अ‍ॅपशहर

'अटकच करायची असेल तर पर्याय नाही', मलिकांच्या अटकेनंतर भुजबळांची हताश प्रतिक्रिया

मलिकांच्या अटकेवर राष्ट्रवादीने तपास यंत्रणाच्या गैरवापराचा मुद्दा पुन्हा अधोरेकित केला आहे. दुसरीकडे याच ईडीच्या फेऱ्यातून गेलेले मंत्री छगन भुजबळ यांनी मात्र मलिकांच्या अटकेवर आक्रमक कमेंट करण्याऐवजी हताश कमेंट केली.

Authored byटीम मटा ऑनलाइन | Edited byटीम मटा ऑनलाइन | Maharashtra Times 23 Feb 2022, 5:22 pm
मुंबई : तब्बल आठ तासांच्या चौकशीनंतर राष्ट्रवादीचे नेते आणि महाराष्ट्राचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांनी ईडीने (Enforcement Directorate) अटक केली. मनी लॉन्ड्रिग प्रकरणात (Money Laundering Case) ईडीने त्यांना अटक केली आहे. अटकेनंतर जे जे रुग्णालयात त्यांचं मेडिकल चेकअप करण्यात आलं. आता त्यांना कोर्टासमोर हजर करण्यात आलं आहे. तत्पूर्वी मलिकांच्या अटकेनंतर राज्याच्या राजकीय वर्तुळातून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. भाजपने मलिकांनी मंत्रिपदाच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. तर राष्ट्रवादीने तपास यंत्रणाच्या गैरवापराचा मुद्दा पुन्हा अधोरेकित केला आहे. दुसरीकडे याच ईडीच्या फेऱ्यातून गेलेले मंत्री छगन भुजबळ यांनी मात्र मलिकांच्या अटकेवर आक्रमक कमेंट करण्याऐवजी हताश कमेंट केली. "२२ वर्षांपूर्वी कुठलीतरी जमीन खरेदी केली म्हणून त्यांना अटक केली जातीय. आता अटकच करायची असेल तर काहीही कारण देता येतं, त्याला पर्याय नाही", असं छगन भुजबळ म्हणाले.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम Nawab malik And Chhagan Bhujbal
नवाब मलिक आणि छगन भुजबळ


छगन भुजबळ काय म्हणाले?

"२२ वर्षांपूर्वी नवाब मलिक यांनी कुणाकडून तरी जमीन घेतली. हे प्रकरण आता काढलं जातंय. या प्रकरणाची नेमकी कल्पना नाही. मात्र काढायचंच झालं तर कुठलीही प्रकरणं काढता येतात. शेवटी अटकच करायची झाली तर कोणतंही कारण सांगून अटकेची कारवाई करता येते, असं भुजबळ म्हणाले.

केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर

"ज्या ज्या राज्यांमध्ये भाजपविरोधी सरकार आहे, त्या राज्यांमध्ये केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर होतोय हे लोकांच्या समोर आहे. ते मी नव्याने सांगण्याची गरज नाही", असा मुद्दाही भुजबळ यांनी अधोरेखित केला.

'जे काही चाललंय ते बरोबर नाही'

देशात जे काही वातावरण आहे ते बरोबर नाही. केंद्रीय यंत्रणांचा चुकीचा वापर लोकांच्या लक्षात आलाय. महाराष्ट्रातला हा सगळा प्रकार पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांना माहिती आहे की नाही याची कल्पना नाही. पण जे काही चाललंय ते बरोबर नाही, अशी हातात प्रत्येक प्रतिक्रिया भुजबळ यांनी दिली.

नेमकं प्रकरण काय?

अंमलबजावणी संचलनालय अर्थात ईडीने नवाब मलिक यांची आठ तास चौकशी केली. अंडरवर्ल्डशी संबंधित व्यक्तीकडून जमीन घेतल्याचा आरोप मलिक यांच्यावर आहे. इक्बाल कासकर या व्यक्तीने मलिक यांचं नाव घेतल्यानंतर मलिकांना चौकशीसाठी बोलवण्यात आलं होतं. आठ तासांच्या मॅरेथॉन चौकशीनंतर ईडीने मलिकांवर अटकेची कारवाई केली आहे. नवाब मलिक यांना अटक केल्यानंतर त्यांना जे जे रुग्णालयात मेडिकल चेकअपसाठी नेण्यात आलं आहे. रस्त्यात जागोजागी राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते आक्रमक झालेले पाहायला मिळत होते.

अटकेनंतर नवाब मलिक हसत हसत म्हणाले, 'झुकेंगे नहीं!'

तब्बल सात तासांच्या चौकशीनंतर नवाब मलिक ईडीच्या कार्यालयाबाहेर पडले. त्यावेळी नवाब मलिक यांच्या चेहऱ्यावर हसू होते. त्यांनी हात उंचावून राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना अभिवादन केले. तसंच प्रसिद्धीमाध्यमांना प्रतिक्रिया देताना झुकेंगे नहीं, असं म्हणत त्यांना आपले इरादे स्पष्ट केले.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज