मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून साजरी होणारी नारळी पौर्णिमा आज मुंबईत वातावरण तापवू शकते. कारण पोलिसांनी मनसैनिकांना १४९ नोटीस बजावली आहे. तरीदेखील मनसेच्या कार्यकर्त्यांनी कोणत्याही परिस्थितीत हा कार्यक्रम पार पाडणार असल्याचा इशारा दिला आहे. त्यामुळे मुंबईत आजच वातावरण तापलेले पाहायला मिळेल.
खरंतर, कोळी बांधवांसाठी आजचा दिवस खूप महत्त्वाचं आहे. नारळी पौर्णिमेच्या दिवशी कोळी बांधव समुद्राला नारळ, श्रीफळ अर्पण करतात आणि पूजा करतात. पण करोनाच्या नियमांमुळे आधीच लॉकडाऊन असताना मनसेमुळे मुंबईतील वातावरण तापण्याची शक्यता आहे.