पत्रकार परिषदेत गोंधळ; ५ डिसेंबरला नागपूरमध्ये आंदोलन
म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई
वेगळ्या विदर्भाची भूमिका घेणारे माजी आमदार अॅड. वामनराव चटप यांनी मुंबईत आयोजित केलेल्या वेगळ्या विदर्भाबाबतच्या पत्रकार परिषदेत मनसेच्या कार्यकर्त्यांनी धुडगूस घालत ही पत्रकार परिषद उधळून लावण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याला न जुमानता आयोजकांनी ही पत्रकार परिषद पार पाडली. या परिषदेत येत्या ५ डिसेंबर रोजी हिवाळी अधिवेशनाच्या काळात नागपूरमध्ये वेगळा विदर्भ देता की विदर्भातील जनतेच्या लाथा खाता, असा इशारा देणारे आंदोलन करण्यात येणार असल्याचे सांगितले.
वेगळ्या विदर्भाच्या पत्रकार परिषदेचा कानोसा लागल्यानंतर मनसेचे कार्यकर्ते मुंबई मराठी पत्रकार संघात धडकले. वेगळ्या विदर्भाच्या पुरस्कर्त्यांनी महाराष्ट्रात पत्रकार परिषद घ्यायची नाही. वेगळा विदर्भ हवा असेल तर इथून चालते व्हा, असे मनसेच्या कार्यकर्त्यांनी आयोजकांना सांगितले. सुमारे १० मिनटिे हा गोंधळ सुरू होता. पोलिसांनी हस्तक्षेप करीत मनसेच्या कार्यकर्त्यांना तेथून हुसकावल्यानंतर आयोजकांनी पत्रकार परिषद सुरू केली.
यावेळी चटप म्हणाले की, भाजपने शेतकऱ्यांसह विदर्भातील जनतेचा विश्वासघात केला असून भाजपचा देशातला कारभार म्हणजे ‘मुंह में राम बगल मे छुरी’ असा आहे. येत्या ३ व ४ ऑक्टोबर रोजी नागपूरमध्ये प्रति अधिवेशन घेण्यात येईल. त्या अधिवेशनात वेगळा विदर्भ देता की विदर्भातील जनतेच्या लाथा खात सत्तेतून जाता, असा इशारा देण्यात येईल. ५ डिसेंबर रोजी वेगळ्या विदर्भासाठी भव्य मोर्चा आयोजित करण्यात येणार आहे. ३१ डिसेंबरपर्यंत सरकारने मागण्या मान्य न केल्यास १ जानेवारीपासून आक्रमक भूमिका घेण्यात येईल, असे चटप यांनी सांगितले.
मनसेच्या आंदोलनाविषयी
बोलताना ते म्हणाले की, यापूर्वी शिवसेनेनेही आम्हाला विरोध केला आहे. मनसेतर त्यांचे बाळच आहे. आम्हाला आंदोलनकर्त्यांनी कोणतीही इजा पोहोचवलेली नसल्याने हा अदखलपात्र गुन्हा आहे. त्यामुळे याची पोलिसांमध्ये तक्रार करणार नाही, असे चटप यांनी स्पष्ट केले. यावेळी ज्येष्ठ अर्थतज्ञ व समितीचे सदस्य डॉ. श्रीनिवास खांदेवाले, अॅड. नंदा पराते, समितीचे सदस्य व सेवानिवृत्त आयकर आयुक्त धनंजय धार्मिक उपस्थित होते.
म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई
वेगळ्या विदर्भाची भूमिका घेणारे माजी आमदार अॅड. वामनराव चटप यांनी मुंबईत आयोजित केलेल्या वेगळ्या विदर्भाबाबतच्या पत्रकार परिषदेत मनसेच्या कार्यकर्त्यांनी धुडगूस घालत ही पत्रकार परिषद उधळून लावण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याला न जुमानता आयोजकांनी ही पत्रकार परिषद पार पाडली. या परिषदेत येत्या ५ डिसेंबर रोजी हिवाळी अधिवेशनाच्या काळात नागपूरमध्ये वेगळा विदर्भ देता की विदर्भातील जनतेच्या लाथा खाता, असा इशारा देणारे आंदोलन करण्यात येणार असल्याचे सांगितले.
वेगळ्या विदर्भाच्या पत्रकार परिषदेचा कानोसा लागल्यानंतर मनसेचे कार्यकर्ते मुंबई मराठी पत्रकार संघात धडकले. वेगळ्या विदर्भाच्या पुरस्कर्त्यांनी महाराष्ट्रात पत्रकार परिषद घ्यायची नाही. वेगळा विदर्भ हवा असेल तर इथून चालते व्हा, असे मनसेच्या कार्यकर्त्यांनी आयोजकांना सांगितले. सुमारे १० मिनटिे हा गोंधळ सुरू होता. पोलिसांनी हस्तक्षेप करीत मनसेच्या कार्यकर्त्यांना तेथून हुसकावल्यानंतर आयोजकांनी पत्रकार परिषद सुरू केली.
यावेळी चटप म्हणाले की, भाजपने शेतकऱ्यांसह विदर्भातील जनतेचा विश्वासघात केला असून भाजपचा देशातला कारभार म्हणजे ‘मुंह में राम बगल मे छुरी’ असा आहे. येत्या ३ व ४ ऑक्टोबर रोजी नागपूरमध्ये प्रति अधिवेशन घेण्यात येईल. त्या अधिवेशनात वेगळा विदर्भ देता की विदर्भातील जनतेच्या लाथा खात सत्तेतून जाता, असा इशारा देण्यात येईल. ५ डिसेंबर रोजी वेगळ्या विदर्भासाठी भव्य मोर्चा आयोजित करण्यात येणार आहे. ३१ डिसेंबरपर्यंत सरकारने मागण्या मान्य न केल्यास १ जानेवारीपासून आक्रमक भूमिका घेण्यात येईल, असे चटप यांनी सांगितले.
मनसेच्या आंदोलनाविषयी
बोलताना ते म्हणाले की, यापूर्वी शिवसेनेनेही आम्हाला विरोध केला आहे. मनसेतर त्यांचे बाळच आहे. आम्हाला आंदोलनकर्त्यांनी कोणतीही इजा पोहोचवलेली नसल्याने हा अदखलपात्र गुन्हा आहे. त्यामुळे याची पोलिसांमध्ये तक्रार करणार नाही, असे चटप यांनी स्पष्ट केले. यावेळी ज्येष्ठ अर्थतज्ञ व समितीचे सदस्य डॉ. श्रीनिवास खांदेवाले, अॅड. नंदा पराते, समितीचे सदस्य व सेवानिवृत्त आयकर आयुक्त धनंजय धार्मिक उपस्थित होते.