अ‍ॅपशहर

ठाकरे सरकारला टोला हाणत मनसेचे गांधीजींना अभिवादन

विधानसभा निवडणुकीच्या प्रचारातील उद्धव ठाकरे यांच्या एका भाषणाचा व्हिडिओ ट्वीट करत मनसेनं अनोख्या पद्धतीनं महात्मा गांधी यांना अभिवादन केलं आहे. (Sandeep Deshpande Tweet)

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 2 Oct 2020, 3:56 pm
मुंबई: राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त देशभरातून आज त्यांना अभिवादन केलं जात आहे. वेगवेगळ्या प्रकारे महात्मा गांधी यांना आदरांजली वाहिली जात आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं गांधी जयंतीचं औचित्य साधून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा एक व्हिडिओ ट्वीट केला आहे. उद्धव ठाकरे यांनी दिलेल्या एका आश्वासनाची आठवण देत राज्यातील ठाकरे सरकारला सन्मती देण्याची मागणी देवाकडे केली आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम ठाकरे सरकारला टोला हाणत मनसेचे गांधीजींना अभिवादन


वाचा: दसरा मेळावा होणार का?; शिवसेना म्हणते, उत्साहाला बांध कसा घालायचा?

२०१९ च्या विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात विविध पक्षांनी जनेतवर आश्वासनांची खैरात केली होती. सर्वसामान्यांसाठी महत्त्वाचा असलेला टोलचा प्रश्न सोडवण्याचं आश्वासन उद्धव ठाकरे यांनी दिलं होतं. राज्यात शिवसेनेचं सरकार आल्यानंतर महाराष्ट्र टोलमुक्त करण्याची घोषणा उद्धव ठाकरे यांनी केली होती. मात्र, ते आश्वासन अद्याप पूर्ण झालेले नाही.

वाचा: पार्थच्या प्रत्येक मतावर प्रतिक्रिया देण्यापेक्षा... अजित पवार स्पष्टच बोलले!

मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी उद्धव ठाकरे यांच्या भाषणाचा तो व्हिडिओ ट्वीट केला आहे. त्यासोबत देशपांडे यांनी महात्मा गांधी यांच्या प्रसिद्ध प्रार्थनेत एका शब्दाचा बदल करून राज्य सरकारला टोला हाणला आहे. 'रघुपती राघव राजाराम... पतित पावन सीताराम... सरकार को सन्मती दे भगवान' असं त्यांनी म्हटलं आहे. सत्याचा धडा देणाऱ्या महात्मा गांधीजींना विनम्र अभिवादन, असंही त्यांनी म्हटलं आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज