अ‍ॅपशहर

टाटा, बच्चन यांचे आभार

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे देशातील विविध ठिकाणी निवडक मान्यवर व विद्यार्थ्यांशी संवाद साधून, 'स्वच्छता ही सेवा' मोहिमेचा शुभारंभ केला.

Maharashtra Times 16 Sep 2018, 12:03 am
मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे देशातील विविध ठिकाणी निवडक मान्यवर व विद्यार्थ्यांशी संवाद साधून, 'स्वच्छता ही सेवा' मोहिमेचा शुभारंभ केला. मुंबईत गेट वे ऑफ इंडिया येथे ज्येष्ठ उद्योगपती रतन टाटा आणि प्रसिद्ध अभिनेते अमिताभ बच्चन यांच्याशी पंतप्रधानांनी संवाद साधला. यावेळी मोदी म्हणाले की, चार वर्षांपासून सुरू असलेल्या स्वच्छता मोहिमेला देशातील सर्वच स्तरातील लोकांनी पाठिंबा दिला आहे. टाटा ट्रस्टने स्वच्छता मोहिमेमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला असून राष्ट्रनिर्माणाच्या कार्यातही टाटा परिवाराचे महत्त्वाचे योगदान राहिले आहे. अमिताभ बच्चन यांनीही स्वच्छतेसाठी जनजागृती केली असून सामाजिक क्षेत्रातही त्यांचे मोठे योगदान आहे. स्वच्छता मोहिमेत केलेल्या सहकार्याबद्दल बच्चन आणि टाटा यांचे पंतप्रधानांनी आभार मानले.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम modi thanks to tata and bachchan
टाटा, बच्चन यांचे आभार


यावेळी रतन टाटा म्हणाले की, कोणतीही वास्तू उभारण्यासाठी पाया मजबूत असणे आवश्यक असते. त्याचप्रमाणे स्वच्छता हाच आपल्या देशाचा पाया आहे. पंतप्रधानांनी स्वच्छतेसाठी जे कार्य केले ते महत्त्वपूर्ण आणि धाडसी आहे. तर, अमिताभ बच्चन म्हणाले की, सहकारी सोसायट्या व रुग्णालयांमध्ये स्वच्छतेला प्राधान्य दिले पाहिजे. 'यापुढेही मी स्वच्छताग्रही म्हणून कार्यरत राहीन', अशी ग्वाही त्यांनी दिली.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज