अ‍ॅपशहर

Monsoon 2022 Update : मान्सून महाराष्ट्रावर नाराज, धमाकेदार एन्ट्रीनंतर झालं तरी काय?

Monsoon News: निम्मा जून संपत आला तरी जूनच्या मासिक अंदाजावरून राज्यात जून महिन्यात अति आक्रमक पाऊस पडेल असं दिसत नाही. मुसळधार पावसाचा अंदाज देण्यात आला असला तरी मान्सूनने ब्रेक घेतल्याचं पाहायला मिळत आहे.

Authored byरेणुका धायबर | महाराष्ट्र टाइम्स.कॉम 15 Jun 2022, 3:18 pm
मुंबई : राज्यात सर्वदूर मान्सूनने हजेरी लावली असली तरी आता पावसाने ब्रेक घेतल्याचं पाहायला मिळत आहे. यंदा पाऊस चांगला होणार असून गत आठवड्यापासून १५ जूनपर्यंत राज्यातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज भारतीय हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे. मात्र, दोन दिवसांतच मान्सूनने सुट्टी टाकल्याचं पाहायला मिळत आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम Monsoon 2022 Update


मान्सूनच्या या ब्रेकमुळे शेतकऱ्यांनाही पेरणी थांबण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. खरंतर, येत्या ४८ तासांत तयार होणाऱ्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे मान्सून सक्रिय होईल, असाही अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. पण सध्या मान्सूनला लो करंट आहे. म्हणून पाऊस पडण्यासाठी समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याची गरज आहे. पण तसं होत नसल्याने सध्या मान्सूनने विश्रांती घेतली आहे.

महाराष्ट्रात सापडला ओमिक्रॉनचा नवा सबव्हेरियंट?; तज्ज्ञ काय म्हणाले...
कुठे थांबला पाऊस?

२९ मे रोजी मान्सून केरळात दाखल झाला त्यानंतर तामिळनाडू, कर्नाटकच्या काही भागासह गोव्याच्या सीमेवर दाखल झाला. यावेळीही मान्सूनने दहा दिवसांचा ब्रेक घेतला. हवामान अनुकूल झाल्यानंतर मान्सून शुक्रवारी वेंगुर्ल्यात दाखल झाला. त्यानंतर अवघ्या २४ तासांत म्हणजे शनिवारी मान्सून मुंबई, ठाणे, रायगडसह अनेक जिल्ह्यांमध्ये सक्रिय झाला. पण रविवार, सोमवार आणि मंगळवारी पाऊस बेपत्ता झाला असून, मुंबईत तर कडाक्याच्या उन्हामुळे उष्णता वाढत आहे.

पश्चिम किनार्‍यावर ५ दिवसांत वादळी पावसाची शक्यता...

हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, पश्चिम किनार्‍यावर ऑफ-शोअर ट्रफ आणि पश्चिमेकडील वाऱ्यांच्या प्रभावाखाली येत्या ५ दिवसांत राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये विजांचा कडकडाट आणि सोसाट्याच्या वाऱ्यांसह वादळाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

एक ग्रॅमच्या अंगठीने घेतली जीव, बर्थडे गिफ्ट मागितलं म्हणून प्रियकरानेच केला खून
मान्सून दाखल झाल्यानंतर सध्या पावसाचे प्रमाण फारसे नसले तरी अरबी समुद्रात गुजरातपासून केरळपर्यंत किनारपट्टीला समांतर द्रोणीय स्थिती तसेच पश्चिमेकडून वाहणारे वारे यामुळे कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात येत्या पाच दिवसांमध्ये पावसाची उपस्थिती असेल, असा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तवला आहे.
लेखकाबद्दल
रेणुका धायबर
रेणुका धायबर, महाराष्ट्र टाइम्समध्ये Senior Digital Content Producer आहेत. डिजिटल पत्रकारितेचा आठ वर्षांचा अनुभव आहे. २०१४ पासून पत्रकारीतेत आहेत. झी २४ तास , न्यूज १८ लोकमत, टीव्ही ९ अशा वेबसाइटसाठी त्यांनी काम केले आहे. महाराष्ट्र, राजकारण, गुन्हेगारी, देश, विदेश, स्पेशल बातम्या यासोबत व्यवसाय विषयात त्यांची आवड आहे.... आणखी वाचा

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज