्रस्थापित आहेत. परंतु गेल्या १५ वर्षांत केवळ आठ किमीचेच मेट्रोचा मार्ग पूर्ण झाला. पण आमचे सरकार आता १५२ किमीचा मेट्रो मार्ग पूर्ण पुढील चार वर्षांत पूर्ण करेल, त्याच्या सर्व परवानग्या देण्यात येऊन आता निविदाही निघाल्या आहेत, अशी ग्वाही त्यांनी दिली.
एलिव्हेटेडचा डीपीआर लवकरच
उपनगरी रेल्वे प्रवाशांचा प्रवास सुसह्य करण्यासाठी एलिव्हेटेड रेल्वेचा प्रस्ताव रेल्वे आणि राज्य सरकार यांनी तयार केला आहे. १५ ऑगस्टपर्यंत या मार्गाचा डीपीआर तयार होईल. एलिव्हेटेड रेल्वे मार्ग झाला तर उपनगरीय रेल्वेची प्रवासी वाहतूक करण्याची क्षमता दुप्पट होईल, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले. यापुढे रेल्वे, बस या वाहतूकीसाठी एकच तयार असेल. बसस्टॉपवर उभे असतानाच प्रवाशांना मोबाईलवर कळेल, की बस आता किती अंतरावर आहे, त्यात किती गर्दी आहे. ट्रान्सहार्बर, कोस्टल रोड, नवी मुंबई विमानतळ, मेट्रो यासाठी लागणाऱ्या परवानग्या केंद्र सरकारने तातडीने दिल्या. त्या परवानग्या काँग्रेसच्या राज्यात १५ वर्षे मिळाल्या नव्हत्या, असा टोला मुख्यमंत्र्यांनी हाणला. मुंबईचा चेहरामोहरा हा सामान्य मुंबईकरांसाठी बदलायचा आहे. गरीब हा या विकासाचा केंद्र बिंदू आहे. धारावी पुनर्विकास प्रकल्प लवकर मार्गी लागेल, अशी ग्वाही त्यांनी दिली.
कोस्टल रोड आवश्यकच
पश्चिम द्रुतगती मार्गावरून मुंबईतील ६० टक्के वाहतूक होते व हे चित्र बदलायचे असल्यास कोस्टल रोड करावाच लागेल, हे मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सांगितले. तेव्हा त्यांनी तातडीने कोस्टल रोडच्या परवानग्या दिल्या. या रोडमुळे सामान्य मुंबईकरांचा प्रवास सुसह्य होईल, असे मुख्यमंत्री म्हणाले.