म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबईः राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांना सक्तवसुली संचलनालयाने (ईडी) अटक केल्याचे महाविकास आघाडीत तीव्र पडसाद उमटले आहेत. केंद्रातील तपास यंत्रणा गेल्या काही महिन्यांपासून राज्यातील सरकार तसेच मंत्र्यांविरोधात कारवाई करण्याच्या तयारीत असल्याचे स्पष्टच दिसत होते. त्यादृष्टीने आवश्यक पार्श्वभूमी तयार करीत नवाब मलिक यांच्या निमित्ताने केंद्रीय यंत्रणांच्या माध्यमातून हा राजकीय डाव साधला गेल्याची भावना महाविकास आघाडीमध्ये आहे. तसेच अशावेळी भाजपच्या राज्यातील काही नेत्यांविरोधात गैरव्यवहार तसेच भ्रष्टाचाराचे थेट पुरावे असतानाही कचखाऊ धोरण बाळगल्याचाच हा परिपाक आहे. त्यामुळे आता तरी राज्यातील सत्ताधारी पक्षांच्या नेतृत्वाने जागे होत केंद्राच्या या कारवाईला जशास तसे उत्तर द्यावे, अशी उघड मागणी सत्ताधारी पक्षांतील सर्वच मंत्री एकमुखाने करू लागले आहेत.
दरम्यान, महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांच्या मंत्र्यांशी संवाद साधला असता, त्यांच्यामध्ये मलिक यांच्या अटकेमुळे धास्तीचे, संतापाचे व संभ्रमाचे वातावरण असल्याचे जाणवले. कशाचाही संबंध लावून केंद्रीय संस्था अटक करणार असतील व त्यास जशास तसे उत्तर मिळणार नसेल, तर या सरकारमध्ये मंत्री म्हणून कोणताही निर्णय घेणेही धोकादायक आहे, अशा शब्दांत शिवसेनेच्या व राष्ट्रवादीच्या ज्येष्ठ मंत्र्यांनी 'मटा'समोर भावना व्यक्त केली. मलिक यांनी एनआयबीच्या अधिकाऱ्याच्या विरोधात पुराव्यांसह आरोप केले होते. त्यामुळेच चवताळून ही कारवाई झाल्याचे राष्ट्रवादीच्या बहुतांश मंत्र्यांचे मत आहे. पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी पक्षातील मंत्र्यांची ही अस्वस्थता लक्षात घेऊन पक्षाच्या तसेच काँग्रेसच्याही ज्येष्ठ मंत्र्यांची तातडीची बैठक बुधवारी सिल्व्हर ओक येथे घेतली. मात्र राष्ट्रवादीतील प्रमुख आमदार, मंत्री, नेते आदींमध्ये प्रचंड धास्ती, संभ्रमाचे वातावरण होते. राष्ट्रवादीच्या एका ज्येष्ठ मंत्र्याने 'मटा'ला सांगितले की, गेल्या सरकारमधील अनेक गैरप्रकार या सरकारलाही माहीत आहेत. मात्र गृह खात्याचे आधीचे मंत्रीच तुरुंगात गेल्यावर गृह खाते ताक सोडा, आइसक्रीमही फुंकून फुंकून खात आहे. इतक्या घाबरलेल्या सरकारकडून काहीही होणार नाही, हे माहीत असल्यानेच केंद्रीय संस्थांना व विरोधी पक्षातील वाचाळ नेत्यांची शक्ती वाढली आहे.
शिवसेनेतील मंत्रीही मलिक यांच्या अटकेमुळे अस्वस्थ आहेत. राज्याचे गृह खाते नक्की करते काय, असा संतप्त सवाल शिवसेनेच्या एका मुंबईस्थित नेत्याने 'मटा'शी बोलताना केला. उत्तर महाराष्ट्रातील भाजपच्या एका आमदाराच्या घोटाळ्याच्या सगळ्या फायली तयार आहेत. सहकार खात्यातील घोटाळ्यात भाजपचा एक नेता अडकल्याचे कागदपत्रे दर्शवतात. एकेकाळी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असताना अनेक कंत्राटे मिळवत गब्बर झालेला आणि आता भाजपमध्ये जाऊन सतत आरोप करणाऱ्या एका नेत्याच्या घोटाळ्यांची कागदपत्रेही आर्थिक गुन्हे शाखेकडे आहेत. मात्र असे असतानाही त्यांच्याविरोधात कारवाई करण्यासाठी काहीच पावले उचलली जात नाहीत. केंद्रातील यंत्रणा गेल्या काही महिन्यांपासून जाणीवपूर्वक पार्श्वभूमी तयार करीत आहे. माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांनी एवढ्या कालावधीनंतर थेट मुख्यमंत्री आणि मंत्र्यांचीच नावे घेणे हा कशाचा भाग असू शकतो, त्यांना मजबूत पाठबळ मिळाल्याशिवाय ते अशी भूमिका घेतील का, असा सवालच या निमित्ताने संबंधित मंत्र्याने केला.
राज्याच्या गृह खात्याकडे नजरा
राष्ट्रवादी, काँग्रेस, शिवसेना या तिन्ही पक्षांचे ज्येष्ठ नेते मलिक यांच्या अटकेच्या पार्श्वभूमीवर अनेक तास चर्चा केल्यानंतर काही कठोर पावले उचलावीच लागतील या मतापर्यंत आल्याचे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले. मलिक यांच्याकडे ईडीच्या काही अधिकाऱ्यांच्या गैरव्यवहाराचे पुरावे होते. ते पुरावे त्यांनी सरकारमधील एका ज्येष्ठ मंत्र्याला तसेच राष्ट्रवादीच्याही एका मोठ्या नेत्याला दिले आहेत. त्यामुळे याबाबतीतही गुन्हा नोंदवावा, तसेच मागील सरकारमधील घोटाळ्यांबाबत आता गृह खात्याने तत्काळ कठोर पावले उचलण्यास सुरुवात करावी, असे तिन्ही पक्षांच्या नेत्यांच्या मंथनानंतर ठरले असल्याचे समजते.
दरम्यान, महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांच्या मंत्र्यांशी संवाद साधला असता, त्यांच्यामध्ये मलिक यांच्या अटकेमुळे धास्तीचे, संतापाचे व संभ्रमाचे वातावरण असल्याचे जाणवले. कशाचाही संबंध लावून केंद्रीय संस्था अटक करणार असतील व त्यास जशास तसे उत्तर मिळणार नसेल, तर या सरकारमध्ये मंत्री म्हणून कोणताही निर्णय घेणेही धोकादायक आहे, अशा शब्दांत शिवसेनेच्या व राष्ट्रवादीच्या ज्येष्ठ मंत्र्यांनी 'मटा'समोर भावना व्यक्त केली. मलिक यांनी एनआयबीच्या अधिकाऱ्याच्या विरोधात पुराव्यांसह आरोप केले होते. त्यामुळेच चवताळून ही कारवाई झाल्याचे राष्ट्रवादीच्या बहुतांश मंत्र्यांचे मत आहे. पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी पक्षातील मंत्र्यांची ही अस्वस्थता लक्षात घेऊन पक्षाच्या तसेच काँग्रेसच्याही ज्येष्ठ मंत्र्यांची तातडीची बैठक बुधवारी सिल्व्हर ओक येथे घेतली. मात्र राष्ट्रवादीतील प्रमुख आमदार, मंत्री, नेते आदींमध्ये प्रचंड धास्ती, संभ्रमाचे वातावरण होते. राष्ट्रवादीच्या एका ज्येष्ठ मंत्र्याने 'मटा'ला सांगितले की, गेल्या सरकारमधील अनेक गैरप्रकार या सरकारलाही माहीत आहेत. मात्र गृह खात्याचे आधीचे मंत्रीच तुरुंगात गेल्यावर गृह खाते ताक सोडा, आइसक्रीमही फुंकून फुंकून खात आहे. इतक्या घाबरलेल्या सरकारकडून काहीही होणार नाही, हे माहीत असल्यानेच केंद्रीय संस्थांना व विरोधी पक्षातील वाचाळ नेत्यांची शक्ती वाढली आहे.
शिवसेनेतील मंत्रीही मलिक यांच्या अटकेमुळे अस्वस्थ आहेत. राज्याचे गृह खाते नक्की करते काय, असा संतप्त सवाल शिवसेनेच्या एका मुंबईस्थित नेत्याने 'मटा'शी बोलताना केला. उत्तर महाराष्ट्रातील भाजपच्या एका आमदाराच्या घोटाळ्याच्या सगळ्या फायली तयार आहेत. सहकार खात्यातील घोटाळ्यात भाजपचा एक नेता अडकल्याचे कागदपत्रे दर्शवतात. एकेकाळी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असताना अनेक कंत्राटे मिळवत गब्बर झालेला आणि आता भाजपमध्ये जाऊन सतत आरोप करणाऱ्या एका नेत्याच्या घोटाळ्यांची कागदपत्रेही आर्थिक गुन्हे शाखेकडे आहेत. मात्र असे असतानाही त्यांच्याविरोधात कारवाई करण्यासाठी काहीच पावले उचलली जात नाहीत. केंद्रातील यंत्रणा गेल्या काही महिन्यांपासून जाणीवपूर्वक पार्श्वभूमी तयार करीत आहे. माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांनी एवढ्या कालावधीनंतर थेट मुख्यमंत्री आणि मंत्र्यांचीच नावे घेणे हा कशाचा भाग असू शकतो, त्यांना मजबूत पाठबळ मिळाल्याशिवाय ते अशी भूमिका घेतील का, असा सवालच या निमित्ताने संबंधित मंत्र्याने केला.
राज्याच्या गृह खात्याकडे नजरा
राष्ट्रवादी, काँग्रेस, शिवसेना या तिन्ही पक्षांचे ज्येष्ठ नेते मलिक यांच्या अटकेच्या पार्श्वभूमीवर अनेक तास चर्चा केल्यानंतर काही कठोर पावले उचलावीच लागतील या मतापर्यंत आल्याचे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले. मलिक यांच्याकडे ईडीच्या काही अधिकाऱ्यांच्या गैरव्यवहाराचे पुरावे होते. ते पुरावे त्यांनी सरकारमधील एका ज्येष्ठ मंत्र्याला तसेच राष्ट्रवादीच्याही एका मोठ्या नेत्याला दिले आहेत. त्यामुळे याबाबतीतही गुन्हा नोंदवावा, तसेच मागील सरकारमधील घोटाळ्यांबाबत आता गृह खात्याने तत्काळ कठोर पावले उचलण्यास सुरुवात करावी, असे तिन्ही पक्षांच्या नेत्यांच्या मंथनानंतर ठरले असल्याचे समजते.