अ‍ॅपशहर

विधान परिषद निवडणूक: उद्धव ठाकरेंनी भरला उमेदवारी अर्ज, बिनविरोध निवड निश्चित

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज, विधान परिषदेच्या सदस्यत्वासाठी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यांची बिनविरोध निवड निश्चित आहे असं मानलं जात आहे. विधान परिषदेच्या नऊ जागांसाठी ही निवडणूक होत आहे.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 11 May 2020, 1:59 pm
मुंबई: उद्धव ठाकरे यांच्या मुख्यमंत्रिपदाच्या खुर्चीवरील संकट आता जवळपास दूर झालं आहे. ठाकरे यांनी आज, सोमवारी विधानपरिषद सदस्यत्वासाठी उमेदवारी अर्ज भरला. त्यामुळं आता त्यांची बिनविरोध निवड निश्चित मानली जात आहे. काँग्रेसनं एका जागेवर माघार घेतल्यानंतर विधान परिषदेच्या ९ जागांसाठी उमेदवारी अर्ज दाखल करणारे ठाकरे यांच्यासह नऊही उमेदवार बिनविरोध निवडून येतील, असं सांगितलं जात आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम CM Uddhav Thackeray


नव्या समीकरणानुसार, राज्यात विधान परिषदेच्या नऊ जागांसाठी भाजपने चार उमेदवार मैदानात उतरवले आहेत. तर शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रत्येकी दोन आणि काँग्रेसचा एक उमेदवार निवडणूक रिंगणात आहे. तत्पूर्वी, काँग्रेसच्या एका उमेदवारानं माघार घेतली. काँग्रेसनं दोन उमेदवारांच्या नावाची घोषणा केली होती. मात्र, त्यातील राज किशोर मोदी विधान परिषद निवडणुकीतून माघार घेत असल्याचं काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी काल सांगितलं. त्यामुळं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची बिनविरोध निवड निश्चित मानली जात आहे.

याआधी महाविकास आघाडीतील घटक पक्ष काँग्रेसनं शनिवारी विधान परिषदेच्या दोन जागांसाठी उमेदवारांची घोषणा केली होती. मात्र, त्यानंतर एका उमेदवारानं माघार घेतल्याची घोषणा थोरात यांनी काल केली. दरम्यान, विधान परिषदेच्या नऊ जागांसाठी २१ मे रोजी निवडणूक होणार आहे.

विधान परिषद निवडणूक: राष्ट्रवादीकडून शशिकांत शिंदे, मिटकरी यांना उमेदवारी

'या' अटीवर एकनाथ खडसेंना काँग्रेसकडून विधान परिषदेची ऑफर?

विधान परिषद निवडणूक: भाजपमध्ये नाराजी वाढली!

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज