अ‍ॅपशहर

Maharashtra Weather : राज्याला या तारखेपर्यंत पावसाचा इशारा, मुंबई, पुण्यासह महत्त्वाच्या जिल्ह्यांना येलो-ऑरेंज अलर्ट

Maharashtra Rain News : राज्यात मुसळधार पावसाने अनेक जिल्ह्यांमध्ये पूर परिस्थिती ओढावली असताना आता पुन्हा एकदा हवामान खात्याकडून मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. यामुळे मच्छिमारांनाही समुद्रात न जाण्याचा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आला आहे.

Edited byरेणुका धायबर | महाराष्ट्र टाइम्स.कॉम 13 Aug 2022, 12:13 pm
मुंबई : आठवड्या भरापासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे बहुतांश जिल्ह्यांमध्ये पूर परिस्थिती ओढावली आहे. अशात हवामान खात्याकडून पढचे ३ दिवस मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. (Maharashtra Rain Alert) पुणे, सातारा, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या भागात येलो अलर्ट देण्यात आला असून समुद्राला उधाण आल्याने मच्छिमारांना समुद्रात न जाण्याचा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम maharashtra weather forecast


अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला असून १४ ऑगस्टपर्यंत राज्याच्या किनार पट्टीवर ताशी ४५ ते ६० किमी प्रती तास वेगाने वारे वाहणार आहेत असा अंदाज व्यक्त केला होता. त्यामुळे मच्छिमारांना समुद्रात न जाण्याचा इशारा देण्यात आला आहे. १४ ऑगस्टपर्यंत समुद्र खवळलेला राहणार असल्याने या कालावधीत मच्छिमारांनी मासेमारीसाठी समुद्रात जाऊ नये असा इशारा हवामान विभागाने दिला आहे.

सच्चा शिवसैनिकासाठी धावले एकनाथ शिंदे, तातडीने धाडली २ लाखांची मदत
१५ ऑगस्टपर्यंत कोणत्या जिल्ह्यांना येलो अलर्ट

हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, विदर्भातही काही जिल्ह्यात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. १५ ऑगस्टपर्यंत सातारा, पुणे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यात येलो अलर्ट असणार आहे. तर कोल्हापूर, सांगली या जिल्ह्यात तुरळक पावसाची शक्यता आहे. १३ आणि १४ ऑगस्ट रोजी विदर्भातही पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.



विदर्भाला दिलास पण या तारखेला मुसळधार

शनिवारी विदर्भाला कोणत्याही प्रकारचा इशारा नसून विदर्भवासियांना बऱ्यापैकी दिलासा मिळण्याची शक्यता आहे. परंतु, रविवार १४ ऑगस्टापासून मात्र विदर्भाला परत एकदा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. या काळात विदर्भातील नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीची तर इतर जिल्ह्यांमध्येसुद्धा दमदार पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.
लेखकाबद्दल
रेणुका धायबर
रेणुका धायबर, महाराष्ट्र टाइम्समध्ये Senior Digital Content Producer आहेत. डिजिटल पत्रकारितेचा आठ वर्षांचा अनुभव आहे. २०१४ पासून पत्रकारीतेत आहेत. झी २४ तास , न्यूज १८ लोकमत, टीव्ही ९ अशा वेबसाइटसाठी त्यांनी काम केले आहे. महाराष्ट्र, राजकारण, गुन्हेगारी, देश, विदेश, स्पेशल बातम्या यासोबत व्यवसाय विषयात त्यांची आवड आहे.... आणखी वाचा

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज