मुंबई : करोणा विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य सरकारच्या महावितरण या कंपनीनेही कर्मचाऱ्यांना पहिल्यांदाच 'वर्क फ्रॉम होम' चा पर्याय दिला आहे. कुठल्याही कार्यालयात ५० टक्क्यांहून अधिक कर्मचारी असू नयेत, या आदेशाची अंमलबजावणी करीत कंपनीने ३१ मार्चपर्यंत कर्मचारी व अधिकाऱ्यांना ही सूचना दिली आहे.
यासंबंधीचा निर्णय विभाग प्रमुखांनी त्यांच्या स्तरावर घ्यावा. या निर्णयाद्वारे कार्यालयातील नियंत्रण अधिकारी, कंपनीचे महत्त्वाचे व तातडीचे कामकाज तसेच संचलन कार्यक्षमतेत कुठेही अडथळा येणार नाही, याची खबरदारी विभाग प्रमुखांनी घ्यावा, अशी सूचना महावितरणाचे मुख्य महाव्यवस्थापक कमांडर (निवृत्त) शिवाजी इंदलकर यांनी वांद्रे येथील मुख्यालयातून दिले आहेत.
यासंबंधीचा निर्णय विभाग प्रमुखांनी त्यांच्या स्तरावर घ्यावा. या निर्णयाद्वारे कार्यालयातील नियंत्रण अधिकारी, कंपनीचे महत्त्वाचे व तातडीचे कामकाज तसेच संचलन कार्यक्षमतेत कुठेही अडथळा येणार नाही, याची खबरदारी विभाग प्रमुखांनी घ्यावा, अशी सूचना महावितरणाचे मुख्य महाव्यवस्थापक कमांडर (निवृत्त) शिवाजी इंदलकर यांनी वांद्रे येथील मुख्यालयातून दिले आहेत.