मटा ऑनलाइन वृत्त । मुंबई
जम्मू-काश्मीरमधील दहशतवादी हल्ल्यात मृत पावलेल्या महाराष्ट्रातील दोन अमरनाथ यात्रेकरूंच्या वारसांना राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी १० लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे.
सोमवारी रात्री अनंतनाग येथे अमरनाथ यात्रेकरूंच्या बसवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात ७ भाविकांना प्राण गमवावे लागले. यातील दोन महिला भाविक डहाणू येथील असल्याचे आज स्पष्ट झाले आहे. उषा मोहन सोनकर आणि निर्मला भारत ठाकूर अशी या दोन महिलांची नावे आहेत. या दोन्ही महिलांच्या वारसांना मुख्यमंत्र्यांनी आज १० लाखांच्या मदतीची घोषणा केली.
या दोन्ही भाविक महिलांचे मृतदेह जम्मू-काश्मीरमधून सूरतपर्यंत आणले जाणार आहेत. तिथून हेलिकॉप्टरने हे मृतदेह डहाणूला आणण्याची व्यवस्था राज्य सरकारने केली आहे, असेही मुख्यमंत्र्यांनी नमूद केले. डहाणूतील आणखी तीन भाविक जखमी आहेत. त्यांच्यावर काश्मीरमध्येच उपचार सुरू आहेत. त्याअनुशंगाने आम्ही सतत तेथील राज्य सरकारच्या संपर्कात आहोत, असेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.
मुख्यमंत्र्यांनी या हल्ल्याचा तीव्र शब्दांत निषेध केला. 'मी या भ्याड हल्ल्याचा निषेध करतो. अशा निरपराधांना मारून दहशतवादी कोणतीही लढाई जिंकू शकणार नाहीत. भारत सरकार या हल्ल्याचा योग्य ते प्रत्युत्तर देईलच, असे मुख्यमंत्री म्हणाले.
सलीमला ३ लाखांचं बक्षीस
जम्मू-काश्मीर राज्य सरकारने ५० भाविकांचे प्राण वाचवणारा बसचालक सलीम शेखला रोख ३ लाख रुपयांचं बक्षीस दिलं आहे. अमरनाथ यात्रेकरूंच्या ज्या बसवर हल्ला झाला ती बस सलीम चालवत होता. दहशतवादी अंदाधुंद गोळीबार करत असतानाही सलीम डगमगला नाही. मोठं धाडस दाखवत त्याने बस पुढे नेली. सुरक्षित स्थळी बस जाईपर्यंत त्याने मागे वळून पाहिले नाही. त्याने दाखवलेल्या या शौर्याचाच राज्य सरकारने रोख बक्षीस देऊन सन्मान केला आहे.
जम्मू-काश्मीरमधील दहशतवादी हल्ल्यात मृत पावलेल्या महाराष्ट्रातील दोन अमरनाथ यात्रेकरूंच्या वारसांना राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी १० लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे.
सोमवारी रात्री अनंतनाग येथे अमरनाथ यात्रेकरूंच्या बसवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात ७ भाविकांना प्राण गमवावे लागले. यातील दोन महिला भाविक डहाणू येथील असल्याचे आज स्पष्ट झाले आहे. उषा मोहन सोनकर आणि निर्मला भारत ठाकूर अशी या दोन महिलांची नावे आहेत. या दोन्ही महिलांच्या वारसांना मुख्यमंत्र्यांनी आज १० लाखांच्या मदतीची घोषणा केली.
या दोन्ही भाविक महिलांचे मृतदेह जम्मू-काश्मीरमधून सूरतपर्यंत आणले जाणार आहेत. तिथून हेलिकॉप्टरने हे मृतदेह डहाणूला आणण्याची व्यवस्था राज्य सरकारने केली आहे, असेही मुख्यमंत्र्यांनी नमूद केले. डहाणूतील आणखी तीन भाविक जखमी आहेत. त्यांच्यावर काश्मीरमध्येच उपचार सुरू आहेत. त्याअनुशंगाने आम्ही सतत तेथील राज्य सरकारच्या संपर्कात आहोत, असेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.
मुख्यमंत्र्यांनी या हल्ल्याचा तीव्र शब्दांत निषेध केला. 'मी या भ्याड हल्ल्याचा निषेध करतो. अशा निरपराधांना मारून दहशतवादी कोणतीही लढाई जिंकू शकणार नाहीत. भारत सरकार या हल्ल्याचा योग्य ते प्रत्युत्तर देईलच, असे मुख्यमंत्री म्हणाले.
सलीमला ३ लाखांचं बक्षीस
जम्मू-काश्मीर राज्य सरकारने ५० भाविकांचे प्राण वाचवणारा बसचालक सलीम शेखला रोख ३ लाख रुपयांचं बक्षीस दिलं आहे. अमरनाथ यात्रेकरूंच्या ज्या बसवर हल्ला झाला ती बस सलीम चालवत होता. दहशतवादी अंदाधुंद गोळीबार करत असतानाही सलीम डगमगला नाही. मोठं धाडस दाखवत त्याने बस पुढे नेली. सुरक्षित स्थळी बस जाईपर्यंत त्याने मागे वळून पाहिले नाही. त्याने दाखवलेल्या या शौर्याचाच राज्य सरकारने रोख बक्षीस देऊन सन्मान केला आहे.