म. टा. प्रतिनिधी, मुंबई
मुंबईकरांचा सच्चा आवाज, मराठी तरुणाईचे आवडते वृत्तपत्र, शिक्षण, रोजगार, मनोरंजन, माहिती-तंत्रज्ञान या क्षेत्रांची वाचकांना ताजी माहिती देणारे विश्वसनीय माध्यम ही ओळख 'महाराष्ट्र टाइम्स'ने कायम ठेवली असून, मुंबई आणि परिसरातील पहिल्या क्रमांकाचे मराठी दैनिक या गौरवावर पुन्हा शिक्कामोर्तब झाले आहे.
ताज्या 'इंडियन रीडरशिप सर्व्हे'नुसार मुंबई आणि वसई-विरार, ठाणे परिसर मिळून 'महाराष्ट्र टाइम्स' रोज वाचणाऱ्या वाचकांची संख्या सुमारे ७ लाख ४८ हजार इतकी आहे. मराठी भाषिकांची वस्ती सातत्याने वाढत असलेल्या ठाणे, बदलापूर, अंबरनाथ, तसेच नवी मुंबई पट्ट्यातही 'महाराष्ट्र टाइम्स'लाच मराठी वाचकांची सर्वाधिक पसंती असून तेथील रोजच्या वाचकांची संख्याही वाढती असल्याचे या सर्व्हेमध्ये दिसून आले आहे. इंडियन रिडरशिप सर्व्हेची आधीची पद्धत आमूलाग्र बदलली आहे. त्यामुळे सर्व्हेतील या आधीच्या वर्षांची रोजच्या वाचकांची आकडेवारी व आत्ताची रोजच्या वाचकांची आकडेवारी यांत तुलना करता येणार नाही.
वाहिन्या, इंटरनेट, फेसबुक यांच्या जमान्यातही छापील माध्यमांचा, तसेच भाषिक वृत्तपत्रांचा करिष्मा कायम असल्याचे या सर्व्हेतून सिद्ध झाले आहे. दर पाच वर्षांनी हा सर्व्हे केला जातो. त्यातून छापील माध्यमांमधील बदल, वाचकांचा पसंतिक्रम याची विश्वसनीय माहिती प्रसिद्ध केली जाते. या सर्व्हेनुसार छापील माध्यमांच्या वाचकांच्या संख्येतही लक्षणीय वाढ झालेली आहे.
गेली काही वर्षे महाराष्ट्राच्या राजधानीत - मुंबईत - मराठी वाचकांचे सर्वाधिक पसंतीचे वृत्तपत्र, तसेच एकमेव निष्पक्ष वृत्तपत्र म्हणून 'महाराष्ट्र टाइम्स'ने आपले स्थान टिकवून ठेवलेले आहे. हे स्थान अढळ असल्याचे ताज्या सर्व्हेतूनही दिसते. दुसऱ्या, तिसऱ्या क्रमांकावरील वृत्तपत्रांच्या रोजच्या वाचकांची संख्या आणि 'महाराष्ट्र टाइम्स'च्या रोजच्या वाचकांची संख्या यांतील मोठे अंतर कायम असून 'महाराष्ट्र टाइम्स'च्या रोजच्या वाचकांच्या संख्येत सातत्याने वाढ होत असल्याचेही दिसून आलेले आहे.
विश्वसनीय बातम्या, शहरांतील नागरिकांच्या समस्यांचा पाठपुरावा, सिटिझन रिपोर्टरसारखे कल्पक उपक्रम, तरुणांसाठी उपयुक्त अशा बातम्या, मनोरंजन क्षेत्राची वित्तंबातमी आणि आकर्षक छपाई यामुळे 'महाराष्ट्र टाइम्स'ने वाचकांचा विश्वास आणि लोभ राखण्यात यश मिळवले आहे, हे पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे.
मुंबईकरांचा सच्चा आवाज, मराठी तरुणाईचे आवडते वृत्तपत्र, शिक्षण, रोजगार, मनोरंजन, माहिती-तंत्रज्ञान या क्षेत्रांची वाचकांना ताजी माहिती देणारे विश्वसनीय माध्यम ही ओळख 'महाराष्ट्र टाइम्स'ने कायम ठेवली असून, मुंबई आणि परिसरातील पहिल्या क्रमांकाचे मराठी दैनिक या गौरवावर पुन्हा शिक्कामोर्तब झाले आहे.
ताज्या 'इंडियन रीडरशिप सर्व्हे'नुसार मुंबई आणि वसई-विरार, ठाणे परिसर मिळून 'महाराष्ट्र टाइम्स' रोज वाचणाऱ्या वाचकांची संख्या सुमारे ७ लाख ४८ हजार इतकी आहे. मराठी भाषिकांची वस्ती सातत्याने वाढत असलेल्या ठाणे, बदलापूर, अंबरनाथ, तसेच नवी मुंबई पट्ट्यातही 'महाराष्ट्र टाइम्स'लाच मराठी वाचकांची सर्वाधिक पसंती असून तेथील रोजच्या वाचकांची संख्याही वाढती असल्याचे या सर्व्हेमध्ये दिसून आले आहे. इंडियन रिडरशिप सर्व्हेची आधीची पद्धत आमूलाग्र बदलली आहे. त्यामुळे सर्व्हेतील या आधीच्या वर्षांची रोजच्या वाचकांची आकडेवारी व आत्ताची रोजच्या वाचकांची आकडेवारी यांत तुलना करता येणार नाही.
वाहिन्या, इंटरनेट, फेसबुक यांच्या जमान्यातही छापील माध्यमांचा, तसेच भाषिक वृत्तपत्रांचा करिष्मा कायम असल्याचे या सर्व्हेतून सिद्ध झाले आहे. दर पाच वर्षांनी हा सर्व्हे केला जातो. त्यातून छापील माध्यमांमधील बदल, वाचकांचा पसंतिक्रम याची विश्वसनीय माहिती प्रसिद्ध केली जाते. या सर्व्हेनुसार छापील माध्यमांच्या वाचकांच्या संख्येतही लक्षणीय वाढ झालेली आहे.
गेली काही वर्षे महाराष्ट्राच्या राजधानीत - मुंबईत - मराठी वाचकांचे सर्वाधिक पसंतीचे वृत्तपत्र, तसेच एकमेव निष्पक्ष वृत्तपत्र म्हणून 'महाराष्ट्र टाइम्स'ने आपले स्थान टिकवून ठेवलेले आहे. हे स्थान अढळ असल्याचे ताज्या सर्व्हेतूनही दिसते. दुसऱ्या, तिसऱ्या क्रमांकावरील वृत्तपत्रांच्या रोजच्या वाचकांची संख्या आणि 'महाराष्ट्र टाइम्स'च्या रोजच्या वाचकांची संख्या यांतील मोठे अंतर कायम असून 'महाराष्ट्र टाइम्स'च्या रोजच्या वाचकांच्या संख्येत सातत्याने वाढ होत असल्याचेही दिसून आलेले आहे.
विश्वसनीय बातम्या, शहरांतील नागरिकांच्या समस्यांचा पाठपुरावा, सिटिझन रिपोर्टरसारखे कल्पक उपक्रम, तरुणांसाठी उपयुक्त अशा बातम्या, मनोरंजन क्षेत्राची वित्तंबातमी आणि आकर्षक छपाई यामुळे 'महाराष्ट्र टाइम्स'ने वाचकांचा विश्वास आणि लोभ राखण्यात यश मिळवले आहे, हे पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे.