अ‍ॅपशहर

एसटी बसने मोफत गावी जायचंय; 'या' आहेत अटी

राज्याच्या विविध भागांत अडकलेल्या नागरिकांना त्यांच्या घरी पोहचवण्यासाठी विशेष एसटी बसेस सोडण्यात येणार असून सोमवारपासून ही सेवा सुरू होईल. लॉकडाऊन संपेपर्यंतच ही सुविधा असेल, असे स्पष्ट करण्यात आले आहे.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 12 May 2020, 9:28 am
मुंबई: लॉकडाऊनमुळे राज्यात विविध ठिकाणी अडकलेले नागरिक तसेच विद्यार्थ्यांना त्यांच्या गावी परत जाण्यासाठी काही अटींवर एसटीतर्फे येत्या सोमवारपासून मोफत बस सेवा सुरू होणार आहे, असे नमूद करत परिवहन राज्यमंत्री सतेज पाटील यांनी या व्यवस्थेबाबतचा तपशील दिला आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम msrtc bus


औरंगाबाद अपघात: 'मानवी हक्क आयोगानं केंद्राला नोटीस बजावावी'

यातील महत्त्वाच्या बाबी:

१. सोशल डिस्टन्सिंग नियमानुसार प्रत्येक सीटवर एक प्रवासी असेल. अशाप्रकारे एका बसमध्ये साधारणपणे २१ ते २२ लोक बसू शकतील. त्यामुळे जर २१-२२ लोकांचा एक ग्रुप तयार झाला, तर त्या ग्रुपने आपल्या ग्रुप लिडरच्या नावासह, सर्वांची नावे, संपूर्ण पत्ता, जिथे जायचे आहे तेथील पत्ता, आधार कार्ड नंबर असा फॉर्म भरून शहरी भागामध्ये पोलीस आयुक्त कार्यालय व ग्रामीण भागामध्ये जिल्हाधिकारी/ तहसीलदारांकडे जमा करावा. ज्या जिल्ह्यामध्ये ते जाणार आहेत, त्या जिल्हाधिकाऱ्यांची परवानगी आल्यानंतर त्यांना एस.टी. कधी व कोठून जाणार आहे, याबद्दलची माहिती कळविण्यात येईल.

२. जे नागरिक वैयक्तिक जाऊ इच्छितात त्यांनी एस. टी. महामंडळाने तयार केलेल्या ऑनलाइन पोर्टलद्वारे नाव नोंदणी करायची आहे. हे पोर्टल सोमवारपासून चालू होईल. ऑनलाइन अर्ज करतेवेळी, आपण सध्या ज्या जिल्ह्यात वास्तव्य करत आहात, त्या जिल्ह्यातील जिल्हाधिकारी यांची परवानगी जोडणे आवश्यक आहे.

मजुरांसाठी जास्तीत जास्त रेल्वे सोडा; पवारांची रेल्वे मंत्र्यांकडे मागणी

३. या प्रवासादरम्यान, प्रवाशांनी मास्क घालणे, बसमध्ये चढतेवेळी हात सॅनिटायझरने स्वच्छ करणे बंधनकारक आहे. बस निघण्यापूर्वी व पोहचल्यानंतर सॅनिटाइज केली जाईल.

४. ज्या जिल्ह्यांमध्ये हे प्रवासी जाणार आहेत तिथे त्यांची तपासणी करून संस्थात्मक किंवा घरीच विलगीकरण करण्याचे अधिकारी त्या त्या नोडल अधिकारी यांच्याकडे असतील.

५. ही पॉइंट टू पॉइंट सेवा आहे. प्रवासात मध्येच कुठे प्रवासी उतरणार नाही किंवा चढणार नाहीत. लांब पल्याच्या गाड्या कुठेही जेवणासाठी थांबणार नाहीत, त्यामुळे आपले अन्नपाणी घरूनच घेऊन यावे, तसेच फक्त सॅनिटाइज केलेली महामंडळाचीच प्रसाधनगृहे वापरली जातील.

६. कंटेनमेंट झोनमधील नागरिकांना कोणतीही सुविधा उपलब्ध नाही.

ही सुविधा फक्त लॉकडाऊन संपेपर्यंतच असणार आहे. त्यामुळे योग्य माहिती भरून आपापल्या घरी परत जा, कृपया पोलीस कार्यालयांमध्ये, जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये, बस स्टॅन्ड किंवा रस्त्यावर गर्दी करू नये, असे आवाहन सतेज पाटील यांनी केले आहे.

गावी जाणाऱ्यांसाठी सोमवारपासून मोफत एसटी सेवा: अनिल परब

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज