म. टा. प्रतिनिधी, मुंबई वृक्षतोडीवरून सध्या सुरू असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर 'एमएमआरडीए'ने ठाणे जिल्ह्यात ५१ हजार रोपे लावली आहेत. या रोपलागवडीचा शेवटचा टप्पा मंगळवारी पूर्ण झाला. ठाणे जिल्ह्यातील गोठेघर शिळफाटा येथे ऑगस्टपासून रोपलागवडीची मोहीम हाती घेण्यात आली होती. एकूण ५१ हजार १०० रोपे या मोहीमेअंर्गत लावण्यात आली असून, त्यापैकी १० हजार रोपे ही टिटवाळा व कल्याण परिसरात लावण्यात आली आहेत. रोपे लावण्यापासून त्यांचे संगोपण व संरक्षणाची जबाबदारीही 'एमएमआरडीए'ने घेतली असून, पुढील तीन वर्षे त्यावर लक्ष ठेवण्यात येणार आहे. 'एमएमआरडीए'ने त्यासाठी खास उद्यान विभागाची स्थापना केली आहे. ४६ हेक्टर परिसरात रोपलागवड करण्यात आली असून, त्यात वड, बकुळ, पिंपळ, अर्जुन, कदंब या झाडांच्या समावेश आहे. 'एमएमआरडीए'ने सध्या अनेक विकासकामे हाती घेतली आहेत. ती करताना पर्यावरण संवर्धनालाही प्राधान्य देण्यात आले आहे, असे 'एमएमआरडीए'चे आयुक्त आर. ए. राजीव यांनी सांगितले.
'एमएमआरडीए'ने लावली ५१ हजार रोपे
म टा प्रतिनिधी, मुंबईवृक्षतोडीवरून सध्या सुरू असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर 'एमएमआरडीए'ने ठाणे जिल्ह्यात ५१ हजार रोपे लावली आहेत...
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 23 Oct 2019, 4:00 am