‘मटा हेल्पलाइन’ या विद्यार्थी-वाचक उपक्रमाचे यंदाचे नववे वर्ष. ‘मटा’च्या या उपक्रमाला विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी आवर्जून पाठिंबा दिला आहे. असंख्य गरजू मुलांना मदतीचा हात देणाऱ्या या विधायक उपक्रमाचे महत्त्व विशद करताहेत दिग्दर्शक केदार शिंदे...
पूर्वी डॉक्टरचा मुलगा डॉक्टर किंवा इंजिनीअरचा मुलगा इंजनिीअर बनतो असे समीकरण असायचे. पण आताची पिढी एकदम हुशार आहे. त्यांना आयुष्यात नेमके काय करायचे आहे हे त्यांना ठाऊक असते. स्वतःची स्वप्ने पूर्ण करण्यासाठी ते मेहनत घेतात. अशावेळी हुशारी आहे तर त्याला प्रोत्साहन मिळायलाच हवे. केवळ पैशांअभावी कुणाचेही नुकसान व्हायला नको. आजची पिढी बदलली आहे. त्यांना त्यांच्या जबाबदारीची जाणीव आहे. ज्या आईवडिलांनी कष्ट घेत आजवर इथे पोहोचवले आहे त्यांना किमान म्हातारपणी सुस्थितीत ठेवण्याचा विचार ही मुले करतात. हलाखीच्या परिस्थितून ती स्वतःचे अस्तित्व निर्माण करण्यासाठी दिवसरात्र एक करतात. या विद्यार्थ्यांचे यश हे त्याचे उदाहरणच म्हणता येईल. त्यामुळे ‘मटा’चा हा उपक्रम निश्चितच प्रशंसनीय आहे. यानिमित्ताने या यशस्वी मुलांसह मला त्यांच्या पालकांचेही विशेष कौतुक करावेसे वाटते. आपली समाजाप्रती असलेली बांधिलकी लक्षात घेऊन या विद्यार्थ्यांनीसुद्धा या संधीचा योग्य वापर करावा. अत्यंत कष्टाने वर येत हलाखीच्या परिस्थितीतही या विद्यार्थ्यांनी उज्ज्वल कामगिरी बजावली आहे. आणि कुठलाही सेटअप नसताना केवळ स्वतःच्या जिद्दीवर एवढे यश मिळवणे ही खूप मोठी गोष्ट आहे. शिकण्याची इच्छा आणि जिद्द बाळगणाऱ्या विद्यार्थ्यांना आर्थिक मदतीचे बळ देणारा ‘मटा’चा हा उपक्रम स्तुत्य आहे. सर्वसामान्य घरातील विद्यार्थ्यांना हा मदतीचा हात देण्याचे आणि पाठीवर कौतुकाची थाप देण्याचे काम गेली कित्येक वर्षे महाराष्ट्र टाइम्स करत आहे. अभ्यासाप्रती असलेली या विद्यार्थ्यांची आवड सगळ्या अडचणींवर मात करणारी ठरली आहे. यशाच्या या वाटचालीत आर्थिक चणचण हा रोडा येता कामा नये. त्यासाठी मी सगळ्यांना त्यांना मदत करण्याचे मनापासून आवाहन करतो. मी ही माझ्या परीने शक्य तेवढी मदत कायम करत असतो. तुम्हीही करत राहावी, असे मला वाटते. इथे तुम्ही किती पैसे देऊन मदत करता, हे महत्त्वाचे नाही. ते देण्यामागे जी भावना असते ती मला जास्त महत्त्वाची वाटते. या मुलांना त्यांच्या उज्ज्वल भवितव्यासाठी खूप खूप शुभेच्छा!
पूर्वी डॉक्टरचा मुलगा डॉक्टर किंवा इंजिनीअरचा मुलगा इंजनिीअर बनतो असे समीकरण असायचे. पण आताची पिढी एकदम हुशार आहे. त्यांना आयुष्यात नेमके काय करायचे आहे हे त्यांना ठाऊक असते. स्वतःची स्वप्ने पूर्ण करण्यासाठी ते मेहनत घेतात. अशावेळी हुशारी आहे तर त्याला प्रोत्साहन मिळायलाच हवे. केवळ पैशांअभावी कुणाचेही नुकसान व्हायला नको. आजची पिढी बदलली आहे. त्यांना त्यांच्या जबाबदारीची जाणीव आहे. ज्या आईवडिलांनी कष्ट घेत आजवर इथे पोहोचवले आहे त्यांना किमान म्हातारपणी सुस्थितीत ठेवण्याचा विचार ही मुले करतात. हलाखीच्या परिस्थितून ती स्वतःचे अस्तित्व निर्माण करण्यासाठी दिवसरात्र एक करतात. या विद्यार्थ्यांचे यश हे त्याचे उदाहरणच म्हणता येईल. त्यामुळे ‘मटा’चा हा उपक्रम निश्चितच प्रशंसनीय आहे. यानिमित्ताने या यशस्वी मुलांसह मला त्यांच्या पालकांचेही विशेष कौतुक करावेसे वाटते. आपली समाजाप्रती असलेली बांधिलकी लक्षात घेऊन या विद्यार्थ्यांनीसुद्धा या संधीचा योग्य वापर करावा. अत्यंत कष्टाने वर येत हलाखीच्या परिस्थितीतही या विद्यार्थ्यांनी उज्ज्वल कामगिरी बजावली आहे. आणि कुठलाही सेटअप नसताना केवळ स्वतःच्या जिद्दीवर एवढे यश मिळवणे ही खूप मोठी गोष्ट आहे. शिकण्याची इच्छा आणि जिद्द बाळगणाऱ्या विद्यार्थ्यांना आर्थिक मदतीचे बळ देणारा ‘मटा’चा हा उपक्रम स्तुत्य आहे. सर्वसामान्य घरातील विद्यार्थ्यांना हा मदतीचा हात देण्याचे आणि पाठीवर कौतुकाची थाप देण्याचे काम गेली कित्येक वर्षे महाराष्ट्र टाइम्स करत आहे. अभ्यासाप्रती असलेली या विद्यार्थ्यांची आवड सगळ्या अडचणींवर मात करणारी ठरली आहे. यशाच्या या वाटचालीत आर्थिक चणचण हा रोडा येता कामा नये. त्यासाठी मी सगळ्यांना त्यांना मदत करण्याचे मनापासून आवाहन करतो. मी ही माझ्या परीने शक्य तेवढी मदत कायम करत असतो. तुम्हीही करत राहावी, असे मला वाटते. इथे तुम्ही किती पैसे देऊन मदत करता, हे महत्त्वाचे नाही. ते देण्यामागे जी भावना असते ती मला जास्त महत्त्वाची वाटते. या मुलांना त्यांच्या उज्ज्वल भवितव्यासाठी खूप खूप शुभेच्छा!