अ‍ॅपशहर

​ तीन दिवसांत मान्सून केरळात

वातावरणात वाढत जाणाऱ्या आर्द्रतेने पावसाची बातमी आणलेली असतानाच, केरळमध्ये पुढील तीन दिवसांत मान्सून दाखल होण्याचा अंदाज राष्ट्रीय हवामान केंद्रातर्फे वर्तवण्यात आला आहे. केरळमध्ये दाखल झाल्यानंतर मान्सूनची अरबी समुद्रातील शाखा वेगाने पुढे सरकून राज्यातही पाऊस लवकर दाखल होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

Maharashtra Times 28 May 2017, 2:01 am
राज्यातही लवकर दाखल होण्याची शक्यता
महाराष्ट्र टाइम्स.कॉम monsoon in kerala in 3 days
​ तीन दिवसांत मान्सून केरळात


म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई

वातावरणात वाढत जाणाऱ्या आर्द्रतेने पावसाची बातमी आणलेली असतानाच, केरळमध्ये पुढील तीन दिवसांत मान्सून दाखल होण्याचा अंदाज राष्ट्रीय हवामान केंद्रातर्फे वर्तवण्यात आला आहे. केरळमध्ये दाखल झाल्यानंतर मान्सूनची अरबी समुद्रातील शाखा वेगाने पुढे सरकून राज्यातही पाऊस लवकर दाखल होण्याची शक्यता प्रादेशिक हवामान विभागाने वर्तवली आहे.

केरळमध्ये सर्वसाधारणपणे १ जूनपर्यंत मान्सून दाखल होतो. मात्र यंदा ३० ते ३१ मेपर्यंत मान्सूनचे देशात आगमन होईल, असे पूर्वानुमान राष्ट्रीय हवामान केंद्रातर्फे देण्यात आले आहे. पश्चिम वारे अधिक जोरदार असल्याने आणि द्रोणीय क्षेत्र उत्तरेकडे सरकल्याने नैऋत्य मोसमी पावसाचे आगमन दोन दिवस आधीच अरबी समुद्र आणि दक्षिण केरळच्या काही भागात होण्याचा अंदाज आहे.

केरळात मान्सून दाखल झाल्यानंतर सहा ते सात जूनपर्यंत मान्सून राज्यात दाखल होतो. मात्र यंदा मान्सूनचा उत्तरेकडील हा प्रवासही वेगाने होऊन राज्यातही पावसाचे आगमन लवकर होण्याची शक्यता आहे, अशी माहिती प्रादेशिक हवामान विभागाचे उपमहासंचालक कृष्णानंद होसाळीकर यांनी दिली. शनिवारी मुंबईमध्ये आकाश ढगळालेले होते. रविवारी दक्षिण कोकण-गोवा, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

ईशान्येकडील शाखाही वेगात

अरबी समुद्रातील शाखेबरोबरच देशाच्या ईशान्येकडील भागातही मान्सून वेगाने पुढे सरकत आहे. बंगालच्या उपसागरातील पश्चिम मध्य आणि आग्नेयेकडील भागामध्ये कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. येत्या २४ तासांमध्ये हा पट्टा अधिक सक्रिय होऊन मान्सूनचा बंगालच्या उपसागरातील उर्वरित प्रवास येत्या तीन ते चार दिवसांमध्ये होण्यासाठी अनुकूल परिस्थिती निर्माण होईल. त्यानंतर नागालँड, मणिपूर, मिझोराम, त्रिपुरा या भागातही ३० किंवा ३१ मे दरम्यान मान्सूनचे आगमन होऊ शकते.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज