म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई
भाजपच्या वीज बिल होळी आंदोलनानंतर आता मनसेने वाढीव वीज बिलांविरोधात राज्यव्यापी आंदोलनाची हाक दिली आहे. वाढीव वीज बिलाविरोधात राज्यभरातील जिल्हाधिकारी कार्यालयांवर काढण्यात आलेल्या मोर्चांना गुरुवारी काही ठिकाणी पोलिसांची परवानगी मिळाली, तर काही ठिकाणी विनापरवानगी मोर्चा काढण्यात आला. मुंबईतील मोर्चालाही मनसैनिकांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती. दरम्यान, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी वीज बिल भरू नका, असे आवाहन वीज ग्राहकांना केले आहे.
वाढीव वीज बिलांविरोधात जनतेला न्याय देण्यासाठी संपूर्ण राज्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने मोर्चे आयोजित केले होते. राज्यातील जिल्हाधिकारी कार्यालयांवर हे मोर्चे काढण्यात आले. एकाच वेळी संपूर्ण राज्यात निघालेल्या या मोर्चामध्ये मोठ्या संख्येने लोक सहभागी झाले होते. ज्या ठिकाणी पोलिसांची परवानगी मिळाली नाही, त्या ठिकाणी मनसेने विनापरवानगी मोर्चे काढले. त्यामुळे ठाणे आणि इतर काही ठिकाणी पोलिस आणि मनसैनिक यांच्यात धक्काबुक्की झाल्याचेही पाहायला मिळाले.
मुंबईत मनसेचे नेते बाळा नांदगावकर, संदीप देशपांडे, नितीन सरदेसाई आदींच्या उपस्थितीत वांद्रे जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. मोर्चाला महिलांनीही मोठ्या संख्येने हजेरी लावली होती. यावेळी बाळा नांदगावकर यांनी, 'स्वत:ला ठाकरे सरकार म्हणवून घेत असाल तर त्या सरकारवरचा लोकांचा विश्वास उडू देऊ नका. नाहीतर दुसरे ठाकरे आहेतच हे लक्षात ठेवा. लवकरात लवकर निर्णय घ्या', असा थेट इशारा दिला. तर, वीज बिल भरले नाही म्हणून वीज कनेक्शन कापायला कोणी आले, तर त्यांच्या कानाखाली इलेक्ट्रिक शॉक काढायला महाराष्ट्र सैनिक तयार आहेत, असे मनसे नेते संदीप देशपांडे यांनी सांगितले.
दरम्यान, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी जनतेला वीज बिल भरू नका, असे आवाहन केले आहे. वीज कनेक्शन कापायला कोणी आले, तर संघर्ष महाराष्ट्र सैनिकांसोबत होणार आहे, असेही राज ठाकरे यांनी म्हटले आहे.
भाजपच्या वीज बिल होळी आंदोलनानंतर आता मनसेने वाढीव वीज बिलांविरोधात राज्यव्यापी आंदोलनाची हाक दिली आहे. वाढीव वीज बिलाविरोधात राज्यभरातील जिल्हाधिकारी कार्यालयांवर काढण्यात आलेल्या मोर्चांना गुरुवारी काही ठिकाणी पोलिसांची परवानगी मिळाली, तर काही ठिकाणी विनापरवानगी मोर्चा काढण्यात आला. मुंबईतील मोर्चालाही मनसैनिकांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती. दरम्यान, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी वीज बिल भरू नका, असे आवाहन वीज ग्राहकांना केले आहे.
वाढीव वीज बिलांविरोधात जनतेला न्याय देण्यासाठी संपूर्ण राज्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने मोर्चे आयोजित केले होते. राज्यातील जिल्हाधिकारी कार्यालयांवर हे मोर्चे काढण्यात आले. एकाच वेळी संपूर्ण राज्यात निघालेल्या या मोर्चामध्ये मोठ्या संख्येने लोक सहभागी झाले होते. ज्या ठिकाणी पोलिसांची परवानगी मिळाली नाही, त्या ठिकाणी मनसेने विनापरवानगी मोर्चे काढले. त्यामुळे ठाणे आणि इतर काही ठिकाणी पोलिस आणि मनसैनिक यांच्यात धक्काबुक्की झाल्याचेही पाहायला मिळाले.
मुंबईत मनसेचे नेते बाळा नांदगावकर, संदीप देशपांडे, नितीन सरदेसाई आदींच्या उपस्थितीत वांद्रे जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. मोर्चाला महिलांनीही मोठ्या संख्येने हजेरी लावली होती. यावेळी बाळा नांदगावकर यांनी, 'स्वत:ला ठाकरे सरकार म्हणवून घेत असाल तर त्या सरकारवरचा लोकांचा विश्वास उडू देऊ नका. नाहीतर दुसरे ठाकरे आहेतच हे लक्षात ठेवा. लवकरात लवकर निर्णय घ्या', असा थेट इशारा दिला. तर, वीज बिल भरले नाही म्हणून वीज कनेक्शन कापायला कोणी आले, तर त्यांच्या कानाखाली इलेक्ट्रिक शॉक काढायला महाराष्ट्र सैनिक तयार आहेत, असे मनसे नेते संदीप देशपांडे यांनी सांगितले.
दरम्यान, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी जनतेला वीज बिल भरू नका, असे आवाहन केले आहे. वीज कनेक्शन कापायला कोणी आले, तर संघर्ष महाराष्ट्र सैनिकांसोबत होणार आहे, असेही राज ठाकरे यांनी म्हटले आहे.