मटा ऑनलाइन वृत्त । मुंबई
महाराष्ट्राची राजधानी मुंबईत वीज बिल, रेल्वे तिकीट आणि व्होडाफोन बिलांवर गुजराती मजकूर झळकल्याने त्याविरोधात मनसेने आक्रमक पवित्रा घेतला असून गुजरातील वीज बिलं छापणाऱ्या रिलायन्स एनर्जी व्यवस्थापनाला मनसेकडून इशाराच देण्यात आला आहे. दरम्यान, मनसेच्या गुजराती विरोधामुळे हे प्रकरण येत्या काळात चांगलंच चिघळण्याची शक्यता आहे.
मुंबई उपनगरातील बहुतांश भागात रिलायन्स एनर्जीकडून वीजपुरवठा केला जात असून तेथील ग्राहकांना अचानक गुजराती भाषेतील वीजबिलं येऊ लागल्याने यामागे नेमका हेतु काय?, असा प्रश्न सोशल मीडियातून विचारला जाऊ लागला आहे. त्याचवेळी मुंबईतून आरक्षित होणारी रेल्वे तिकीटं व व्होडाफोन कंपनीच्या बिलांवरही गुजराती भाषेने स्थान मिळवल्याचे अनेक फोटो सोशल मीडियात व्हायरल झाले आहेत. त्याला मनसेने जोरदार आक्षेप घेतला आहे.
मराठी भाषा हटवून गुजरातीचं अतिक्रमण म्हणजे महाराष्ट्रापासून मुंबईला वेगळं करण्याच्या कारस्थानाचाच एक भाग आहे, असा आरोप करत मनसेने याविरोधात दंड थोपटले आहेत. मनसेचे उपाध्यक्ष नयन कदम यांच्या नेतृत्वाखाली रिलायन्स एनर्जीच्या कार्यालयावर आज धडक मोर्चा काढण्यात आला असून वीज बिलांवरून तत्काळ गुजराती भाषा हटवून बिलं मराठीत छापण्याची मागणी करण्यात आली आहे. मागणी मान्य न झाल्यास आंदोलन तीव्र करण्याचा इशाराही कंपनी व्यवस्थापनाला देण्यात आला आहे.
महाराष्ट्राची राजधानी मुंबईत वीज बिल, रेल्वे तिकीट आणि व्होडाफोन बिलांवर गुजराती मजकूर झळकल्याने त्याविरोधात मनसेने आक्रमक पवित्रा घेतला असून गुजरातील वीज बिलं छापणाऱ्या रिलायन्स एनर्जी व्यवस्थापनाला मनसेकडून इशाराच देण्यात आला आहे. दरम्यान, मनसेच्या गुजराती विरोधामुळे हे प्रकरण येत्या काळात चांगलंच चिघळण्याची शक्यता आहे.
मुंबई उपनगरातील बहुतांश भागात रिलायन्स एनर्जीकडून वीजपुरवठा केला जात असून तेथील ग्राहकांना अचानक गुजराती भाषेतील वीजबिलं येऊ लागल्याने यामागे नेमका हेतु काय?, असा प्रश्न सोशल मीडियातून विचारला जाऊ लागला आहे. त्याचवेळी मुंबईतून आरक्षित होणारी रेल्वे तिकीटं व व्होडाफोन कंपनीच्या बिलांवरही गुजराती भाषेने स्थान मिळवल्याचे अनेक फोटो सोशल मीडियात व्हायरल झाले आहेत. त्याला मनसेने जोरदार आक्षेप घेतला आहे.
मराठी भाषा हटवून गुजरातीचं अतिक्रमण म्हणजे महाराष्ट्रापासून मुंबईला वेगळं करण्याच्या कारस्थानाचाच एक भाग आहे, असा आरोप करत मनसेने याविरोधात दंड थोपटले आहेत. मनसेचे उपाध्यक्ष नयन कदम यांच्या नेतृत्वाखाली रिलायन्स एनर्जीच्या कार्यालयावर आज धडक मोर्चा काढण्यात आला असून वीज बिलांवरून तत्काळ गुजराती भाषा हटवून बिलं मराठीत छापण्याची मागणी करण्यात आली आहे. मागणी मान्य न झाल्यास आंदोलन तीव्र करण्याचा इशाराही कंपनी व्यवस्थापनाला देण्यात आला आहे.