अ‍ॅपशहर

आकाशवाणीचे सकाळचे बातमीपत्र रद्द

मुंबई आकाशवाणी केंद्राहून प्रसारित होणारे प्रादेशिक बातमीपत्र बुधवारी सकाळी प्रसारित झाले नाही. हंगामी वृत्तनिवेदक, भाषांतरकार, कार्यक्रम विभागातील हंगामी कर्मचारी या सर्वांनीच पाच महिने मानधन न मिळाल्याचा राग व्यक्त केला आणि सकाळी असलेल्या कामासाठी कोणीच हजर राहिले नाही. हे सकाळचे बातमीपत्र न गेल्याने मुंबईपासून दिल्लीपर्यंत सगळीच धावपळ उडाली. ‘मन की बात’मुळे आर्थिक स्थिती सुधारल्याच्या चर्चा असताना जे हंगामी कर्मचारी हे भाषण भाषांतरित करतात त्यांच्यावरच आज पैसे नसण्याची स्थिती आली आहे.

Maharashtra Times 24 Aug 2017, 2:00 am
मानधन रखडल्याने कर्मचाऱ्यांचे आंदोलन
महाराष्ट्र टाइम्स.कॉम morning newsbulletine canceled
आकाशवाणीचे सकाळचे बातमीपत्र रद्द


म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई

मुंबई आकाशवाणी केंद्राहून प्रसारित होणारे प्रादेशिक बातमीपत्र बुधवारी सकाळी प्रसारित झाले नाही. हंगामी वृत्तनिवेदक, भाषांतरकार, कार्यक्रम विभागातील हंगामी कर्मचारी या सर्वांनीच पाच महिने मानधन न मिळाल्याचा राग व्यक्त केला आणि सकाळी असलेल्या कामासाठी कोणीच हजर राहिले नाही. हे सकाळचे बातमीपत्र न गेल्याने मुंबईपासून दिल्लीपर्यंत सगळीच धावपळ उडाली. ‘मन की बात’मुळे आर्थिक स्थिती सुधारल्याच्या चर्चा असताना जे हंगामी कर्मचारी हे भाषण भाषांतरित करतात त्यांच्यावरच आज पैसे नसण्याची स्थिती आली आहे.

तीन वर्षे मुंबई आकाशवाणीचे हंगामी कर्मचारी दर चार ते पाच महिन्यांनी मानधन रखडल्याचे पत्र मुंबई आकाशवाणी आणि दिल्ली मुख्य केंद्राला पाठवतात. यावर्षी मार्चमध्ये काही कर्मचाऱ्यांनी दिल्लीमध्ये जाऊन तत्कालीन केंद्रीय माहिती प्रसारणमंत्री व्यंकय्या नायडू आणि राज्यमंत्री राज्यवर्धन राठोड यांची भेट घेतली होती. त्यानंतर आधीच्या पाच महिन्यांचे मानधन देण्यात आले. मात्र पुन्हा या कर्मचाऱ्यांना एप्रिलपासून मानधन मिळाले नसल्याचे समजते. सातत्याने तीन-साडेतीन वर्षे हा प्रकार सुरू असल्याने या कर्मचाऱ्यांनी अखेर काम बंद आंदोलनाचे हत्यार उचलले. यामध्ये सुमारे ९० हंगामी कर्मचारी सहभागी आहेत.

अनेक हंगामी कर्मचाऱ्यांसाठी आकाशवाणीतून मिळणारे मानधन हा घरखर्चासाठी प्राथमिक आर्थिक स्रोत आहे. यामध्ये सुमारे ३५ वर्षे काम करणारे कर्मचारीही आहेत. प्रादेशिक बातम्या मुंबईला नको असल्याने कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन केले अशा बातम्याही बुधावारी चर्चेत आल्या. मात्र यामध्ये तथ्य नसून हक्काचे पैसे हा मुद्दा महत्त्वाचा असल्याचे या कर्मचाऱ्यांनी स्पष्ट केले आहे. आंदोलक कर्मचाऱ्यांना बुधवारी दुपारी कारणे दाखवा नोटीसही बजावण्यात आली आहे. या नोटीसनंतर हंगामी कर्मचाऱ्यांमध्ये हे कंत्राट गमावण्याची भीती निर्माण झाली आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज