म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई: महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा कार्यकाल पूर्ण झालेल्या राज्यपाल सी. विद्यासागर राव यांना मंगळवारी शासनातर्फे राजभवन येथे निरोप देण्यात आला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राव यांना शाल व पुष्पगुच्छ देऊन निरोप दिला. राज्यपाल म्हणून त्यांनी केलेल्या कार्याबद्दल आभार मानले. राज्यपालांच्या पत्नी विनोदा यांना देखील यावेळी उपस्थित होत्या.
यावेळी राज्यपालांना भारतीय नौदलातर्फे मानवंदना देण्यात आली. राव यांनी आपल्या राज्यपालपदाच्या कारकिर्दीत काम करताना मुख्यमंत्री फडणवीस, सर्व मंत्रिमंडळ सदस्य आणि राज्यातील जनतेने दिलेल्या सहकार्याबद्दल आभार मानले. कार्यक्रमानंतर लगेचच राज्यपाल सपत्नीक हैदराबादकडे रवाना झाले.
नव्या राज्यपालांचा शपथविधी गुरुवारी
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल म्हणून निवड झालेले भगतसिंह कोश्यारी यांचा शपथविधी गुरुवार दिनांक ५ सप्टेंबर २०१९ रोजी संध्याकाळी ६ वाजता राजभवन येथे होणार आहे.
यावेळी राज्यपालांना भारतीय नौदलातर्फे मानवंदना देण्यात आली. राव यांनी आपल्या राज्यपालपदाच्या कारकिर्दीत काम करताना मुख्यमंत्री फडणवीस, सर्व मंत्रिमंडळ सदस्य आणि राज्यातील जनतेने दिलेल्या सहकार्याबद्दल आभार मानले. कार्यक्रमानंतर लगेचच राज्यपाल सपत्नीक हैदराबादकडे रवाना झाले.
नव्या राज्यपालांचा शपथविधी गुरुवारी
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल म्हणून निवड झालेले भगतसिंह कोश्यारी यांचा शपथविधी गुरुवार दिनांक ५ सप्टेंबर २०१९ रोजी संध्याकाळी ६ वाजता राजभवन येथे होणार आहे.