अ‍ॅपशहर

Weather Alert : महाराष्ट्रावर पुढचे ३-४ दिवस अस्मानी संकट, 'या' भागांना पावसाचा यलो अलर्ट

Maharashtra Weather Forecast : राज्यात सध्या अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस सुरू असून यामुळे नदी-नाले तुडूंब भरले आहेत. अशात धुळे आणि गोंदिया जिल्ह्यामध्ये पूरपरिस्थिती ओढावली आहे. अशात हवामान खात्याकडून पुन्हा एकदा महत्त्वाच्या शहरांना येलो अलर्ट दिला आहे.

Edited byरेणुका धायबर | महाराष्ट्र टाइम्स.कॉम 21 Sep 2022, 10:01 am
मुंबई : गणेशोत्सवानंतर जोर धरलेल्या मुसळधार पावसाने आता कुठे विश्रांती घेतल्याचं पाहायला मिळतं आहे. पण मुंबईसह ठाणे, अहमदनगर, जळगाव आणि कोल्हापूर या महत्त्वाच्या शहरांमध्ये हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस सुरू आहे. अशात अनेक भागांमध्ये ढगफुटीसदृश्य पाऊस झाला. यादरम्यान हवामान खात्याकडून पुन्हा एकदा मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम rain today in Marathwada


बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाचं क्षेत्र तयार झाल्यामुळे पुढच्या तीन-चार दिवसात विदर्भासह काही भागात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात ढगाळ वातावरणासह धुवांधार पाऊस होईल अशी शक्यता हवामान खात्याने वर्तवली. दरम्यान, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्रात पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे.



Monsoon 2022 Update: महाराष्ट्रात सुरू होणार मान्सूनचा परतीचा प्रवास, हवामान खात्याकडून 'या' जिल्ह्यांना इशारा
कोणत्या जिल्ह्यांमध्ये पावसाचा हाहाकार?

दरम्यान, धुळे शहरासह परिसरात गेल्या काही दिवसांपासून जोरदार पाऊस सुरू आहे. त्यामुळे शहरातील देवपूरासह अनेक भागांमध्ये पाणीच पाणी झाले आहे. धुळे शहरातील अनेक रस्ते पाण्याखाली गेले आहेत. तर देवपुरातील लाला सरदार हायस्कूल जवळ असलेल्या सुशीनाला काठावरील अनेक घरांमध्ये पाणी शिरले आहे. त्यामुळे मोठे नुकसान झाले आहे.

गोंदिया जिल्ह्यातही मंगळवारच्या रात्री ८ वाजल्यापासून पाऊस सुरू आहे. मुसळधार पावसामुळे जनजिवन विस्कळीत झाले असून लहानमोठ्या नाल्यांना पूर आला आहे. त्यातच गोंदिया शहरातील अनेक रस्त्यांवर पाणी साचल्याने ते घरात शिरल्याने मोठे नुकसान झाले.

पावसाचं रौद्ररुप! घरं पाण्याखाली, रस्त्यांना नदीचं स्वरुप, शहराला चारही बाजूला पाण्याचा वेढा; पाहा VIDEO
महाराष्ट्रात परतीचा पाऊस सुरू होणार...

हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्रात आठ ते दहा दिवसानंतर परतीचा पाऊस सुरू होण्याची शक्यता आहे. भारतात मोसमी पावसाच्या परतीचे वेध लागले आहेत. हवामान खात्याकडून पुढच्या एक-दोन दिवसांत राजस्थानसह उत्तर भारतामध्ये मोसमी पाऊस परतीचा प्रवास सुरू करेल अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे. जुलै महिन्यात सुरू झालेल्या पावसाने जुलैच्या दुसऱ्या आठवड्यात थैमान घातलं. अशात मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता आहे. अशात उर्वरित राज्यामध्ये ढगाळ हवामान राहील.
लेखकाबद्दल
रेणुका धायबर
रेणुका धायबर, महाराष्ट्र टाइम्समध्ये Senior Digital Content Producer आहेत. डिजिटल पत्रकारितेचा आठ वर्षांचा अनुभव आहे. २०१४ पासून पत्रकारीतेत आहेत. झी २४ तास , न्यूज १८ लोकमत, टीव्ही ९ अशा वेबसाइटसाठी त्यांनी काम केले आहे. महाराष्ट्र, राजकारण, गुन्हेगारी, देश, विदेश, स्पेशल बातम्या यासोबत व्यवसाय विषयात त्यांची आवड आहे.... आणखी वाचा

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज