मटा ऑनलाइन वृत्त । मुंबई
राज्यात पहिल्या टप्प्यातील १६४ नगर परिषदा व नगर पंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी मतदान सुरू झाले आहे. सदस्यपदांच्या तीन हजार ७०५ व थेट नगराध्यक्षपदांच्या १४७ जांगासाठी ही निवडणूक होत आहे. दरम्यान, उस्मानाबादमध्ये शिवसेना आणि काँग्रेस कार्यकर्ते भिडल्याने तणाव निर्माण झाला असून उर्वरित राज्यात शांततेत मतदान सुरू आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, उस्मानाबाद जिल्ह्यातील मुरूम शहरात शिवसेना आणि काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये जोरदार जुंपली आहे. मुरूम पोलीस ठाण्याजवळ दगडफेकीचाही प्रकार घडला असून त्यात काही पोलीस जखमी झाले आहेत. याप्रकरणी पोलिसांनी शिवसेनेच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवारासह २७ जणांना ताब्यात घेतलं आहे.
राज्यात अन्य ठिकाणी शांततेत मतदान सुरू आहे. अकोला, वाशीम, अमरावती, बुलडाणा, चंद्रपूर, वर्धा, जालना, परभणी, हिंगोली, यवतमाळ, कोल्हापूर, सोलापूर, सातारा, सांगली, नाशिक, अहमदनगर, नंदुरबार, जळगाव, बीड, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमधील नगरपरिषद, नगर पंचायतींमधील उमेदवारांचं भवितव्य ठरवणारी ही निवडणूक आहे.
ही निवडणूक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार, महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे, भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील, काँग्रेस नेते नारायण राणे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष सुनील तटकरे, विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे अशा सर्वच नेत्यांसाठी प्रतिष्ठेची बनली आहे. आपापल्या जिल्ह्यांतील वर्चस्व टिकवण्याचे आव्हान यानिमित्ताने सगळ्याच नेत्यांपुढे आहे.
राज्यात पहिल्या टप्प्यातील १६४ नगर परिषदा व नगर पंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी मतदान सुरू झाले आहे. सदस्यपदांच्या तीन हजार ७०५ व थेट नगराध्यक्षपदांच्या १४७ जांगासाठी ही निवडणूक होत आहे. दरम्यान, उस्मानाबादमध्ये शिवसेना आणि काँग्रेस कार्यकर्ते भिडल्याने तणाव निर्माण झाला असून उर्वरित राज्यात शांततेत मतदान सुरू आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, उस्मानाबाद जिल्ह्यातील मुरूम शहरात शिवसेना आणि काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये जोरदार जुंपली आहे. मुरूम पोलीस ठाण्याजवळ दगडफेकीचाही प्रकार घडला असून त्यात काही पोलीस जखमी झाले आहेत. याप्रकरणी पोलिसांनी शिवसेनेच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवारासह २७ जणांना ताब्यात घेतलं आहे.
राज्यात अन्य ठिकाणी शांततेत मतदान सुरू आहे. अकोला, वाशीम, अमरावती, बुलडाणा, चंद्रपूर, वर्धा, जालना, परभणी, हिंगोली, यवतमाळ, कोल्हापूर, सोलापूर, सातारा, सांगली, नाशिक, अहमदनगर, नंदुरबार, जळगाव, बीड, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमधील नगरपरिषद, नगर पंचायतींमधील उमेदवारांचं भवितव्य ठरवणारी ही निवडणूक आहे.
ही निवडणूक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार, महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे, भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील, काँग्रेस नेते नारायण राणे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष सुनील तटकरे, विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे अशा सर्वच नेत्यांसाठी प्रतिष्ठेची बनली आहे. आपापल्या जिल्ह्यांतील वर्चस्व टिकवण्याचे आव्हान यानिमित्ताने सगळ्याच नेत्यांपुढे आहे.