अ‍ॅपशहर

निलंबनाविरोधात राज्यपालांकडे धाव

महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची तातडीने कर्जमाफी करावी आणि कर्जमाफीची मागणी रेटून धरणाऱ्या काँग्रेस-राष्ट्रवादीच्या १९ आमदारांचे निलंबन तातडीने मागे घ्यावे, या मागणीसाठी विरोधी पक्षांच्या शिष्टमंडळाने बुधवारी सायंकाळी राज्यपालांची भेट घेतली.

Maharashtra Times 22 Mar 2017, 7:50 pm
मटा ऑनलाइन वृत्त । मुंबई
महाराष्ट्र टाइम्स.कॉम maharashtra opposition leader meets governor over suspension of mlas
निलंबनाविरोधात राज्यपालांकडे धाव


महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची तातडीने कर्जमाफी करावी आणि कर्जमाफीची मागणी रेटून धरणाऱ्या काँग्रेस-राष्ट्रवादीच्या १९ आमदारांचे निलंबन तातडीने मागे घ्यावे, या मागणीसाठी विरोधी पक्षांच्या शिष्टमंडळाने बुधवारी सायंकाळी राज्यपालांची भेट घेतली.

विधिमंडळातील दोन्ही सभागृहाचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील व धनंजय मुंडे, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, विधानसभेचे माजी अध्यक्ष दिलीप वळसे पाटील, राष्ट्रवादीचे विधानसभेतील गटनेते जयंत पाटील, काँग्रेसचे विधान परिषदेतील गटनेते शरद रणपिसे, समाजवादी पक्षाचे नेते अबू आझमी, पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष प्रा. जोगेंद्र कवाडे आदी नेत्यांसह विरोधी पक्षाच्या सुमारे ६० आमदारांनी राज्यपालांची भेट घेऊन राज्यपालांकडे गाऱ्हाणं मांडलं.

राज्यपालांशी चर्चा करताना विखे पाटील यांनी विधानसभेमध्ये बुधवारी घडलेल्या घटनाक्रमाची माहिती दिली. सरकारने नियम बाजूला सारून निलंबनाचा ठराव मांडल्याचे त्यांनी राज्यपालांच्या निदर्शनास आणून दिले. जयंत पाटील यांनी सरकार सूडाचे राजकारण करत असल्याचा आरोप केला. यावेळी धनंजय मुंडे, प्रा. जोगेंद्र कवाडे आणि अबू आझमी यांनीही शेतकरी कर्जमाफीबाबत सरकारची दिरंगाई व आमदारांच्या अन्याय्य निलंबनाबाबत राज्यपालांना माहिती दिली. यासंदर्भात राज्यपालांनी तातडीने पावले उचलावीत, अशी आग्रही मागणी शिष्टमंडळाने केली.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज