अ‍ॅपशहर

सत्तास्थापनेचा पेच: शरद पवार-उद्धव ठाकरेंची फोनवर चर्चा

राज्यातील सत्तास्थापनेचा पेच अद्याप सुटलेला नाही. भाजप आणि शिवसेनेनंतर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी तिसरा सर्वात मोठा पक्ष राष्ट्रवादी काँग्रेसला सत्तास्थापनेचं आमंत्रण दिलं असून या सगळ्या घडामोडींनंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी फोनवरून चर्चा केली.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 12 Nov 2019, 3:46 pm
मुंबई : राज्यातील सत्तास्थापनेचा पेच अद्याप सुटलेला नाही. भाजप आणि शिवसेनेनंतर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी तिसरा सर्वात मोठा पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसला सत्तास्थापनेचं आमंत्रण दिलं असून या सगळ्या घडामोडींनंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी सोमवारी रात्री उशिरा फोनवरून चर्चा केली.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम sharadpawar-uddhavthackeray


शरद पवार यांनी राज्यपालांकडून सत्तास्थापनेसाठी राष्ट्रवादीला मिळालेल्या आमंत्रणाबाबत उद्धव यांना कल्पना दिली व राज्यात सत्तास्थापना कशी करता येईल व त्याचे स्वरूप कसे असेल, याबाबत चर्चा केली. सरकार स्थापनेसाठी शिवसेनेला साथ देण्यास राष्ट्रवादीची तयारी आहे. त्यादृष्टीने आम्ही काँग्रेसच्या आमदारांच्याही संपर्कात आहोत, असे पवार यांनी उद्धव यांना आश्वस्त केल्याचेही सांगण्यात आले.

आता राष्ट्रवादीला सत्तास्थापनेचं आमंत्रण

उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांची फोनवर चर्चा झाल्याच्या माहितीला राष्ट्रवादी काँग्रेसचे विधिमंडळ पक्षनेते अजित पवार यांनी दुजोरा दिला. शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे तिन्ही पक्ष एकत्र आल्यानंतरच सरकार स्थापन करता येऊ शकतं. यासाठी निश्चितच काही वेळ लागणार आहे. आमच्या हातात २४ तास आहेत. काँग्रेसच्या नेत्यांसोबत आम्ही चर्चा करणार आहोत. काँग्रेससोबतच्या बैठकीत राज्यपालांच्या आमंत्रणावर सखोल चर्चा करण्यात येईल. राज्यात सरकार स्थापन व्हावं, यासाठी पुढे काय करता येईल, यावर विचारमंथन केलं जाईल. या चर्चेनंतर शिवसेनेसोबत पुढील चर्चा होईल व अंतिम निर्णय होईल, अशी माहिती अजित पवार यांनी दिली.

सेनेची संधी हुकली; राज्यात राष्ट्रपती राजवट?

काँग्रेस आघाडीच्या बैठकीला उद्धव ठाकरे उपस्थित राहणार असल्याच्या बातम्या होत्या. मात्र, तशी शक्यता अजित पवार यांनी नाकारली. काँग्रेस व राष्ट्रवादीची निवडणूकपूर्व आघाडी आहे. दोन्ही पक्षांत एकमत झाल्यावर त्याबाबत शिवसेनेला कळवलं जाईल, असे अजित पवार यांनी स्पष्ट केले.

उद्धव ठाकरेंनी घेतली शरद पवारांची भेट

असं आहे पक्षीय बलाबल

भाजप- १०५
शिवसेना - ५६
राष्ट्रवादी काँग्रेस- ५४
काँग्रेस- ४४
बहुजन विकास आघाडी- ३
एमआयएम- २
समाजवादी पार्टी- २
प्रहार जनशक्ती पार्टी- २
माकप- १
जनसुराज्य शक्ती- १
क्रांतिकारी शेतकरी पार्टी- १
महाराष्ट्र नवनिर्माण सेना- १
राष्ट्रीय समाज पक्ष- १
स्वाभिमानी पक्ष- १
शेकाप - १
अपक्ष- १३
एकूण जागा- २८८

काँग्रेसचा सेना सरकारला बाहेरून पाठिंबा: सूत्र

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज