- गिरणी कामगारांची बाजू न ऐकताचा निर्णय
- वाढीव किमतीने कामगारांमध्ये नाराजी
- वाढ मागे न घेतल्यास आंदोलनाचा इशारा
म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई
गिरणी कामगारांच्या घरांच्या किंमती अचानक साडेनऊऐवजी १८ लाखांवर गेल्याचे गुरुवारी समोर आले. गिरणी कामगारांच्या घरांविषयी मंत्रालयात झालेल्या बैठकीत या घरांची किंमत दुप्पट झाल्याचे ऐकताच कामगार संघटनांचे प्रतिनिधी अवाक् झाले. आतापर्यंत झालेल्या बैठकांत घरांच्या किंमती वाढविण्यासंदर्भात चकार शब्द निघाला नव्हता. त्यामुळे गिरणी कामगारांची बाजू न ऐकता परस्पर घेतलेल्या या निर्णयाने संघटना आक्रमक झाल्या आहेत. ही वाढ मागे न घेतल्यास आंदोलन पुकारण्याचा इशारा गिरणी कामगार कृती संघटनेने दिला आहे.
राज्य सरकारने गिरणी कामगारांसाठी घरांची योजना जाहीर केली आहे. त्या घरांची सोडत निघण्यास कमालीचा विलंब होत असल्याने कामगार संघटना नाराज आहेत. या पार्श्वभूमीवर गिरणी कामगारांच्या प्रलंबित प्रश्नासंदर्भात राज्याचे सचिव अजय मेहता यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी बैठक आयोजित करण्यात आली होती. यात वरिष्ठ अधिकाऱ्यांसह गिरणी कामगार संघटनेचे प्रतिनिधी उपस्थित होते. गिरणी कामगारांची घरे म्हाडाकडून बांधली जाणार आहेत. राज्य सरकारने या घरांच्या किंमती साडेनऊ लाख रुपये असल्याचे यापूर्वीही जाहीर केले आहे. त्यामुळे अचानक झालेल्या वाढीने कृती संघटना चक्रावल्या असून, हा निर्णय कधी घेण्यात आला, याची सूतराम कल्पना संघटनांना नसल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे सरकारने घेतलेल्या हा निर्णय अयोग्य असल्याचे सांगत त्यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे.
मंत्रालयात झालेल्या बैठकीत म्हाडाचे मुख्य कार्यकारी अधिकारी-उपाध्यक्ष मिलिंद म्हैसकर यांनी बॉम्बे डाइंग, स्प्रिंग मिल, बॉम्बे डाइंग टेक्सटाइल, श्रीनिवास गिरण्यांच्या घरांची सोडत रविवार, १ मार्चला काढण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले. ही सोडत म्हाडाच्या वांद्रे येथील मुख्यालयात सकाळी १० वाजता निघणार आहे. यासंदर्भात चर्चा होत असतानाच गिरणी कामगारांच्या घरांच्या किमती १८ लाख रुपये झाल्याचेही नमूद करण्यात आले.
गिरणी कामगारांसाठीच्या घरांच्या किमती साडेनऊ लाख रुपये असल्याचे राज्य सरकारने यापूर्वी जाहीर केले आहे. मात्र आता करण्यात आलेल्या वाढीबाबात कामगार संघटनांना काहीच कल्पना देण्यात आलेली नाही. म्हाडाने घरांच्या किमती वाढवणे अन्यायकारक असून, नवीन किंमत कधीही मान्य होणारी नाही. त्यामुळे ही किंमत पूर्वीप्रमाणे साडेनऊ लाख रुपयेच ठेवावी, अन्यथा तीव्र आंदोलन पुकारले जाईल.
- प्रवीण घाग, गिरणी कामगार कृती संघटना
- वाढीव किमतीने कामगारांमध्ये नाराजी
- वाढ मागे न घेतल्यास आंदोलनाचा इशारा
म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई
गिरणी कामगारांच्या घरांच्या किंमती अचानक साडेनऊऐवजी १८ लाखांवर गेल्याचे गुरुवारी समोर आले. गिरणी कामगारांच्या घरांविषयी मंत्रालयात झालेल्या बैठकीत या घरांची किंमत दुप्पट झाल्याचे ऐकताच कामगार संघटनांचे प्रतिनिधी अवाक् झाले. आतापर्यंत झालेल्या बैठकांत घरांच्या किंमती वाढविण्यासंदर्भात चकार शब्द निघाला नव्हता. त्यामुळे गिरणी कामगारांची बाजू न ऐकता परस्पर घेतलेल्या या निर्णयाने संघटना आक्रमक झाल्या आहेत. ही वाढ मागे न घेतल्यास आंदोलन पुकारण्याचा इशारा गिरणी कामगार कृती संघटनेने दिला आहे.
राज्य सरकारने गिरणी कामगारांसाठी घरांची योजना जाहीर केली आहे. त्या घरांची सोडत निघण्यास कमालीचा विलंब होत असल्याने कामगार संघटना नाराज आहेत. या पार्श्वभूमीवर गिरणी कामगारांच्या प्रलंबित प्रश्नासंदर्भात राज्याचे सचिव अजय मेहता यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी बैठक आयोजित करण्यात आली होती. यात वरिष्ठ अधिकाऱ्यांसह गिरणी कामगार संघटनेचे प्रतिनिधी उपस्थित होते. गिरणी कामगारांची घरे म्हाडाकडून बांधली जाणार आहेत. राज्य सरकारने या घरांच्या किंमती साडेनऊ लाख रुपये असल्याचे यापूर्वीही जाहीर केले आहे. त्यामुळे अचानक झालेल्या वाढीने कृती संघटना चक्रावल्या असून, हा निर्णय कधी घेण्यात आला, याची सूतराम कल्पना संघटनांना नसल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे सरकारने घेतलेल्या हा निर्णय अयोग्य असल्याचे सांगत त्यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे.
मंत्रालयात झालेल्या बैठकीत म्हाडाचे मुख्य कार्यकारी अधिकारी-उपाध्यक्ष मिलिंद म्हैसकर यांनी बॉम्बे डाइंग, स्प्रिंग मिल, बॉम्बे डाइंग टेक्सटाइल, श्रीनिवास गिरण्यांच्या घरांची सोडत रविवार, १ मार्चला काढण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले. ही सोडत म्हाडाच्या वांद्रे येथील मुख्यालयात सकाळी १० वाजता निघणार आहे. यासंदर्भात चर्चा होत असतानाच गिरणी कामगारांच्या घरांच्या किमती १८ लाख रुपये झाल्याचेही नमूद करण्यात आले.
गिरणी कामगारांसाठीच्या घरांच्या किमती साडेनऊ लाख रुपये असल्याचे राज्य सरकारने यापूर्वी जाहीर केले आहे. मात्र आता करण्यात आलेल्या वाढीबाबात कामगार संघटनांना काहीच कल्पना देण्यात आलेली नाही. म्हाडाने घरांच्या किमती वाढवणे अन्यायकारक असून, नवीन किंमत कधीही मान्य होणारी नाही. त्यामुळे ही किंमत पूर्वीप्रमाणे साडेनऊ लाख रुपयेच ठेवावी, अन्यथा तीव्र आंदोलन पुकारले जाईल.
- प्रवीण घाग, गिरणी कामगार कृती संघटना