अ‍ॅपशहर

नेते व्यासपीठावर, साहित्यिक मंडपात?

येथे आयोजित करण्यात आलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटन आज, शुक्रवारी होत असून, त्यासाठी गुर्जरप्रांतीचे हे शहर सज्ज झाले आहे. साहित्य रसिकांत उत्साह दिसत असला तरी व्यासपीठावरील राजकारण्यांच्या संभाव्य उपस्थितीमुळे साहित्यप्रेमींना वेगळीच चिंता लागली आहे...

Maharashtra Times 16 Feb 2018, 2:47 am
महाराजा सयाजीराव गायकवाड साहित्य नगरी , बडोदा
महाराष्ट्र टाइम्स.कॉम samelan


Chintamani.Patki@timesgroup.com

Tweet: ChintamanipMT

बडोदा : येथे आयोजित करण्यात आलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटन आज, शुक्रवारी होत असून, त्यासाठी गुर्जरप्रांतीचे हे शहर सज्ज झाले आहे. साहित्य रसिकांत उत्साह दिसत असला तरी व्यासपीठावरील राजकारण्यांच्या संभाव्य उपस्थितीमुळे साहित्यप्रेमींना वेगळीच चिंता लागली आहे. उद्घाटन सोहळ्याला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाषामंत्री विनोद तावडे हे उपस्थित राहणार का, याबाबत संभ्रम आहेच. मात्र फडणवीस, गुजरातचे मुख्यमंत्री आणि गुजरातचे राज्यपाल हे उद्घाटन सोहळ्याला उपस्थित राहिल्यास साहित्यिक, साहित्य महामंडळ आणि आयोजक यांच्यातील केवळ सात जणांना व्यासपीठावर बसता येईल, असा आदेश स्थानिक पोलिस प्रशासनाने दिला आहे.

महाराष्ट्र आणि गुजरातचे मुख्यमंत्री तसेच गुजरातचे राज्यपाल उद्घाटन सोहळ्याला उपस्थित राहणार असतील तर सुरक्षा आणि राज्यशिष्टाचारामुळे साहित्यिक आणि साहित्य महामंडळाचा सुमारे २१ जणांपैकी केवळ सात जणांना व्यासपीठावर बसता येईल. उर्वरित मंडळींना खाली बसावे लागेल, असा आदेश स्थानिक पोलिस प्रशासनाने आयोजकांना दिला आहे. त्यामुळे साहित्यिक कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचे वातावरण आहे. साहित्य संमेलनाचे व्यासपीठ हे मुख्यतः साहित्यिकांचे आहे. राजकारण्यांमुळे त्यांच्यावर अन्याय होता कामा नये, असा तीव्र सूर गुरुवारी संमेलन परिसरात व्यक्त होत होता. अखिल भारतीय साहित्य महामंडळाच्या बैठकीमध्ये याबाबत तक्रारीचा पाढा वाचण्यात आला.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज