अ‍ॅपशहर

रघुराम राजन यांना पद्धतशीरपणे खोटं पाडलं जाईल: शिवसेना

रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांनी देशातील संभाव्य आर्थिक संकटावर सुचवलेल्या उपायांची केंद्र सरकारनं गांभीर्यानं दखल घ्यायला हवी, अशी अपेक्षा शिवसेनेनं व्यक्त केली आहे. ही शहाणे होण्याची वेळ आहे, असा टोलाही केंद्राला हाणला आहे.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 2 May 2020, 9:43 am
मुंबई: 'देशातील लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांनी दिलेल्या मुलाखतीच्या निमित्तानं शिवसेनेनं केंद्र सरकारवर पुन्हा एकदा निशाणा साधला आहे. 'आर्थिक संकटाचा विषाणू किती गंभीर आहे हेच राजन यांनी सांगितलंय. ही खरंतर शहाणे होण्याची वेळ आहे. पण, राजन हे दिल्ली सरकारधार्जिणे नसल्याने त्यांना पद्धतशीर खोटे पाडले जाईल. सर्व काही आलबेल आहे, असे ढोलताशे वाजवले जातील,' अशी भीती शिवसेनेनं व्यक्त केली आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम Raghuram-Rajan


करोना Live: राज्यातील रुग्णसंख्येत प्रथमच एक हजारांची वाढ

काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी अलीकडंच अर्थतज्ञ रघुराम राजन यांच्याशी डिजिटल’ माध्यमातून संवाद साधला. राजन यांनी यावेळी देशापुढील भीषण संकटाची जाणीव सर्वांना करून दिली. या आर्थिक आरिष्टामुळं गोरगरिबांचे सर्वाधिक हाल होणार आहेत. १० कोटी लोकांना रोजगार गमवावा लागणार आहे. गरिबांसाठी केंद्रानं ६५ हजार कोटी रुपयांची तरतूद करायला हवी, असे अनेक मुद्दे राजन यांनी मांडले. राजन यांच्या मताची केंद्र सरकारनं गंभीर दखल घ्यायला हवी, असा सल्ला शिवसेनेचं मुखपत्र दैनिक 'सामना'च्या अग्रलेखातून देण्यात आलाय. मात्र, राजन यांचं मत गंभीरपणे घेतलं जाईल का, याबद्दल शंकाही व्यक्त केली आहे.

सीकेपी बँकेचा परवाना रद्द; ४८५ कोटींच्या ठेवी संकटात

'देशातील आर्थिक संकटावर मात करण्यासाठी पंतप्रधान मोदी यांचे प्रयत्न सुरू आहेत. पण आभाळच फाटले आहे. हे फाटके आभाळ फक्त एकविचारी लोकांची तुतारी फुंकून शिवता येणार नाही. भाषणे, आश्वासने यांना मर्यादा पडतात व लोकांच्या पोटातली आग त्यावर हल्ला करते. लोकांना संयम पाळायला सांगणं ठीक आहे. पण सरकारला गरीब आणि मध्यमवर्गीयांच्या देखील बदलत्या आर्थिक स्थितीचा विचार करावा लागेल. मुख्य म्हणजे सगळ्यांना एकत्र घेऊन काम करावे लागेल व दुसऱ्यांचे देखील ऐकावे लागेल. यापुढं भारत-पाकिस्तानचा खेळ, धर्म व जातवादाची प्यादी हलवणे बंद करून करोनाच्या संकटानंतर देशाला आर्थिक खाईतून कसे बाहेर काढता येईल यावर सर्वच राजकीय पक्षांनी काम केले पाहिजे. पंतप्रधानांनी त्याकामी पुढाकार घ्यावा. देश पाठीशी उभा राहील,' असंही अग्रलेखात नमूद करण्यात आलं आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज