मुंबई: गेल्या काही दिवसांमध्ये मशिदींवरील भोंग्यांच्या मुद्द्यावरून राज्यातील वातावरण प्रचंड तापले आहे. मशिदींवरील भोंगे कोणत्याही परिस्थितीत उतरलेच पाहिजेत, अशी आक्रमक भूमिका काही राजकीय पक्षांनी घेतली आहे. त्यामुळे आगामी काळात राज्यात तणाव निर्माण होण्याची शक्यता आहे. या वादावर तोडगा काढण्यासाठी ठाकरे सरकारकडून सोमवारी सर्वपक्षीय बैठक बोलावण्यात आली आहे. या बैठकीत धार्मिक स्थळांवरील लाऊडस्पीकरबाबत मार्गदर्शक तत्त्वे निश्चित करण्यात येतील. या बैठकीत सर्वपक्षीय नेते उपस्थित राहणार असले तरी अलीकडच्या काळात मशिदींवरील भोंग्यांवरून आक्रमक भूमिका घेणाऱ्या राज ठाकरे यांनी या बैठकीकडे पाठ फिरवली आहे. या बैठकीसाठी एकूण २८ नेत्यांना निमंत्रण देण्यात आले आहे. यामध्ये विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, नाना पटोले, प्रकाश आंबेडकर, इम्तियाज जलील, अबू आझमी, जयंत पाटील (शेकाप), हितेंद्र ठाकूर, धनंजय शिंदे यांचा समावेश आहे. तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून बाळा नांदगावकर आणि संदीप देशपांडे या बैठकीला उपस्थित राहणार आहेत. ते या बैठकीत काय भूमिका मांडतात, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.
राज ठाकरेंचा अल्टिमेटम
राज ठाकरे यांनी ठाण्यातील सभेत मशिदींवरील भोंग्यांबाबत राज्य सरकारला अल्टिमेटम दिला होता. सरकारने राज्यातील सर्व मौलवींशी चर्चा करून ३ मे म्हणजे ईदपर्यंत मशिदींवरील भोंगे खाली उतरवावेत. अन्यथा आम्ही मशिदींसमोर लाऊडस्पीकर्स उभारून हनुमान चालीसा वाजवू, असा इशारा राज ठाकरे यांनी दिला होता. त्यामुळे आजच्या बैठकीत यावर चर्चा होऊन काही तोडगा निघणार का, हे पाहावे लागेल.
गृहमंत्र्यांचा मनसेला इशारा
राज ठाकरे यांनी अल्टिमेटम दिल्यानंतर गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी मनसेला अप्रत्यक्ष इशारा दिला होता. सरकारने राज ठाकरे (Raj Thackeray) यांचे वक्तव्य गांभीर्याने घेतले आहे. कोणत्याही परिस्थितीत राज्यात वेगळ्या प्रकारचे वातावरण निर्माण करून देणार नाही. त्यासाठी पोलीस सज्ज आहेत, असा इशारा दिलीप-वळसे पाटील (Dilip Walse Patil) यांनी म्हटले होते.
यावेळी दिलीप वळसे-पाटील यांनी राज ठाकरे यांनी मशिदींवरील भोंग्यांसंदर्भात न्यायालयाच्या निर्णयाचा दाखला देत केलेला दावा खोडून काढला होता. मशिदींवरील भोंग्यांना विरोध करताना ज्या न्यायालयीन निर्णयाचा आधार घेतला जातो, त्यामध्ये रात्री १० ते सकाळी ६ या काळात कोणत्याही ठिकाणी लाऊडस्पीकर्स वाजवू नयेत, असे म्हटले आहे. ज्याठिकाणी परवानगी घेऊन भोंगे लावले आहेत, ते काढण्याचा प्रश्नच येत नाही. न्यायालयाच्या निकालात याबाबत कोणताही उल्लेख नाही, या गोष्टीकडे गृहमंत्र्यांनी लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला होता.
राज ठाकरेंचा अल्टिमेटम
राज ठाकरे यांनी ठाण्यातील सभेत मशिदींवरील भोंग्यांबाबत राज्य सरकारला अल्टिमेटम दिला होता. सरकारने राज्यातील सर्व मौलवींशी चर्चा करून ३ मे म्हणजे ईदपर्यंत मशिदींवरील भोंगे खाली उतरवावेत. अन्यथा आम्ही मशिदींसमोर लाऊडस्पीकर्स उभारून हनुमान चालीसा वाजवू, असा इशारा राज ठाकरे यांनी दिला होता. त्यामुळे आजच्या बैठकीत यावर चर्चा होऊन काही तोडगा निघणार का, हे पाहावे लागेल.
गृहमंत्र्यांचा मनसेला इशारा
राज ठाकरे यांनी अल्टिमेटम दिल्यानंतर गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी मनसेला अप्रत्यक्ष इशारा दिला होता. सरकारने राज ठाकरे (Raj Thackeray) यांचे वक्तव्य गांभीर्याने घेतले आहे. कोणत्याही परिस्थितीत राज्यात वेगळ्या प्रकारचे वातावरण निर्माण करून देणार नाही. त्यासाठी पोलीस सज्ज आहेत, असा इशारा दिलीप-वळसे पाटील (Dilip Walse Patil) यांनी म्हटले होते.
यावेळी दिलीप वळसे-पाटील यांनी राज ठाकरे यांनी मशिदींवरील भोंग्यांसंदर्भात न्यायालयाच्या निर्णयाचा दाखला देत केलेला दावा खोडून काढला होता. मशिदींवरील भोंग्यांना विरोध करताना ज्या न्यायालयीन निर्णयाचा आधार घेतला जातो, त्यामध्ये रात्री १० ते सकाळी ६ या काळात कोणत्याही ठिकाणी लाऊडस्पीकर्स वाजवू नयेत, असे म्हटले आहे. ज्याठिकाणी परवानगी घेऊन भोंगे लावले आहेत, ते काढण्याचा प्रश्नच येत नाही. न्यायालयाच्या निकालात याबाबत कोणताही उल्लेख नाही, या गोष्टीकडे गृहमंत्र्यांनी लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला होता.