मुंबई : शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी भाजपसोबत युतीसाठी प्रयत्न करण्याच्या सूचना दिल्याचा गौप्यस्फोट खासदार राहुल शेवाळे यांनी काही दिवसांपूर्वी केला होता. त्यानंतर उद्धव ठाकरेंनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना युतीसाठी फोन केल्याचं धक्कादायक वृत्त समोर आलं आहे. बंडखोर आमदार परत येणार नसल्याच्या शक्यतेमुळे उद्धव ठाकरे यांनी माजी मंत्री अनिल परब (Anil Parab) यांच्या मोबाईलवरुन फडणवीसांना फोन केला होता, असा दावा शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांनी केला आहे. "मी सगळी शिवसेना घेऊन तुमच्याकडे येतो, तुम्हीच मुख्यमंत्री व्हा, पण एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना सोडा" अशी ऑफर ठाकरेंनी फडणवीसांना दिल्याची माहिती समोर आली आहे. "उद्धव ठाकरे कधीही आपल्या मोबाईलवरुन फोन करत नाहीत. ते नेहमी अनिल परब यांच्या फोनवरुनच कॉल करतात. परबांचा फोन चेक करा, ही बातमी खरी असेल, तर मग आज भाजप का नको?" असं दीपक केसरकर यांनी म्हटल्याचं वृत्त 'सरकारनामा' वेबसाईटने दिलं आहे.
हेही वाचा : ठाकरेंच्या मर्जीतील अधिकाऱ्याची शिंदेंकडून उचलबांगडी, मनपा आयुक्तपदावरुन ४ महिन्यात हटवलं
एकनाथ शिंदे यांच्या शपथविधीआधी उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीसांना फोन केला होता, पण आता एकनाथ शिंदे यांनी भाजपसोबत सरकार स्थापन केलं आहे, त्यामुळे आता ती वेळ निघून गेली आहे, उशीर झाला" असं उत्तर भाजपकडून उद्धव ठाकरेंना देण्यात आल्याचंही बोललं जातं.
हेही वाचा : एकनाथ शिंदे ठाकरेंना मोठा धक्का देण्याच्या तयारीत, आणखी ३ खासदार फोडणार, तुमाने यांचा दावा
अनिल परब यांचा फोन तपासा, जर देवेंद्र फडणवीसांना फोन गेला असेल, तर हे संभाषण झालं असेल, असं मला वाटतं. उद्धव ठाकरे कधीच स्वतःच्या मोबाईलवरुन कॉल करत नाहीत. ते परबांच्या नंबरवरुनच फोन करतात. त्यांचा फोन चेक करा, आणि ही बातमी खरी असले तर मग आज भाजप का नको? असा सवालही केसरकरांनी विचारल्याचं वृत्त आहे.
हेही वाचा : मनसेला सोडले, भुजबळांना नडले, आता ठाकरेंना भिडले, तोडफोड आमदार सुहास कांदेंची कारकीर्द
हेही वाचा : ठाकरेंच्या मर्जीतील अधिकाऱ्याची शिंदेंकडून उचलबांगडी, मनपा आयुक्तपदावरुन ४ महिन्यात हटवलं
एकनाथ शिंदे यांच्या शपथविधीआधी उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीसांना फोन केला होता, पण आता एकनाथ शिंदे यांनी भाजपसोबत सरकार स्थापन केलं आहे, त्यामुळे आता ती वेळ निघून गेली आहे, उशीर झाला" असं उत्तर भाजपकडून उद्धव ठाकरेंना देण्यात आल्याचंही बोललं जातं.
हेही वाचा : एकनाथ शिंदे ठाकरेंना मोठा धक्का देण्याच्या तयारीत, आणखी ३ खासदार फोडणार, तुमाने यांचा दावा
अनिल परब यांचा फोन तपासा, जर देवेंद्र फडणवीसांना फोन गेला असेल, तर हे संभाषण झालं असेल, असं मला वाटतं. उद्धव ठाकरे कधीच स्वतःच्या मोबाईलवरुन कॉल करत नाहीत. ते परबांच्या नंबरवरुनच फोन करतात. त्यांचा फोन चेक करा, आणि ही बातमी खरी असले तर मग आज भाजप का नको? असा सवालही केसरकरांनी विचारल्याचं वृत्त आहे.
हेही वाचा : मनसेला सोडले, भुजबळांना नडले, आता ठाकरेंना भिडले, तोडफोड आमदार सुहास कांदेंची कारकीर्द