अ‍ॅपशहर

'मराठीवर राजमुद्रा उमटावी'

मराठीला अभिजात दर्जा देण्याची मागणी आम्ही पंतप्रधानांकडे करू. मराठी भाषा अभिजात भाषा आहेच, हे सांगण्याची गरज नाही, पण तिच्यावर राजमुद्रा उमटली पाहिजे,' अशी टिप्पणी मुख्यमंत्री फडणवीस यांनी शुक्रवारी साहित्य संमेलन उद्घाटन कार्यक्रमात केली...

Maharashtra Times 17 Feb 2018, 2:43 am
महाराजा सयाजीराव गायकवाड साहित्य नगरी, बडोदा
महाराष्ट्र टाइम्स.कॉम samelan


Chintamani.Patki@timesgroup.com

Tweet: ChintamanipMT

मराठीला अभिजात दर्जा देण्याची मागणी आम्ही पंतप्रधानांकडे करू. मराठी भाषा अभिजात भाषा आहेच, हे सांगण्याची गरज नाही, पण तिच्यावर राजमुद्रा उमटली पाहिजे,' अशी टिप्पणी मुख्यमंत्री फडणवीस यांनी शुक्रवारी साहित्य संमेलन उद्घाटन कार्यक्रमात केली.

'भाषा हा वादाचा विषय नाही. तो संवादाचा विषय आहे. भाषेमुळे मानसिकता विस्तारली जाते. मराठीचे विद्यापीठ मागणी रास्त असून सरकार सकारात्मक विचार करेल,' असे मुख्यमंत्र्यांनी नमूद केले. मुख्यमंत्र्यांचे भाषण सुरू असताना बेळगाव, निपाणीसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे, अशी घोषणा प्रेक्षकांमधून होताच मुख्यमंत्र्यांनी हो झालाच पाहिजे, असे म्हणून आंदोलकांच्या सुरात सूर मिसळले. मराठी विद्यापीठाच्या मागणीलाही त्यांनी, तुमची मागणीही पूर्ण करू, असे सांगून सकारात्मक प्रतिसाद दिला. गायकवाड बंधूंचे सनई व जलतरंग वादन झाले. अंजली मराठे व मंगेश खोपकर यांनी सूत्रसंचालन केले.

विंदा करंदीकर विचारपीठावर ज्ञानपीठ विजेते गुजराती साहित्यिक डॉ. रघुवीर चौधरी यांच्या हस्ते ९१ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटन झाले. संमेलनाध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख यांना डाॅ. अक्षयकुमार काळे यांनी अध्यक्षपदाची सूत्र प्रदान केली. सिक्कीमचे राज्यपाल श्रीनिवास पाटील, भाषामंत्री विनोद तावडे, बडोद्याचे महापौर भरत डांगर, समरजितसिंह गायकवाड, खासदार रंजन भट, साहित्यिक डॉ. सितांशू यशश्चंद्र, स्वागताध्यक्ष शुंभागिनीराजे गायकवाड, अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष डॉ. श्रीपाद जोशी, संमेलनाचे कार्याध्यक्ष दिलीप खोपकर उपस्थित होते.

भारतीय भाषांसाठी आंदोलनाची वेळ

'सर्व भारतीय भाषांची उपेक्षा सुरू आहे. इंग्रजीचे महत्त्व आहे, पण तिला अनावश्यक महत्त्व दिले जात आहे. भारतीय प्रादेशिक भाषा वाचवण्यासाठी आंदोलन करण्याची वेळ आली आहे,' असा इशारा डॉ. चौधरी यांनी दिला.

हा प्रश्न का मिटत नाही...

मराठीला अभिजात दर्जा मिळेल की नाही हा आता मोठा प्रश्न नाही, तर नागपूरमध्ये मुख्यमंत्री आणि साहित्य महामंडळाचे अध्यक्ष एकाच गल्लीत राहूनही हा प्रश्न मिटत नाही, हा मोठा प्रश्न झाला आहे, अशी गुगली साहित्य महामंडळाचे अध्यक्ष श्रीपाद जोशी यांनी टाकताच मुख्यमंत्र्यांना हसू आवरले नाही.

उन्हाची झळ

संमेलनाच्या उद्घाटनच्या वेळी टळटळीत ऊन असल्याने दुपारी चारचा कार्यक्रम तासाने पुढे ढकलण्यात आला. खुला मांडव असल्याने ऊन असतानाच कार्यक्रम सुरू करावा लागल्याने रसिकांबरोबर व्यासपीठावरील मान्यवरांना त्याची झळ बसली. सायंकाळी मात्र गारठा आणि झाडांवरील विद्युत रोषणाईमुळे आल्हाददायक वातावरण अनुभवता आले.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज