म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई
'आपल्याला सगळ्या गोष्टींकडे जातीच्या चष्म्यातून बघण्याची सवय लागली आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर दलितांचे, महात्मा फुले माळी समाजाचे, शिवाजी महाराज मराठ्यांचे …याच नजरेतून या महापुरुषांकडे आपण बघत आहोत. जातीच्या आधारावर राजकारणी सर्वसामान्यांना वापरून घेत आहेत, हे आपल्या लक्षातच येत नाही. हा महाराष्ट्र जातीच्या बाहेर बघणार की नाही,' असा करडा सवाल करीत, 'महाराष्ट्र नवनिर्माण सेने'चे प्रमुख राज ठाकरे यांनी, 'जातीच्या लेबलमुळेच विचका झाला आहे,' असा निष्कर्ष मांडला.
मुंबईमध्ये 'अपना सहकारी बँक' लिमिटेड प्रस्तुत महाराष्ट्र टाइम्स 'कलासंगम २०२०' या तीन दिवसांच्या साहित्य व सांस्कृतिक सोहळ्याचा समारोप रविवारी राज यांच्या मुलाखतीने झाला. 'जोशी एंटरप्रायझेस' या कार्यक्रमाचे सहप्रायोजक होते. गडकरी रंगायतनमध्ये ज्येष्ठ पत्रकार अंबरीश मिश्र यांनी घेतलेल्या राज यांच्या मुलाखतीला तुडुंब प्रतिसाद मिळाला. राजकारणातील राज; तसेच राजकारणाच्या पलीकडचे राज यांचा वेध घेणारी ही मुलाखत होती. 'गेल्या १० वर्षांत जातीच्या आधारावरील राजकारण वाढले आहे. प्रत्येक गोष्ट जातीय दृष्टिकोनातून पाहिली जात आहे. प्रत्येक गोष्टीलाच जातीचे लेबल लावले जात आहे. त्यामुळे सगळा विचका झाला आहे,' अशी खंत राज यांनी व्यक्त केली.
व्यंगचित्रकला, व्यंगचित्र सुचणे ते साकारण्याची प्रक्रिया, व्यंगचित्रांसाठी आवश्यक असणारी उपजत विनोदबुद्धी, चित्रकला, जे. जे. स्कूल ऑफ आर्टमधील दिवस, डेव्हिड लो ते आर. के. लक्ष्मण, बाळासाहेब ठाकरे यांच्या व्यंगचित्रांचा प्रभाव, परदेशातील कलाकार, वास्तू सौंदर्य, आवडते कलाकार, संगीतकार, त्या संगीतकारांचे मर्मस्थान… असे विविध पदर राज यांनी या मुलाखतीत उलगडून त्यांच्यातील राजकारणापलीकडचा अनोखा कलाकार श्रोत्यांसमोर पेश केला. मात्र, साहित्य, संस्कृती, कला या क्षेत्रात मुशाफिरी करतानाच त्यांनी आपल्या नेहमीच्या ठाकरी शैलीत सध्याचे राजकारण व समाजकारणाचा समाचारही घेतला.
'मराठीचा मुद्दा ऐरणीवर'
'पश्चिम बंगाल, गुजरात, तमिळनाडूसारख्या राज्यांत तेथील प्रादेशिक पक्षांची एकहाती सत्ता आहे; कारण तेथील जनतेला व राज्यकर्त्यांना त्यांच्या भाषेविषयी, संस्कृतीविषयी जाण आहे...अभिमान आहे. याउलट आपल्या येथे मराठीचा मुद्दा काढला, की काही राजकीय पक्ष आणि नेते, मराठीचा मुद्दा फक्त मुंबई पुण्यापुरता मर्यादित आहे, अशी उत्तरे देतात. या शहरांच्या बाहेरही मराठीचा मुद्दा ऐरणीवर आला आहे, ही बाब त्यांच्या गावीही नाही. त्यामुळेच आपल्या इथे प्रादेशिक पक्ष एकहाती सत्तेवर येत नाही,' असे निरीक्षण राज यांनी नोंदवले.
'आपल्याला सगळ्या गोष्टींकडे जातीच्या चष्म्यातून बघण्याची सवय लागली आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर दलितांचे, महात्मा फुले माळी समाजाचे, शिवाजी महाराज मराठ्यांचे …याच नजरेतून या महापुरुषांकडे आपण बघत आहोत. जातीच्या आधारावर राजकारणी सर्वसामान्यांना वापरून घेत आहेत, हे आपल्या लक्षातच येत नाही. हा महाराष्ट्र जातीच्या बाहेर बघणार की नाही,' असा करडा सवाल करीत, 'महाराष्ट्र नवनिर्माण सेने'चे प्रमुख राज ठाकरे यांनी, 'जातीच्या लेबलमुळेच विचका झाला आहे,' असा निष्कर्ष मांडला.
मुंबईमध्ये 'अपना सहकारी बँक' लिमिटेड प्रस्तुत महाराष्ट्र टाइम्स 'कलासंगम २०२०' या तीन दिवसांच्या साहित्य व सांस्कृतिक सोहळ्याचा समारोप रविवारी राज यांच्या मुलाखतीने झाला. 'जोशी एंटरप्रायझेस' या कार्यक्रमाचे सहप्रायोजक होते. गडकरी रंगायतनमध्ये ज्येष्ठ पत्रकार अंबरीश मिश्र यांनी घेतलेल्या राज यांच्या मुलाखतीला तुडुंब प्रतिसाद मिळाला. राजकारणातील राज; तसेच राजकारणाच्या पलीकडचे राज यांचा वेध घेणारी ही मुलाखत होती. 'गेल्या १० वर्षांत जातीच्या आधारावरील राजकारण वाढले आहे. प्रत्येक गोष्ट जातीय दृष्टिकोनातून पाहिली जात आहे. प्रत्येक गोष्टीलाच जातीचे लेबल लावले जात आहे. त्यामुळे सगळा विचका झाला आहे,' अशी खंत राज यांनी व्यक्त केली.
व्यंगचित्रकला, व्यंगचित्र सुचणे ते साकारण्याची प्रक्रिया, व्यंगचित्रांसाठी आवश्यक असणारी उपजत विनोदबुद्धी, चित्रकला, जे. जे. स्कूल ऑफ आर्टमधील दिवस, डेव्हिड लो ते आर. के. लक्ष्मण, बाळासाहेब ठाकरे यांच्या व्यंगचित्रांचा प्रभाव, परदेशातील कलाकार, वास्तू सौंदर्य, आवडते कलाकार, संगीतकार, त्या संगीतकारांचे मर्मस्थान… असे विविध पदर राज यांनी या मुलाखतीत उलगडून त्यांच्यातील राजकारणापलीकडचा अनोखा कलाकार श्रोत्यांसमोर पेश केला. मात्र, साहित्य, संस्कृती, कला या क्षेत्रात मुशाफिरी करतानाच त्यांनी आपल्या नेहमीच्या ठाकरी शैलीत सध्याचे राजकारण व समाजकारणाचा समाचारही घेतला.
'मराठीचा मुद्दा ऐरणीवर'
'पश्चिम बंगाल, गुजरात, तमिळनाडूसारख्या राज्यांत तेथील प्रादेशिक पक्षांची एकहाती सत्ता आहे; कारण तेथील जनतेला व राज्यकर्त्यांना त्यांच्या भाषेविषयी, संस्कृतीविषयी जाण आहे...अभिमान आहे. याउलट आपल्या येथे मराठीचा मुद्दा काढला, की काही राजकीय पक्ष आणि नेते, मराठीचा मुद्दा फक्त मुंबई पुण्यापुरता मर्यादित आहे, अशी उत्तरे देतात. या शहरांच्या बाहेरही मराठीचा मुद्दा ऐरणीवर आला आहे, ही बाब त्यांच्या गावीही नाही. त्यामुळेच आपल्या इथे प्रादेशिक पक्ष एकहाती सत्तेवर येत नाही,' असे निरीक्षण राज यांनी नोंदवले.