अ‍ॅपशहर

गणेशोत्सवात कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी विशेष गाड्या सोडा; मनसेची मागणी

मुंबई, ठाणे, पुणे भागातून हजारो चाकरमानी दरवर्षी गणेशोत्सवासाठी कोकणात येतात. करोना संसर्गामुळे या चाकरमान्यांपुढे यंदा मोठे विघ्न आले आहे. (kokan ganeshotsav)

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 13 Jul 2020, 4:07 pm
मुंबईः राज्यात करोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. या पार्श्वभूमीवर राज्यातील अनेक सण, उत्सव रद्द करण्यात आले आहेत. गणेशोत्सवावरही यंदा करोनाचे सावट आहे. त्यामुळं, मुंबई, ठाणे यासारख्या अन्य मोठ्या शहरात नोकरीनिमित्त असलेल्या लाखो चाकरमान्यांना कोकणातील मूळ गावी जायला मिळणार का? असा प्रश्न भेडसावत आहे. चाकरमान्यांच्या गावी जाण्याच्या मुद्द्यावरून राजकारही तापलं असतानाच आता मनसेनंही या मुद्द्यावरुन सरकारला घेरलं आहे. गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्यांसाठी सरकारनं सवलतीच्या दरात बस उपलब्ध करुन द्याव्यात, अशी मागणी मनसेचे आमदार राजू पाटील यांनी केली आहे. (kokan ganeshotsav)
महाराष्ट्र टाइम्स.कॉम raju patil



वाचा: गणपतीला गावी जाण्यासाठी नियमांचे विघ्न; 'हे' आहेत कळीचे सवाल

खासगी बसेस कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांकडून मनमानी भाडे आकारत आहेत. यासाठी सरकारनं गणपतीसाठी कोकणात जाणाऱ्यांसाठी सवलतीच्या दरात बस उपलब्ध करुन द्याव्यात तसंच, कोकणसाठी विशेष रेल्वे गाड्या सोडल्यास त्यांना या कठीण काळात दिलासा मिळेल. असं ट्विट महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे आमदार राजू पाटील यांनी केलं आहे.

वाचाः सिंधुदुर्गात ७ ऑगस्टनंतर प्रवेशबंदीचे 'ते' टिपण अखेर रद्द

दरम्यान, यंदा करोनाचं संकट असलं तरी गणेशोत्सवासाठी कोकणाच येणाऱ्या चाकरमान्यांसाठी नियमावली निश्चित करुन त्यांच्या वाटेतील विघ्न दूर करण्याचे प्रयत्न सुरु झाले आहेत. गणेशोत्सवात सिंधुदुर्ग जिल्ह्यात क्वारंटाइन कालावधी ७ दिवसांचा करण्याची खास परवानगी राज्य शासनाने केंद्र सरकारच्या आरोग्य विभागाकडून मिळवावी, अशी मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे करण्यात येणार असल्याचे विनायक राऊत यांनी सांगितले. याशिवाय येणाऱ्या चाकरमान्यांना ई-पास सुलभ मिळण्यासाठी प्रयत्न करावेत. येणाऱ्या चाकरमान्यांनी निघायच्या ४८ तास आधी करोना तपासणी करावी. यासाठी शासनाने मोफत अथवा एक हजार रुपयांत या चाचणीची व्यवस्था करावी, असे मुद्दे बैठकीत मांडण्यात आले होते.

महत्वाचे लेख