अ‍ॅपशहर

करोनाबाधित मृत्यूंची ४८ तासांत माहिती देणे बंधनकारक

करोनामुळे मृत्यू झालेल्या रूग्णांची माहिती महापालिकेला ४८ तासांच्या आत कळविणे बंधनकारक असल्याचे आदेश ८ जून रोजी रूग्णालयांना देण्यात आले होते. मात्र या आदेशाची काटेकोर अंमलबजावणी होत नसल्याने प्रशासनाने शेवटची संधी दिली असून त्याचे पालन न करणार्यावर कठोर कारवाई केली जाणार आहे.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 18 Jun 2020, 10:24 pm
म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबईः करोनामुळे मृत्यू झालेल्या रूग्णांची माहिती महापालिकेला ४८ तासांच्या आत कळविणे बंधनकारक असल्याचे आदेश ८ जून रोजी रूग्णालयांना देण्यात आले होते. मात्र या आदेशाची काटेकोर अंमलबजावणी होत नसल्याने प्रशासनाने शेवटची संधी दिली असून त्याचे पालन न करणार्यावर कठोर कारवाई केली जाणार आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम coronavirus report


ज्या रूग्णालयांनी रुग्णांच्या मृत्यूची माहिती निर्धारित वेळेत कळविली नसल्यास त्यांना ही शेवटची संधी देण्यात येत आहे. माहिती प्रलंबित असल्यास त्यांनी ती ४८ तासात पालिकेकडे कळवावयाची आहे. न कळविल्यास अशा रुग्णालयांवर 'साथरोग नियंत्रण कायदा १८९७' अन्वये कठोर कारवाई करण्यात येणार आहे, असे पालिकेने स्पष्ट केले आहे.

वाचाः राज्यात १०० करोनाबाधितांचा मृत्यू; मुंबईत ६७ तर, भिवंडीत २७ रुग्ण दगावले

दरम्यान, आज महाराष्ट्रात करोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या १ लाख २० हजार ५०४वर पोहचली आहे. चिंता वाढवणारी बाब म्हणजे शहरांबरोबरच ग्रामीण भागात करोनाचा प्रसार वाढतो आहे. मुंबईत आज १०० रुग्ण करोनानं दगावले आहेत तर भिवंडीत एकूण २७ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर, राज्यात आज ३ हजार ७५२ नवीन रुग्ण आढळले आहेत.

वाचाः करोनाच्या लढ्याला आता डिजीटल बळ; BMCनं सुरू केलं हे अॅप

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज