अ‍ॅपशहर

'केंद्रीय यंत्रणांचा आमदारांवर दबाव', नाना पटोले यांचा आरोप

विधान परिषद निवडणुकीसाठी उद्या मतदान होणार आहे. यासाठी सत्ताधारी आणि विरोधी पक्षांनी कंबर कसली आहे. आता काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी गंभीर आरोप केला आहे. यासोबतच त्यांनी दावाही केला आहे.

Authored byम. टा. प्रतिनिधी | महाराष्ट्र टाइम्स 19 Jun 2022, 8:26 am
म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई ः विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्ष मतांची बेगमी करीत असतानाच, मतदार असलेल्या आमदारांवर मतांसाठी केंद्रीय तपास यंत्रणेचा वापर करून दबाव टाकला जात असल्याचा आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी शनिवारी केला. यासंबंधीचे रेकॉर्डिंग आपल्याकडे असल्याचा दावाही त्यांनी यावेळी केला.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम mlc election maharashtra nana patole allegations on central government
'केंद्रीय यंत्रणांचा आमदारांवर दबाव', नाना पटोले यांचा आरोप


मुंबईत पत्रकारांशी बोलताना पटोले यांनी हा आरोप केला. यावेळी त्यांनी विधान परिषद निवडणुकांपासून ते अग्निपथ योजनेपर्यंत अनेक मुद्द्यांवरून केंद्र सरकारवर टीका केली. 'विधान परिषदेवर निवडून येण्यासाठी भाजपला २२ मते लागणार आहेत. ती जमवणे त्यांना शक्य नसल्याने आता तपास यंत्रणांचा दुरुपयोग केला जात आहे. मात्र तरीही ते हरणारच आहेत. केंद्रीय तपास यंत्रणा आमदारांना संपर्क साधत आहेत. त्याचे रेकॉर्डिंग आमच्याकडे आहे', असे पटोले म्हणाले.

'विधान परिषद निवडणुकीतील सहा जागा महाविकास आघाडीच जिंकणार आहे. आम्ही सर्व आमदारांच्या संपर्कात आहोत. राज्यसभा निवडणुकीमध्ये काही गैरसमज झाले होते. पण आता अपक्ष आमदार आणि संजय राऊत यांच्यातील वाद संपला आहे,' असे पटोले यांनी सांगितले. 'मागील दोन वर्षांत स्वीस बँकेत २१२ टक्के पैसे वाढले आहेत. मात्र काँग्रेसला विनाकारण बदनाम केले गेले. आता सत्ता आणि पैसे कोणाकडे आहेत ते सगळ्यांना माहिती आहे. भाजपचा काळा चेहरा समोर आला आहे. अग्निपथवरून तरुण सरकारच्या विरोधात रस्त्यावर उतरले आहेत. ही भाजपच्या पराभवाची सुरुवात आहे', असेही ते म्हणाले.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज