मुंबई :
आझाद मैदानात उपोषणाला बसलेल्या मराठा आंदोलकांनी अखेर आपलं उपोषण मागे घेतलं आहे. विधिमंडळात मराठा आरक्षण विधेयक एकमताने मंजूर झाल्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आझाद मैदानात जाऊन मराठा बांधवांची भेट घेतली. या भेटीदरम्यानच मराठा आंदोलकांनी उपोषण मागे घेण्याची घोषणा केली.
उद्धव ठाकरे यांनी यावेळी मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधला. मराठा कार्यकर्त्यांनी एका निर्धाराने केलेल्या आंदोलनाचे उद्धव यांनी कौतुक केले. मराठा समाजावर शिवसेना कधीही अन्याय होऊ देणार नाही. तुमच्यामागे यापुढेही आम्ही ठामपणे उभे राहू, असे आश्वासन उद्धव यांनी आंदोलकांना दिले.
मराठा समाजाला देण्यात आलेले आरक्षण कोर्टात टिकेल का, असा प्रश्न यावेळी पत्रकारांनी विचारला असता हे आरक्षण नक्कीच टिकेल, असा विश्वास उद्धव यांनी व्यक्त केला. मराठा आरक्षण विधेयक सभागृहात एकमताने मंजूर झालेले आहे. हे आरक्षण टिकवण्याची जबाबदारी मुख्यमंत्र्यांनी घेतलेली आहे, असेही उद्धव यांनी नमूद केले. आरक्षणासाठी आंदोलन करणाऱ्या अनेक मराठा कार्यकर्त्यांवर आजही गुन्हे दाखल आहेत. हे गुन्हे मागे घेण्यासाठी आमचे मंत्री मुख्यमंत्र्यांकडे विनंती करणार, असेही उद्धव यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितले.
आझाद मैदानात उपोषणाला बसलेल्या मराठा आंदोलकांनी अखेर आपलं उपोषण मागे घेतलं आहे. विधिमंडळात मराठा आरक्षण विधेयक एकमताने मंजूर झाल्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आझाद मैदानात जाऊन मराठा बांधवांची भेट घेतली. या भेटीदरम्यानच मराठा आंदोलकांनी उपोषण मागे घेण्याची घोषणा केली.
उद्धव ठाकरे यांनी यावेळी मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधला. मराठा कार्यकर्त्यांनी एका निर्धाराने केलेल्या आंदोलनाचे उद्धव यांनी कौतुक केले. मराठा समाजावर शिवसेना कधीही अन्याय होऊ देणार नाही. तुमच्यामागे यापुढेही आम्ही ठामपणे उभे राहू, असे आश्वासन उद्धव यांनी आंदोलकांना दिले.
मराठा समाजाला देण्यात आलेले आरक्षण कोर्टात टिकेल का, असा प्रश्न यावेळी पत्रकारांनी विचारला असता हे आरक्षण नक्कीच टिकेल, असा विश्वास उद्धव यांनी व्यक्त केला. मराठा आरक्षण विधेयक सभागृहात एकमताने मंजूर झालेले आहे. हे आरक्षण टिकवण्याची जबाबदारी मुख्यमंत्र्यांनी घेतलेली आहे, असेही उद्धव यांनी नमूद केले. आरक्षणासाठी आंदोलन करणाऱ्या अनेक मराठा कार्यकर्त्यांवर आजही गुन्हे दाखल आहेत. हे गुन्हे मागे घेण्यासाठी आमचे मंत्री मुख्यमंत्र्यांकडे विनंती करणार, असेही उद्धव यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितले.