म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई
अवनी वाघिणीच्या शिकारीवरून ऐन दिवाळीत भाजपच्या दोन ज्येष्ठ मंत्र्यांमध्ये जुंपली आहे. नरभक्षक ठरवलेल्या वाघिणीची हत्या केल्याबद्दल केंद्रीय महिला आणि बालविकासमंत्री मनेका गांधी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र पाठवून वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हकालपट्टीची मागणी केली आहे. तर 'याच न्यायाने देशात कुपोषणामुळे लहान मुलांच्या मृत्यूचे प्रमाण वाढले असताना याची जबाबदारी स्वीकारून मनेका गांधी राजीनामा देणार आहेत का', असा सवाल मुनगंटीवार यांनी केला आहे.
यवतमाळ जिल्ह्यातील पांढरकवडा वनक्षेत्र परिसरातील अवनी (टी-१) वाघिणीच्या हल्ल्यात १३ नागरिकांचा मृत्यू झाल्याच्या पार्श्वभूमीवर वन विभागाने या वाघिणीची शार्पशूटरच्या मदतीने शिकार केली. वन्यप्रण्यांविषयी संवेदनशील असलेल्या मनेका गांधी यांनी वाघिणीची शिकार केल्याबद्दल राज्य सरकारविरोधात संताप व्यक्त केला. गांधी यांनी देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून मुनगंटीवार यांना मंत्रिपदावरून हटविण्याची मागणी केली आहे. याबाबतची माहिती गांधी यांनी पुण्यातील एका कार्यक्रमात दिली. या प्रकरणी आपण न्यायालयात याचिका दाखल करणार आहोत, असेही त्यांनी सांगितले आहे.
या पार्श्वभूमीवर मुनगंटीवार यांनी मनेका गांधी यांना लक्ष्य केले. 'मनेका गांधी ज्येष्ठ मंत्री असून, त्यांना अशाप्रकारची भाषा शोभत नाही. अलीकडच्या काळात कुपोषणामुळे लहान मुलांच्या मृत्यूचे प्रमाण वाढले आहे. या बालमृत्यूची जबाबदारी स्वीकारून देशाच्या महिला आणि बालविकासमंत्री असलेल्या गांधी यांनीही राजीनामा द्यावा, अशी मी मागणी केली, तर चालेल का', असा सवाल मुनगंटीवार यांनी केला आहे. 'आमच्या कार्यपद्धतीविषयी गांधी यांना काही चूक वाटत असल्यास त्यांनी माझ्याशी संपर्क साधायला हवा होता. मात्र आपण वाघिणीचा खून केला, अशाप्रकारे बोलणे योग्य नाही. आपण राजकारणात असले ऐकून घेण्यासाठी नव्हे, तर दीनदुबळ्यांची सेवा करण्यासाठी आलो आहोत', असेही मुनगंटीवार म्हणाले.
मुख्यमंत्री मुनगंटीवार यांच्या पाठिशी
दरम्यान, अवनीच्या शिकारीवरून अडचणीत सापडलेल्या मुनगंटीवार यांची मुख्यमंत्र्यांनी पाठराखण केली आहे. मुनगंटीवार यांच्या राजीनाम्याची मागणी फेटाळून लावताना, 'अवनीला मारल्याचे आम्हाला सगळ्यांनाच दु:ख आहे. वाघिणीला मारण्यासाठी जी प्रक्रिया आहे, त्यात चूक झाली असेल तर संबंधितांवर कडक कारवाई केली जाईल', असा पुनरुच्चार देवेंद्र फडणवीस यांनी केला.
'बिर्ला, अंबानींच्या प्रकल्पासाठीच हत्या'
उद्योगपती बिर्ला आणि अंबानीच्या प्रकल्पासाठीच अवनीची हत्या करण्यात आल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी मंगळवारी सांगलीत केला. 'वन्यप्रणी कायद्यानुसार एखादा प्राणी हिंसक झाल्यास त्याला बेशुद्ध करावे, असा नियम आहे. मात्र, अवनीला ठार मारण्यात आले. या कृतीचा राष्ट्रवादी काँग्रेस निषेध करते', असे पाटील म्हणाले. तर विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनीही अवनीच्या हत्येची जबाबदारी मुनगंटीवार यांनी स्वीकारायला हवी, असे म्हटले आहे.
अवनी वाघिणीच्या शिकारीवरून ऐन दिवाळीत भाजपच्या दोन ज्येष्ठ मंत्र्यांमध्ये जुंपली आहे. नरभक्षक ठरवलेल्या वाघिणीची हत्या केल्याबद्दल केंद्रीय महिला आणि बालविकासमंत्री मनेका गांधी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र पाठवून वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हकालपट्टीची मागणी केली आहे. तर 'याच न्यायाने देशात कुपोषणामुळे लहान मुलांच्या मृत्यूचे प्रमाण वाढले असताना याची जबाबदारी स्वीकारून मनेका गांधी राजीनामा देणार आहेत का', असा सवाल मुनगंटीवार यांनी केला आहे.
यवतमाळ जिल्ह्यातील पांढरकवडा वनक्षेत्र परिसरातील अवनी (टी-१) वाघिणीच्या हल्ल्यात १३ नागरिकांचा मृत्यू झाल्याच्या पार्श्वभूमीवर वन विभागाने या वाघिणीची शार्पशूटरच्या मदतीने शिकार केली. वन्यप्रण्यांविषयी संवेदनशील असलेल्या मनेका गांधी यांनी वाघिणीची शिकार केल्याबद्दल राज्य सरकारविरोधात संताप व्यक्त केला. गांधी यांनी देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून मुनगंटीवार यांना मंत्रिपदावरून हटविण्याची मागणी केली आहे. याबाबतची माहिती गांधी यांनी पुण्यातील एका कार्यक्रमात दिली. या प्रकरणी आपण न्यायालयात याचिका दाखल करणार आहोत, असेही त्यांनी सांगितले आहे.
या पार्श्वभूमीवर मुनगंटीवार यांनी मनेका गांधी यांना लक्ष्य केले. 'मनेका गांधी ज्येष्ठ मंत्री असून, त्यांना अशाप्रकारची भाषा शोभत नाही. अलीकडच्या काळात कुपोषणामुळे लहान मुलांच्या मृत्यूचे प्रमाण वाढले आहे. या बालमृत्यूची जबाबदारी स्वीकारून देशाच्या महिला आणि बालविकासमंत्री असलेल्या गांधी यांनीही राजीनामा द्यावा, अशी मी मागणी केली, तर चालेल का', असा सवाल मुनगंटीवार यांनी केला आहे. 'आमच्या कार्यपद्धतीविषयी गांधी यांना काही चूक वाटत असल्यास त्यांनी माझ्याशी संपर्क साधायला हवा होता. मात्र आपण वाघिणीचा खून केला, अशाप्रकारे बोलणे योग्य नाही. आपण राजकारणात असले ऐकून घेण्यासाठी नव्हे, तर दीनदुबळ्यांची सेवा करण्यासाठी आलो आहोत', असेही मुनगंटीवार म्हणाले.
मुख्यमंत्री मुनगंटीवार यांच्या पाठिशी
दरम्यान, अवनीच्या शिकारीवरून अडचणीत सापडलेल्या मुनगंटीवार यांची मुख्यमंत्र्यांनी पाठराखण केली आहे. मुनगंटीवार यांच्या राजीनाम्याची मागणी फेटाळून लावताना, 'अवनीला मारल्याचे आम्हाला सगळ्यांनाच दु:ख आहे. वाघिणीला मारण्यासाठी जी प्रक्रिया आहे, त्यात चूक झाली असेल तर संबंधितांवर कडक कारवाई केली जाईल', असा पुनरुच्चार देवेंद्र फडणवीस यांनी केला.
'बिर्ला, अंबानींच्या प्रकल्पासाठीच हत्या'
उद्योगपती बिर्ला आणि अंबानीच्या प्रकल्पासाठीच अवनीची हत्या करण्यात आल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी मंगळवारी सांगलीत केला. 'वन्यप्रणी कायद्यानुसार एखादा प्राणी हिंसक झाल्यास त्याला बेशुद्ध करावे, असा नियम आहे. मात्र, अवनीला ठार मारण्यात आले. या कृतीचा राष्ट्रवादी काँग्रेस निषेध करते', असे पाटील म्हणाले. तर विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनीही अवनीच्या हत्येची जबाबदारी मुनगंटीवार यांनी स्वीकारायला हवी, असे म्हटले आहे.