मुंबई
मुंबई विद्यापीठाच्या अनागोंदी कारभाराचा फटका मुंबईतील एका विद्यार्थिनीला बसला असून, तिची ‘यूपीएससी’च्या क्लास २मधील नोकरीची संधी पणाला लागली आहे. मेघा चव्हाण असे तिचे नाव असून, लॉ अभ्यासक्रमांच्या दीक्षांत प्रमाणपत्रावर वडिलांचे नाव चुकविल्याने तिला तिचे प्रमाणपत्र सादर करता आलेले नाही. या दुरुस्तीसाठी महिन्याभरापूर्वी अर्ज करूनही अद्याप या विद्यार्थिनीला प्रमाणपत्र देण्यात आलेले नाही. दरम्यान, यासंदर्भात विद्यापीठाशी संपर्क साधला असता, आज, मंगळवारी नाव दुरुस्त केलेले प्रमाणपत्र विद्यार्थिनीच्या हाती देण्यात येईल, असे आश्वासन विद्यापीठाकडून देण्यात आले.
मेघा चव्हाण हिने सन २०११ मध्ये लॉचे पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले आहे. त्यावेळी तिला देण्यात आलेल्या गुणपत्रिकेत मेघाच्या वडिलांचे नाव चुकविण्यात आले होते. मेघाच्या वडिलांचे नाव सुनील असून, गुणपत्रिकेवर त्यांचे नाव ‘सुमल’ असे छापून आले होते. त्यावेळी मेघाने विद्यापीठाशी संपर्क साधून गुणपत्रिकेत दुरुस्ती करून घेतली. मात्र, त्यानंतर सात ते आठ महिन्यानंतर आलेल्या दीक्षांत प्रमाणपत्रवरही वडिलांचे चुकीचे नाव छापण्याचा पराक्रम विद्यापीठाने केला.
मेघा चव्हाण हिने सन २०११ मध्ये लॉचे पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले आहे. त्यावेळी तिला देण्यात आलेल्या गुणपत्रिकेत मेघाच्या वडिलांचे नाव चुकविण्यात आले होते. नंतर ही चूक सुधारून गुणपत्रिका दुरुस्त करून देण्यात आली. मात्र, पुढे दीक्षांत प्रमाणपत्रावरही मेघाच्या वडिलांचे नाव चुकवण्यात आले. दुरुस्ती केलेली गुणपत्रिका हातात असल्याने तिने त्याकडे लक्ष दिले नाही. मात्र, नुकत्याच झालेल्या यूपीएससीच्या क्लास २ च्या ट्रेड मार्क इंडिकेच्या भरतीसाठी तिने अर्ज केला असून, त्यावेळी वडिलांच्या नावात चूक असलेले प्रमाणपत्र सादर केल्यास नोकरी गमवावी लागेल, अशी चिंता तिला भेडसावत आहे.
या पदासाठी झालेल्या मुलाखतीनंतर या नोकरीसाठी मेघाची निवड करण्यात आली आहे. त्यासाठी कागदपत्रे सादर करण्याची सूचना यूपीएससीकडून करण्यात आली. मात्र, प्रमाणपत्रावर वडिलांचे नाव चुकीचे असल्याने तिने २४ मे रोजी विद्यापीठाकडे प्रमाणपत्रावरील नाव दुरुस्तीसाठी अर्ज केला होता. पण, एक महिना होऊनही तिला दुरुस्ती केलेले प्रमाणपत्र देण्यात आलेले नाही. मेघाने यूपीएससीकडे पत्रव्यवहार करून विद्यापीठाकडे केलेल्या अर्जाची प्रत जोडून कागदपत्रे सादर करण्यासाठी मुदत मागितली. यूपीएससीने तिची ही मागणी मान्य केली असली तरी अजूनही नवे प्रमाणपत्र सादर न केल्याने मेघाची नोकरीची संधी हुकण्याची भिती आहे.
गेल्या काही दिवसांपासून मेघा विद्यापीठाच्या खेटा मारत असून तिला आज, मंगळवारी प्रमाणपत्र देण्यात येईल, असे विद्यापीठाने कळविले आहे. मात्र, याआधीही अशी आश्वासने देण्यात आल्याने मंगळवारी तरी प्रमाणपत्र मिळेल का, असा मेघाचा प्रश्न आहे. यासंदर्भात परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक दीपक वसावे यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही. ‘याप्रश्नी विद्यापीठ प्रशासनाकडून आश्वासनाखेरीज काहीही मिळाले नाही. या विद्यार्थिनीला नोकरी गमवावी लागल्यास त्यासाठी विद्यापीठच जबाबदार राहील’, असे मनविसेचे माजी सिनेट सदस्य सुधाकर तांबोळी यांनी बजावले.
मुंबई विद्यापीठाच्या अनागोंदी कारभाराचा फटका मुंबईतील एका विद्यार्थिनीला बसला असून, तिची ‘यूपीएससी’च्या क्लास २मधील नोकरीची संधी पणाला लागली आहे. मेघा चव्हाण असे तिचे नाव असून, लॉ अभ्यासक्रमांच्या दीक्षांत प्रमाणपत्रावर वडिलांचे नाव चुकविल्याने तिला तिचे प्रमाणपत्र सादर करता आलेले नाही. या दुरुस्तीसाठी महिन्याभरापूर्वी अर्ज करूनही अद्याप या विद्यार्थिनीला प्रमाणपत्र देण्यात आलेले नाही. दरम्यान, यासंदर्भात विद्यापीठाशी संपर्क साधला असता, आज, मंगळवारी नाव दुरुस्त केलेले प्रमाणपत्र विद्यार्थिनीच्या हाती देण्यात येईल, असे आश्वासन विद्यापीठाकडून देण्यात आले.
मेघा चव्हाण हिने सन २०११ मध्ये लॉचे पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले आहे. त्यावेळी तिला देण्यात आलेल्या गुणपत्रिकेत मेघाच्या वडिलांचे नाव चुकविण्यात आले होते. मेघाच्या वडिलांचे नाव सुनील असून, गुणपत्रिकेवर त्यांचे नाव ‘सुमल’ असे छापून आले होते. त्यावेळी मेघाने विद्यापीठाशी संपर्क साधून गुणपत्रिकेत दुरुस्ती करून घेतली. मात्र, त्यानंतर सात ते आठ महिन्यानंतर आलेल्या दीक्षांत प्रमाणपत्रवरही वडिलांचे चुकीचे नाव छापण्याचा पराक्रम विद्यापीठाने केला.
मेघा चव्हाण हिने सन २०११ मध्ये लॉचे पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले आहे. त्यावेळी तिला देण्यात आलेल्या गुणपत्रिकेत मेघाच्या वडिलांचे नाव चुकविण्यात आले होते. नंतर ही चूक सुधारून गुणपत्रिका दुरुस्त करून देण्यात आली. मात्र, पुढे दीक्षांत प्रमाणपत्रावरही मेघाच्या वडिलांचे नाव चुकवण्यात आले. दुरुस्ती केलेली गुणपत्रिका हातात असल्याने तिने त्याकडे लक्ष दिले नाही. मात्र, नुकत्याच झालेल्या यूपीएससीच्या क्लास २ च्या ट्रेड मार्क इंडिकेच्या भरतीसाठी तिने अर्ज केला असून, त्यावेळी वडिलांच्या नावात चूक असलेले प्रमाणपत्र सादर केल्यास नोकरी गमवावी लागेल, अशी चिंता तिला भेडसावत आहे.
या पदासाठी झालेल्या मुलाखतीनंतर या नोकरीसाठी मेघाची निवड करण्यात आली आहे. त्यासाठी कागदपत्रे सादर करण्याची सूचना यूपीएससीकडून करण्यात आली. मात्र, प्रमाणपत्रावर वडिलांचे नाव चुकीचे असल्याने तिने २४ मे रोजी विद्यापीठाकडे प्रमाणपत्रावरील नाव दुरुस्तीसाठी अर्ज केला होता. पण, एक महिना होऊनही तिला दुरुस्ती केलेले प्रमाणपत्र देण्यात आलेले नाही. मेघाने यूपीएससीकडे पत्रव्यवहार करून विद्यापीठाकडे केलेल्या अर्जाची प्रत जोडून कागदपत्रे सादर करण्यासाठी मुदत मागितली. यूपीएससीने तिची ही मागणी मान्य केली असली तरी अजूनही नवे प्रमाणपत्र सादर न केल्याने मेघाची नोकरीची संधी हुकण्याची भिती आहे.
गेल्या काही दिवसांपासून मेघा विद्यापीठाच्या खेटा मारत असून तिला आज, मंगळवारी प्रमाणपत्र देण्यात येईल, असे विद्यापीठाने कळविले आहे. मात्र, याआधीही अशी आश्वासने देण्यात आल्याने मंगळवारी तरी प्रमाणपत्र मिळेल का, असा मेघाचा प्रश्न आहे. यासंदर्भात परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक दीपक वसावे यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही. ‘याप्रश्नी विद्यापीठ प्रशासनाकडून आश्वासनाखेरीज काहीही मिळाले नाही. या विद्यार्थिनीला नोकरी गमवावी लागल्यास त्यासाठी विद्यापीठच जबाबदार राहील’, असे मनविसेचे माजी सिनेट सदस्य सुधाकर तांबोळी यांनी बजावले.