मटा ऑनलाइन वृत्त । मुंबई
दोन दिवसांच्या 'बॅटिंग'नंतर पावसानं आज विश्रांती घेतली असली, तरी मध्य रेल्वे आणि हार्बर रेल्वेची वाहतूक ट्रॅकवर यायचं नाव घेत नाहीए. त्यामुळे विकेण्डच्या आनंदात घरी जाणाऱ्या नोकरदारांचा परतीच्या प्रवासात खोळंबा होण्याची शक्यता आहे.
कल्याणजवळ मंगला एक्स्प्रेसचं इंजिन घसरल्याने टिटवाळा, कसाराकडे जाणारी वाहतूक ठप्प झाली आहे, तर कुर्ला-टिळकनगरदरम्यान मालगाडी बंद पडल्यानं हार्बर मार्गावरही वाहतुकीचा तीनतेरा वाजलेत.
दोन दिवसांच्या 'बॅटिंग'नंतर पावसानं आज विश्रांती घेतली असली, तरी मध्य रेल्वे आणि हार्बर रेल्वेची वाहतूक ट्रॅकवर यायचं नाव घेत नाहीए. त्यामुळे विकेण्डच्या आनंदात घरी जाणाऱ्या नोकरदारांचा परतीच्या प्रवासात खोळंबा होण्याची शक्यता आहे.
कल्याणजवळ मंगला एक्स्प्रेसचं इंजिन घसरल्याने टिटवाळा, कसाराकडे जाणारी वाहतूक ठप्प झाली आहे, तर कुर्ला-टिळकनगरदरम्यान मालगाडी बंद पडल्यानं हार्बर मार्गावरही वाहतुकीचा तीनतेरा वाजलेत.