अ‍ॅपशहर

काँग्रेसशी चर्चा करूनच निर्णय घेऊ: नवाब मलिक

तीन पक्ष एकत्र आल्याशिवाय राज्यात सरकार स्थापन करता येणार नाही. त्यामुळे काँग्रेससोबत चर्चा करूनच पुढील निर्णय घेण्यात येईल, असं राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी स्पष्ट केलं.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 12 Nov 2019, 4:33 pm

राज्यात राष्ट्रपती राजवटीची शिफारस; केंद्राचीही मंजुरी

मुंबई: तीन पक्ष एकत्र आल्याशिवाय राज्यात सरकार स्थापन करता येणार नाही. त्यामुळे काँग्रेससोबत चर्चा करूनच पुढील निर्णय घेण्यात येईल, असं राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी स्पष्ट केलं.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम malik


यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रवादीच्या आमदारांची बैठक पार पडली. या बैठकीनंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना नवाब मलिक यांनी हे वक्तव्य केलं. या राज्यात अस्थिरता निर्माण झाली आहे. त्यामुळे राज्यात लवकरात लवकर पर्यायी सरकार निर्माण करण्याचा ठराव करण्यात आला. राष्ट्रवादीला राज्यपालांनी सत्ता स्थापनेला निमंत्रण दिले असल्याचे कालच आम्ही सांगितले होते. त्याच पार्श्वभूमीवर दिल्लीतून काँग्रेसचे नेते अहमद पटेल, मल्लिकार्जुन खर्गे आणि के. सी. वेणुगोपाल हे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासोबत चर्चा करण्यासाठी मुंबईत येत आहेत, असं मलिक म्हणाले. तीन पक्ष एकत्र आल्याशिवाय सरकार निर्माण होऊ शकत नाही. मात्र काँग्रेसची भूमिका यासाठी महत्वाची आहे, असेही ते म्हणाले.


राष्ट्रवादीचे विधिमंडळ गट नेते अजित पवार आणि प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी यावेळी बैठकीला उपस्थित असलेल्या आमदारांना मार्गदर्शन केले. राष्ट्रवादीच्या सर्व आमदारांनी सत्ता स्थापनेसंदर्भात निर्णय घेण्याचे सर्व अधिकार शरद पवार यांच्याकडे सुपूर्द केले असल्याचे मलिक यांनी सांगितले. दरम्यान, काँग्रेसने अद्यापही कोणताही निर्णय घेतला नसल्याने राष्ट्रवादीनेही त्यांची भूमिका जाहीर केलेली नाही.

राज्यपालांच्या निर्णयाविरुद्ध सेना सुप्रीम कोर्टात

राज्यात विधानसभा निवडणुकीचे निकाल लागले असून भाजपला सर्वाधिक १०५ जागा जिंकता आल्या आहेत. तर शिवसेनेला ५६ जागा मिळाल्या आहेत. राष्ट्रवादीने या निवडणुकीत ५४ आणि काँग्रेसने ४४ जागा जिंकल्या आहेत. बहुजन विकास आघाडीला ३, एमआयएमला, समाजवादी पार्टीला आणि प्रहार जनशक्ती पार्टीला प्रत्येकी दोन जागा मिळाल्या आहेत. त्याशिवाय माकप, जनसुराज्य शक्ती, क्रांतिकारी शेतकरी पार्टी, शेकाप, मनसे, रासपला प्रत्येकी एका जागेवर विजय मिळविता आला आहे. या निवडणुकीत एकूण १३ अपक्षही निवडून आले आहेत.


राष्ट्रपती राजवट लागू झाली तरीही सेनेला संधी

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज