अ‍ॅपशहर

राज्यावर करोना संकट; मुख्य सचिवांना ३ महिने मुदतवाढ

राज्यात करोनाचं संकट आणखी गहिरं होत चाललं आहे. अशा परिस्थितीत अनुभवाचा उपयोग व्हावा यासाठी राज्याचे मुख्य सचिव अजोय मेहता यांना तीन महिन्यांची मुदतवाढ देण्यात आली आहे.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 28 Mar 2020, 6:32 pm
मुंबई: राज्यावर करोनाचं संकट आहे. या आरोग्य आणीबाणीच्या काळात विशेष बाब म्हणून राज्याचे मुख्य सचिव अजोय मेहता यांना आणखी तीन महिने मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यांना याआधीही सहा महिन्यांची मुदतवाढ दिली होती.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम ajoy mehta


देशात करोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. राज्यातील करोनाबाधितांचा आकडा दिवसागणिक वाढत आहे. अशा परिस्थितीत विशेष बाब म्हणून राज्याचे मुख्य सचिव यांना आणखी तीन महिने मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यांचा कार्यकाळ वाढवण्यात यावा, अशी विनंती महाराष्ट्र सरकारनं केंद्राकडे केली होती. त्यांना यापूर्वी सहा महिन्यांची मुदतवाढ देण्यात आली होती आणि ३१ मार्च रोजी त्यांचा कार्यकाळ संपणार होता. मात्र, राज्यातील आरोग्य आणीबाणीच्या परिस्थितीत त्यांचा अनुभव कामास येईल म्हणून, विशेष बाब म्हणून त्यांना तीन महिने मुदतवाढ देण्यात येत असल्याचं केंद्र सरकारनं महाराष्ट्र सरकारला पाठवलेल्या पत्रात नमूद केलं आहे. दरम्यान, राज्यात २१ दिवसांचा लॉकडाऊन घोषित केला आहे. करोनाचं संकट आणखी गहिरं होत चाललं आहे. अशा परिस्थितीत करोनाशी लढा देण्यासाठी राज्य सरकारसोबत अजोय मेहता यांच्या अनुभवाची गरज आहे. त्यामुळंच त्यांना ही मुदतवाढ देण्यात आली आहे, असं बोललं जात आहे.

करोनासंकट: मोदींचे जनतेला आर्थिक मदतीचे आवाहन

चिमुकलीचा मृत्यू; खांद्यावरून स्मशानात नेले

'हातावर शिक्का असताना फिरणाऱ्यांना पोलिसांत द्या'

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज