अ‍ॅपशहर

लिव्ह इन रिलेशनशीप

फॅमिली कोर्टात घटस्फोट मागायला येणाऱ्या जोडप्यांच्या तक्रारी आणि किस्से ऐकून कधीकधी त्यांचे वकील आणि प्रसंगी न्यायमूर्तीही अचंबित होतात. कोण कोणत्या कारणासाठी काडीमोड मागतंय, ते ऐकून डोकं चक्रावून जातं...

Maharashtra Times 29 Jan 2017, 4:09 am
फॅमिली कोर्टात घटस्फोट मागायला येणाऱ्या जोडप्यांच्या तक्रारी आणि किस्से ऐकून कधीकधी त्यांचे वकील आणि प्रसंगी न्यायमूर्तीही अचंबित होतात. कोण कोणत्या कारणासाठी काडीमोड मागतंय, ते ऐकून डोकं चक्रावून जातं. जोडपं जेव्हा काडीमोड घ्यायला येतं, तेव्हा दोघंही आक्रमक मूडमध्ये असतात. आपला जोडीदार कसा लायक नाही, हे अगदी ठासून सांगतात. बायको नवऱ्याच्या छळाची कहाणी मांडते, तर नवरा बायकोच्या चारित्र्यावर बोट ठेवतो. दोघंही ईरेला पेटलेले असतात. आता सोबत राहणं कदापि शक्य नाही, असं ठरवूनच अशी जोडपी कोर्टात आलेली असतात. पण म्हणून काय कोर्ट लगेच दोघांचा घटस्फोट मंजूर करत नाही. दोघांना समजावलं जातं, काही तोडगा निघतोय का बघा, अशी प्रेमळ सूचना केली जाते. आणखी काही दिवस विचार करा आणि मग वाटल्यास पुन्हा या, असाही सल्ला दिला जातो. शक्यतो दोघांमध्ये समेट व्हावा, असाच एकूण कोर्टाचा कल असतो. काही जोडपी मुलाबाळांकडे बघून माघार घेतात, पुन्हा संसाराला लागतात. तर, काही जोडपी थोडा काळ विभक्त राहून, एकमेकांच्या स्वभावात काही बदल घडतोय का ते पाहू, असा मध्यममार्ग स्वीकारतात. (दूर रहेनेसे प्यार और बढता है, या धर्तीवर!) दूर राहिल्यावर काहींना उपरती होते. काही जोडपी मात्र अमिताभच्या ‘पिंक’ सिनेमातील ‘नो मिन्स् नो’ या डायलॉगवर ठाम असतात. कायदाने सांगितलंय म्हणून अशी जोडपी एक वर्ष एकत्र राहतात. पण, त्यानंतर मात्र पुन्हा कोर्टात जातात. त्यांच्या ठामपणा पाहून घटस्फोटाची मोहोर उमटवण्याखेरीज कोर्टाकडे अन्य पर्याय रहात नाही.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम matasangram mumbai katta
लिव्ह इन रिलेशनशीप


एखाद्या जोडप्यांचं वागणं मात्र अनाकलनीयच असतं. २५ वर्ष एकत्र संसार करताना भांडतात, एकमेकांचे वाभाडे काढतात, दूर होतात, पुन्हा एकत्र येतात, एकत्र येऊन पुन्हा एकमेकांचा उद्धार करतात, पुन्हा दूर जातात, पुन्हा एकत्र येतात. त्यांच्या या भांडणात आता कुणालाच रस राहिलेला नसतो. गंमत म्हणजे त्या जोडप्यालाही आता त्यांच्याच वागणुकीचा कंटाळा आलेला असतो. मग त्यांच्यात पुन्हा कुरबुरी सुरू होतात. पण यावेळी वाद टोकाला पोहोचलेला असतो आणि एका क्षणी हे जोडपं एकमेकांकडे पाठ फिरवतं. त्यामुळे अनेकांना आंनद होतो. रोजच्या कटकटी मिटल्या म्हणून काहीजण सुखावतात.
या जोडप्यानं घटस्फोट तर घेतलाय खरा. पण २३ तारखेनंतर हे जोडपं ‘लिव्ह इन रिलेशनशिप’ मध्ये राहू लागलं नाही म्हणजे मिळवलं.

- मुंबईकर

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज