मटा ऑनलाइन वृत्त । मुंबई
महाराष्ट्र राज्य सरकारतर्फे घेण्यात येणारी महाराष्ट्राची एमएच-सीईटी ही परीक्षा ५ मे २०१६ रोजी ठरलेल्या वेळापत्रकानुसार घेतली जाणार आहे. या परीक्षेच्या तारखेमध्ये कोणताही बदल होणार नाही. ज्या विद्यार्थ्यांनी या परीक्षेची तयारी केलेली आहे, त्या विद्यार्थ्यांनी गोंधळून न जाता पूर्ण तयारीनिशी ही परीक्षा द्यावी, असे आवाहन वैद्यकीय शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी आज एका पत्रकार परिषदेत केले. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावर महाराष्ट्र सरकार सोमवारी फेरविचार याचिका दाखल करणार, असेही यावेळी तावडे यांनी सांगितले.
विविध वैद्यकीय अभ्यासक्रमांसाठी केंद्रीय पातळीवरील ‘नीट’ परीक्षा याच शैक्षणिक वर्षापासून घेण्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला. ‘नीट’ यंदापासून लागू करायची झाल्यास पहिल्या टप्प्यात १ मे रोजी आणि दुसऱ्या टप्प्यात २४ जुलै रोजी परीक्षा घेण्यात येणार आहे, असेही सर्वोच्च न्यायालयाने आपल्या निकालात स्पष्ट केले आहे. यासंदर्भात विदयार्थ्यांमध्ये निर्माण झालेला गोंधळ दूर करण्यासाठी आज शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी एमएच-सीईटी परीक्षेसंदर्भात पत्रकार परिषद घेतली. यावेळी आमदार आशिष शेलार, वैदयकीय संचालक डॉ. प्रवीण शिनगारे उपस्थित होते.
सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या नीट परीक्षेच्या निकालावरुन विदयार्थ्यांमध्ये आणि त्यांच्या पालकांमध्ये गोंधळाचे वातावरण निर्माण झाल्याचे चित्र आहे. मात्र विदयार्थ्यांनी कोणतेही दडपण न घेता ५ मे २०१६ रोजी होणारी एमएच-सीईटी परीक्षा दयावी, असे आवाहन यावेळी तावडे यांनी विद्यार्थ्यांना केलं. येत्या सोमवारी सर्वोच्च न्यायालयात महाराष्ट्र सरकारच्या वतीने फेरविचार याचिका दाखल करण्यात येणार आहे. त्यासाठी महाराष्ट्रातून दोन अधिकारी नवी दिल्ली येथे पोहोचले आहेत. तसेच सदर याचिकांवर राज्य सरकारची बाजू मांडण्यासठी विशेष वकिलांची मदत घेण्यात येत आहे, अशा माहितीही तावडे यांनी दिली.
फेरविचार याचिकेत पुढील मुद्दे मांडणार...
१. महाराष्ट्र राज्याने शासकीय आणि खाजगी वैदयकीय महाविदयालयात प्रवेशासाठी एकच सीईटी असावी, असा कायदा पारित केला असल्याने महाराष्ट्रात खेडोपाडी आणि गरीब असणाऱ्या विदयार्थ्यांनाही याचा लाभ होणार आहे.
२. एमएच-सीईटी परीक्षा आता माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या अभ्यासक्रमावर (एसएससी आणि एचएससी बोर्ड) आधारित असणार आहे. आतापर्यंत फक्त सीबीएसई/आयसीएसई बोर्डावर आधारित अभ्यासक्रमावर सीईटी परीक्षा घेण्यात येत होती. यामुळे ग्रामीण भागात राहणाऱ्या आणि गरीब विदयार्थ्यांना या परीक्षेचा अभ्यास करणे कठीण जात असे. 'नीट'चा अभ्यासक्रम हा सीबीएसईच्या धर्तीवर आहे. परंतु महाराष्ट्रातील ग्रामीण भागात जास्तीत जास्त विद्यार्थी हे एसएससी बोर्डाचे असतात. त्यामुळे या दोन्ही अभ्यासक्रमांमध्ये तफावत असल्यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना सीबीएसईच्या धर्तीवरील अचानक परीक्षा देण्यास सांगितल्यास त्यांच्यावर अन्याय होवू शकतो.
३. २०१३ साली सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठाने नीट परीक्षा रदद केली होती आणि या परीक्षेत बदल करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसारच महाराष्ट्रात एमएच-सीईटी परीक्षा घेण्यात येणार आहे.
४. सीबीएसई मार्फत नीट परीक्षा दोन टप्प्यात घेण्यात येणार आहे. १ मे आणि २४ जुलै रोजी दोन वेगळया परीक्षा होतील. या परीक्षांच्या प्रश्नपत्रिका वेगळ्या असतील त्यामुळे दोन्ही परिक्षांचे गुणांकन वेगवेगळे होईल, त्यामुळे त्याची गुणवत्ता यादी एकच कशी असू शकेल?
५. महाराष्ट्राच्या विदयार्थ्यांनी आतापर्यंत एमएचसीईटी परीक्षेसाठी एचएससी बोर्डाच्या अभ्यासक्रमाचा अभ्यास केला आहे. त्यामुळे आता सीईटी परीक्षा अचानक रदद झाल्यास विदयार्थ्यांचे मोठया प्रमाणात शैक्षणिक नुकसान होणार आहे. हा विद्यार्थ्यांवर अन्याय ठरेल.
महाराष्ट्र राज्य सरकारतर्फे घेण्यात येणारी महाराष्ट्राची एमएच-सीईटी ही परीक्षा ५ मे २०१६ रोजी ठरलेल्या वेळापत्रकानुसार घेतली जाणार आहे. या परीक्षेच्या तारखेमध्ये कोणताही बदल होणार नाही. ज्या विद्यार्थ्यांनी या परीक्षेची तयारी केलेली आहे, त्या विद्यार्थ्यांनी गोंधळून न जाता पूर्ण तयारीनिशी ही परीक्षा द्यावी, असे आवाहन वैद्यकीय शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी आज एका पत्रकार परिषदेत केले. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावर महाराष्ट्र सरकार सोमवारी फेरविचार याचिका दाखल करणार, असेही यावेळी तावडे यांनी सांगितले.
विविध वैद्यकीय अभ्यासक्रमांसाठी केंद्रीय पातळीवरील ‘नीट’ परीक्षा याच शैक्षणिक वर्षापासून घेण्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला. ‘नीट’ यंदापासून लागू करायची झाल्यास पहिल्या टप्प्यात १ मे रोजी आणि दुसऱ्या टप्प्यात २४ जुलै रोजी परीक्षा घेण्यात येणार आहे, असेही सर्वोच्च न्यायालयाने आपल्या निकालात स्पष्ट केले आहे. यासंदर्भात विदयार्थ्यांमध्ये निर्माण झालेला गोंधळ दूर करण्यासाठी आज शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी एमएच-सीईटी परीक्षेसंदर्भात पत्रकार परिषद घेतली. यावेळी आमदार आशिष शेलार, वैदयकीय संचालक डॉ. प्रवीण शिनगारे उपस्थित होते.
सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या नीट परीक्षेच्या निकालावरुन विदयार्थ्यांमध्ये आणि त्यांच्या पालकांमध्ये गोंधळाचे वातावरण निर्माण झाल्याचे चित्र आहे. मात्र विदयार्थ्यांनी कोणतेही दडपण न घेता ५ मे २०१६ रोजी होणारी एमएच-सीईटी परीक्षा दयावी, असे आवाहन यावेळी तावडे यांनी विद्यार्थ्यांना केलं. येत्या सोमवारी सर्वोच्च न्यायालयात महाराष्ट्र सरकारच्या वतीने फेरविचार याचिका दाखल करण्यात येणार आहे. त्यासाठी महाराष्ट्रातून दोन अधिकारी नवी दिल्ली येथे पोहोचले आहेत. तसेच सदर याचिकांवर राज्य सरकारची बाजू मांडण्यासठी विशेष वकिलांची मदत घेण्यात येत आहे, अशा माहितीही तावडे यांनी दिली.
फेरविचार याचिकेत पुढील मुद्दे मांडणार...
१. महाराष्ट्र राज्याने शासकीय आणि खाजगी वैदयकीय महाविदयालयात प्रवेशासाठी एकच सीईटी असावी, असा कायदा पारित केला असल्याने महाराष्ट्रात खेडोपाडी आणि गरीब असणाऱ्या विदयार्थ्यांनाही याचा लाभ होणार आहे.
२. एमएच-सीईटी परीक्षा आता माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या अभ्यासक्रमावर (एसएससी आणि एचएससी बोर्ड) आधारित असणार आहे. आतापर्यंत फक्त सीबीएसई/आयसीएसई बोर्डावर आधारित अभ्यासक्रमावर सीईटी परीक्षा घेण्यात येत होती. यामुळे ग्रामीण भागात राहणाऱ्या आणि गरीब विदयार्थ्यांना या परीक्षेचा अभ्यास करणे कठीण जात असे. 'नीट'चा अभ्यासक्रम हा सीबीएसईच्या धर्तीवर आहे. परंतु महाराष्ट्रातील ग्रामीण भागात जास्तीत जास्त विद्यार्थी हे एसएससी बोर्डाचे असतात. त्यामुळे या दोन्ही अभ्यासक्रमांमध्ये तफावत असल्यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना सीबीएसईच्या धर्तीवरील अचानक परीक्षा देण्यास सांगितल्यास त्यांच्यावर अन्याय होवू शकतो.
३. २०१३ साली सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठाने नीट परीक्षा रदद केली होती आणि या परीक्षेत बदल करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसारच महाराष्ट्रात एमएच-सीईटी परीक्षा घेण्यात येणार आहे.
४. सीबीएसई मार्फत नीट परीक्षा दोन टप्प्यात घेण्यात येणार आहे. १ मे आणि २४ जुलै रोजी दोन वेगळया परीक्षा होतील. या परीक्षांच्या प्रश्नपत्रिका वेगळ्या असतील त्यामुळे दोन्ही परिक्षांचे गुणांकन वेगवेगळे होईल, त्यामुळे त्याची गुणवत्ता यादी एकच कशी असू शकेल?
५. महाराष्ट्राच्या विदयार्थ्यांनी आतापर्यंत एमएचसीईटी परीक्षेसाठी एचएससी बोर्डाच्या अभ्यासक्रमाचा अभ्यास केला आहे. त्यामुळे आता सीईटी परीक्षा अचानक रदद झाल्यास विदयार्थ्यांचे मोठया प्रमाणात शैक्षणिक नुकसान होणार आहे. हा विद्यार्थ्यांवर अन्याय ठरेल.