मुंबईः वादग्रस्त वक्तव्यांमुळं नेहमी चर्चेत असणारी बॉलिवूडची अभिनेत्री कंगना राणावत (Kangana Ranaut)हिच्या अडचणीत वाढ झाली आहे. शीखधर्मीयांबद्दल अपशब्द वापरून भावना भडकाविणारा संदेश पोस्ट केल्याप्रकरणी तिच्या विरोधात खार पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यावरुन राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांनी कंगनावर जोरदार निशाणा साधला आहे. कंगनाने इन्स्टाग्रामवर टाकलेल्या एका पोस्टमध्ये शीखधर्मियांना 'खलिस्तानी दहशतवादी' संबोधले आहे. 'दिल्लीच्या सीमेवर सुरू असलेले आंदोलन ही एक खलिस्तानी चळवळच आहे, असेही तिने म्हटले आहे. इतकेच नाही तर १९८४च्या शीख हत्याकांडाची आठवण करून देत दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी शीखधर्मियांना डासासारखे चिरडले होते, असेही म्हटले होते. कंगनाच्या या पोस्टनंतर तिच्या विरोधात खार पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत नवाब मलिक यांनी प्रतिक्रिया देत कंगनावर टीका केली आहे.
वाचाः देवेंद्र फडणवीस मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या भेटीला; चर्चेला उधाण
कंगनाची वादग्रस्त वक्तव्यांची मालिका थांबतच नाहीये. कधी ती महात्मा गांधींचा अपमान करते तर कधी स्वातंत्र्यांवर टिप्पणी करते. आता तर तिने शीख समुदायाला खलिस्तानी आणि मच्छर असं म्हटलं आहे. केंद्र सरकारने कंगनाला कितीही झेड+ सुरक्षा पुरवली तरीही तिच्यावर कारवाई होणारच, असं नावाब मलिक यांनी ठणकावले आहे.
वाचाः राज्यात तिसऱ्या लाटेचा धोका किती?; राजेश टोपेंनी दिली महत्त्वाची माहिती
दरम्यान, कंगनानं केलेल्या या वादग्रस्त पोस्टनंतर दिल्ली शीख गुरुद्वारा व्यवस्थापन समितीच्या शिष्टमंडळाने तिच्या विरोधात खार पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. तिच्या या विधानांमुळे शीख समुदायाच्या भावना दुखावल्या आहेत. तिच्याविरोधात गुन्हा दाखल करावा, असे तक्रारीत म्हटले आहे. या तक्रारीनुसार कंगनाच्या विरोधात कलम २९५(अ) अन्वये धार्मिक भावना भडकाविल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुंबईच्या दादर नायगाव येथील गुरुद्वारा समितीनेही कंगना विरुद्ध पोलिसांत लेखी तक्रार केली आहे.
वाचाः शशिकांत शिंदेंच्या पराभवाचे शरद पवारांचे एका वाक्यात विश्लेषण, म्हणाले...
वाचाः देवेंद्र फडणवीस मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या भेटीला; चर्चेला उधाण
कंगनाची वादग्रस्त वक्तव्यांची मालिका थांबतच नाहीये. कधी ती महात्मा गांधींचा अपमान करते तर कधी स्वातंत्र्यांवर टिप्पणी करते. आता तर तिने शीख समुदायाला खलिस्तानी आणि मच्छर असं म्हटलं आहे. केंद्र सरकारने कंगनाला कितीही झेड+ सुरक्षा पुरवली तरीही तिच्यावर कारवाई होणारच, असं नावाब मलिक यांनी ठणकावले आहे.
वाचाः राज्यात तिसऱ्या लाटेचा धोका किती?; राजेश टोपेंनी दिली महत्त्वाची माहिती
दरम्यान, कंगनानं केलेल्या या वादग्रस्त पोस्टनंतर दिल्ली शीख गुरुद्वारा व्यवस्थापन समितीच्या शिष्टमंडळाने तिच्या विरोधात खार पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. तिच्या या विधानांमुळे शीख समुदायाच्या भावना दुखावल्या आहेत. तिच्याविरोधात गुन्हा दाखल करावा, असे तक्रारीत म्हटले आहे. या तक्रारीनुसार कंगनाच्या विरोधात कलम २९५(अ) अन्वये धार्मिक भावना भडकाविल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुंबईच्या दादर नायगाव येथील गुरुद्वारा समितीनेही कंगना विरुद्ध पोलिसांत लेखी तक्रार केली आहे.
वाचाः शशिकांत शिंदेंच्या पराभवाचे शरद पवारांचे एका वाक्यात विश्लेषण, म्हणाले...