मुंबई:
'कार्टुनहल्ल्या'नं केंद्र आणि राज्यातील भाजप सरकारला हादरवणारे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आता अवनी वाघिणीच्या मृत्यूवरून राज्यातील युती सरकारला चांगलंच फटकारलं आहे. अवनीची शिकार करणाऱ्या सत्ताधाऱ्यांना माज आला असून, २०१९मध्ये महाराष्ट्रच त्यांची शिकार करेल, असा हल्ला राज यांनी व्यंगचित्रातून चढवला आहे.
अवनी वाघिणीच्या मृत्यूवरून मोठं वादळ उठलं आहे. वन्यजीवप्रेमी आणि विरोधकांकडून राज्यातील भाजप सरकारवर टीका होत आहे. वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या राजीनाम्याचीही मागणी होत आहे. मुंबई, नागपूर, पुण्यासह राज्यभरात वन्यजीवप्रेमी निदर्शने करत आहेत. अवनी मृत्यू प्रकरणावरून चौफेर टीका होत असतानाच, राज ठाकरे यांनी व्यंगचित्रातून युती सरकारवर हल्ला चढवला आहे. २०१८मध्ये माज आलेल्या युती सरकारनं अवनी वाघिणीची शिकार केली. पण २०१९मध्ये 'वाघरूपी' महाराष्ट्रच अवनीच्या मारेकऱ्यांची शिकार करेल, असं राज यांनी व्यंगचित्रातून दाखवलं आहे.
'कार्टुनहल्ल्या'नं केंद्र आणि राज्यातील भाजप सरकारला हादरवणारे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आता अवनी वाघिणीच्या मृत्यूवरून राज्यातील युती सरकारला चांगलंच फटकारलं आहे. अवनीची शिकार करणाऱ्या सत्ताधाऱ्यांना माज आला असून, २०१९मध्ये महाराष्ट्रच त्यांची शिकार करेल, असा हल्ला राज यांनी व्यंगचित्रातून चढवला आहे.
अवनी वाघिणीच्या मृत्यूवरून मोठं वादळ उठलं आहे. वन्यजीवप्रेमी आणि विरोधकांकडून राज्यातील भाजप सरकारवर टीका होत आहे. वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या राजीनाम्याचीही मागणी होत आहे. मुंबई, नागपूर, पुण्यासह राज्यभरात वन्यजीवप्रेमी निदर्शने करत आहेत. अवनी मृत्यू प्रकरणावरून चौफेर टीका होत असतानाच, राज ठाकरे यांनी व्यंगचित्रातून युती सरकारवर हल्ला चढवला आहे. २०१८मध्ये माज आलेल्या युती सरकारनं अवनी वाघिणीची शिकार केली. पण २०१९मध्ये 'वाघरूपी' महाराष्ट्रच अवनीच्या मारेकऱ्यांची शिकार करेल, असं राज यांनी व्यंगचित्रातून दाखवलं आहे.