EDच्या कार्यालयावर येऊ नका; राज यांच्या कार्यकर्त्यांना सूचना
राज ठाकरे यांना आलेल्या नोटिशीनंतर आक्रमक झालेल्या व २२ ऑगस्ट रोजी 'ईडी'च्या कार्यालयावर धडकण्याच्या तयारीत असलेल्या मनसेनं अचानक आपला निर्णय बदलला आहे. मनसेच्या कार्यकर्त्यांनी 'ईडी'च्या कार्यालयावर येऊ नये, अशा सूचना पक्षाध्यक्ष राज ठाकरे यांनी दिल्या आहेत. तसं ट्विट त्यांनी केलं आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 20 Aug 2019, 3:26 pm
मुंबई: राज ठाकरे यांना आलेल्या नोटिशीनंतर आक्रमक झालेल्या व २२ ऑगस्ट रोजी 'ईडी'च्या कार्यालयावर धडकण्याच्या तयारीत असलेल्या मनसेनं अचानक आपला निर्णय बदलला आहे. मनसेच्या कार्यकर्त्यांनी 'ईडी'च्या कार्यालयावर येऊ नये, अशा सूचना पक्षाध्यक्ष राज ठाकरे यांनी दिल्या आहेत. तसं ट्विट त्यांनी केलं आहे.
'कोहिनूर स्क्वेअर' गैरव्यहार प्रकरणी 'ईडी'नं राज ठाकरे यांना नोटीस बजावली आहे. सत्ताधारी भाजप राजकीय सूडबुद्धीनं ही कारवाई करत असल्याची मनसैनिकाची भावना आहे. भाजपच्या या कारवाईला प्रत्युत्तर म्हणून मनसेनं २२ ऑगस्ट रोजी 'ईडी'च्या कार्यालयावर धडकण्याचा निर्णय घेतला होता. राज्यभरातील मनसैनिकांना 'ईडी'च्या कार्यालयासमोर हजर राहण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. त्यामुळं राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं होतं. हे प्रकरण चिघळण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती. मात्र, मनसेनं अचानक हा शांतता मोर्चा रद्द केला आहे.
ट्विटरच्या माध्यमातून राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना शांतता राखण्याचं आवाहन केलं आहे. 'माझ्यावर आतापर्यंत अनेक खटले दाखल झाले. प्रत्येक वेळी आपण सर्वांनी तपास यंत्रणा व न्यायालयाचा आदर केला आहे. आताही तेच करू. त्यामुळं येत्या २२ ऑगस्टला शांतता राखा. कुणीही 'ईडी'च्या कार्यालयाबाहेर जमू नका. तुम्हाला डिवचण्याचा प्रयत्न झाला तरी शांत राहा. बाकी या विषयावर मला जे बोलायचं आहे ते योग्य वेळी बोलेनच,' असंही राज यांनी म्हटलं आहे.
'राज'नीती! २२ ऑगस्टला अवघी मनसे EDच्या कार्यालयावर जाणार
'कोहिनूर स्क्वेअर' गैरव्यहार प्रकरणी 'ईडी'नं राज ठाकरे यांना नोटीस बजावली आहे. सत्ताधारी भाजप राजकीय सूडबुद्धीनं ही कारवाई करत असल्याची मनसैनिकाची भावना आहे. भाजपच्या या कारवाईला प्रत्युत्तर म्हणून मनसेनं २२ ऑगस्ट रोजी 'ईडी'च्या कार्यालयावर धडकण्याचा निर्णय घेतला होता. राज्यभरातील मनसैनिकांना 'ईडी'च्या कार्यालयासमोर हजर राहण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. त्यामुळं राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं होतं. हे प्रकरण चिघळण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती. मात्र, मनसेनं अचानक हा शांतता मोर्चा रद्द केला आहे.
ट्विटरच्या माध्यमातून राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना शांतता राखण्याचं आवाहन केलं आहे. 'माझ्यावर आतापर्यंत अनेक खटले दाखल झाले. प्रत्येक वेळी आपण सर्वांनी तपास यंत्रणा व न्यायालयाचा आदर केला आहे. आताही तेच करू. त्यामुळं येत्या २२ ऑगस्टला शांतता राखा. कुणीही 'ईडी'च्या कार्यालयाबाहेर जमू नका. तुम्हाला डिवचण्याचा प्रयत्न झाला तरी शांत राहा. बाकी या विषयावर मला जे बोलायचं आहे ते योग्य वेळी बोलेनच,' असंही राज यांनी म्हटलं आहे.
'राज'नीती! २२ ऑगस्टला अवघी मनसे EDच्या कार्यालयावर जाणार