अ‍ॅपशहर

प्रशासनात मुस्लिम टक्का वाढवण्यासाठी 'मिशन दोस्ती'

मुस्लिम समाजाचा प्रशासनात अत्यंत कमी प्रतिनिधित्व मिळालेल्या मुस्लिम समाजाचा प्रशासनातील टक्का वाढवण्यासाठी मुंबई पोलिसांनी एक महत्त्वाकांक्षी प्रकल्प हाती घेतला आहे. मिशन दोस्ती असं या उपक्रमाला नाव देण्यात आलंय. या उपक्रमांतर्गत मुस्लिम समाजातील विद्यार्थ्यांना स्पर्धात्मक परीक्षांसाठी व्यावसायिक पद्धतीने प्रशिक्षण देण्यात येणार आहे.

Maharashtra Times 22 Jul 2017, 7:01 pm
मटा ऑनलाइन वृत्त। मुंबई
महाराष्ट्र टाइम्स.कॉम mission dosti programme by mumbai police to increase percentage of muslims in administration
प्रशासनात मुस्लिम टक्का वाढवण्यासाठी 'मिशन दोस्ती'


प्रशासनात अत्यंत कमी प्रतिनिधित्व मिळालेल्या मुस्लिम समाजाचा प्रशासनातील टक्का वाढवण्यासाठी मुंबई पोलिसांनी एक महत्त्वाकांक्षी प्रकल्प हाती घेतला आहे. मिशन दोस्ती असं या उपक्रमाला नाव देण्यात आलंय. या उपक्रमांतर्गत मुस्लिम समाजातील विद्यार्थ्यांना स्पर्धात्मक परीक्षांसाठी व्यावसायिक पद्धतीने प्रशिक्षण देण्यात येणार आहे. या उपक्रमाचं वैशिष्ठ्य म्हणजे हे संपूर्ण प्रशिक्षण विनामूल्य देण्यात येणार आहे. मुंबईचे पोलिस आयुक्त दत्ता पडसलगीकर यांच्या संकल्पनेतू हा उपक्रम आकाराला येत आहे.

जुलैच्या शेवटच्या आठवड्यात सीएसएमटीजवळील अंजुमन इस्लाम सभागृहात या उपक्रमाची सुरूवात करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित राहणार आहेत. यावेळी उपस्थित राहणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी कार्यशाळाही आयोजित करण्यात येणार आहे.

हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी मुस्लिम बहुल विभागांमधील महाविद्यालयांच्या प्राचार्यांना पत्रं पाठवण्यात आली आहेत. या उपक्रमासाठी विद्यार्थ्यांना २२ जुलैपर्यंत आपली नोंदणी करावी लागणार आहे. सुरूवातील हा उपक्रम प्रायोगिक तत्वावर राबवण्यात येणार आहे. पुढे विद्यार्थ्यांचा प्रतिसाद पाहून पुढील दिशा ठरणार आहे.

कशी असेल मिशन दोस्ती?

>प्रशिक्षणासाठी १०० जणांची पहिली तुकडी तयार करणार
> प्रशिक्षणाचा कालावधी ५ आठवड्यांचा असेल
> सोमवार ते शनिवार संध्याकाळी सहा ते रात्री आठ वाजेपर्यंत प्रशिक्षण देण्यात येईल.
> प्रशिक्षण देण्यासाठी ६ तज्ज्ञ प्रशिक्षकांची नियुक्ती केली जाईल.
> अधिक विद्यार्थ्यांनी नोंदणी केल्यास प्रवेश परीक्षा घेऊन गुणवत्तेवर होणार निवड
> पहिल्या टप्प्यातील प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर दर आठवड्या प्रशिक्षण दिले जाईल.
> पदवीच्या पहिल्या वर्षाला असलेले विद्यार्थी, पदवी परीक्षा उत्तीर्ण झालेले विद्यार्थी, इंजीनिअरींग, लॉ, मॅनेजमेंट अशा विषयांमध्ये पदवीधर झालेले विद्यार्थी या उपक्रमासाठी अर्ज करू शकतील.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज