म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई
घटस्फोटित मुलीकडून सातत्याने शारीरिक व मानसिक छळ होत असल्याने हवालदिल झालेल्या ७० वर्षीय आईच्या मदतीला मुंबई उच्च न्यायालय धावून आले आहे. आईने मुलीला घराबाहेर काढण्याची विनंती न्यायालयाला केली होती, मात्र करोना संकटकाळात मुलीला अन्यत्र कुठे घर मिळणे मुश्कील असल्याचे नोंदवून न्यायालयाने तसा आदेश देण्याचे टाळले. मात्र, आईला कोणताही त्रास होऊ नये, अशी सक्त ताकीद देऊन राहत्या घराबाहेर काढण्याचा गर्भित इशाराही मुलीला दिला.
'मुलीने किंवा तिच्या मुलाने याचिकादाराला त्रास दिल्याची यापुढे तक्रार आली, तर दोघांनाही कांदिवली लोखंडवाला संकुलातील त्या फ्लॅटमध्ये प्रवेश करण्यास मनाई करणारा आदेश आम्ही काढू. याचिकादार आईला कोणीही नातेवाईक भेटायला आल्यास मुलगी व तिच्या मुलाने रोखू नये. मात्र, त्या दोघांनी आपल्या कोणाही नातेवाईकाला आईच्या परवानगीविना त्या घरात आणू नये. स्थानिक पोलिस ठाण्याच्या वरिष्ठ निरीक्षकांनी याचिकादार आईला केव्हाही मदत लागल्यास ती पुरवावी. आई किंवा मुलीला बेडरूम व बाथरूम वगळून घरातील सामायिक भागांत सीसीटीव्ही कॅमेरा लावण्याची मुभा असेल', असे न्या. शाहरुख काथावाला व न्या. सुरेंद्र तावडे यांच्या खंडपीठाने अंतरिम आदेशात स्पष्ट केले.
निवृत्त सरकारी कर्मचारी असलेल्या लीला गुप्ता यांनी त्यांच्या पाच मुलींपैकी एक मयुरा आणि तिचा १९ वर्षीय मुलगा अर्णव यांच्याविरोधात अॅड. श्याम देवानी यांच्यामार्फत ही तातडीची याचिका केली (सर्व नावे बदललेली आहेत) आहे. 'मयुरा हिने १९९८मध्ये तुषार याच्याशी पळून जाऊन लग्न केले. तुषार याला दुबईमध्ये नोकरी देण्याचे आमिष दाखवून अनेकांना गंडा घातल्याच्या आरोपाखाली २०००मध्ये अटकही झाली होती. नंतर तो मयुरा व तिच्या मुलाला वसईमधील गहाण असलेल्या घरात सोडून पसार झाला.
त्याच वर्षी आम्ही अन्य अविवाहित मुलींसोबत कांदिवलीमधील फ्लॅटमध्ये राहायला आलो होतो. आम्ही तिला तात्पुरता निवारा दिला. तिला नोकरी लागल्यानंतर तिला दुसरीकडे व्यवस्था करण्यास सांगितले. मात्र, तिने आम्हालाच त्रास देणे सुरू केले. वडिलांविरोधातच विनयभंगाची पोलिस तक्रार करण्याची धमकी दिली. तणावाच्या वातावरणात माझ्या पतींचे २०११मध्ये निधन झाले. त्यानंतर मयुराने माझा छळ केला. मारहाण, एकदाच जेवण देणे, दबावाखाली ठेवणे, घराबाहेर पडू न देणे, कोणाशीही बोलू न देणे, असा छळ सुरू आहे. मारहाणीत माझा एक हात मोडला असून खांद्याजवळची नसही दबली गेली. मात्र, अनेक महिन्यांपासून मला उपचारांअभावी तसेच ठेवले,'असे लीला यांनी तक्रारीत म्हटले.
ज्येष्ठ नागरिक कायद्यांतर्गत दाद
'सिंगापूरहून आलेल्या मुलीसमोर धीर एकवटून कैफियत मांडल्यानंतर अखेर मी पोलिसांत तक्रार नोंदवली. नंतर मयुराला माझ्या घराबाहेर काढण्यासाठी ज्येष्ठ नागरिक व पालक कल्याण कायद्यांतर्गतच्या लवादाकडे दाद मागितली. मात्र, लॉकडाउनमुळे ती सुनावणीच होऊ शकली नाही. म्हणून उच्च न्यायालयात धाव घेतली', असे लीला यांनी याचिकेद्वारे निदर्शनास आणले.
घटस्फोटित मुलीकडून सातत्याने शारीरिक व मानसिक छळ होत असल्याने हवालदिल झालेल्या ७० वर्षीय आईच्या मदतीला मुंबई उच्च न्यायालय धावून आले आहे. आईने मुलीला घराबाहेर काढण्याची विनंती न्यायालयाला केली होती, मात्र करोना संकटकाळात मुलीला अन्यत्र कुठे घर मिळणे मुश्कील असल्याचे नोंदवून न्यायालयाने तसा आदेश देण्याचे टाळले. मात्र, आईला कोणताही त्रास होऊ नये, अशी सक्त ताकीद देऊन राहत्या घराबाहेर काढण्याचा गर्भित इशाराही मुलीला दिला.
'मुलीने किंवा तिच्या मुलाने याचिकादाराला त्रास दिल्याची यापुढे तक्रार आली, तर दोघांनाही कांदिवली लोखंडवाला संकुलातील त्या फ्लॅटमध्ये प्रवेश करण्यास मनाई करणारा आदेश आम्ही काढू. याचिकादार आईला कोणीही नातेवाईक भेटायला आल्यास मुलगी व तिच्या मुलाने रोखू नये. मात्र, त्या दोघांनी आपल्या कोणाही नातेवाईकाला आईच्या परवानगीविना त्या घरात आणू नये. स्थानिक पोलिस ठाण्याच्या वरिष्ठ निरीक्षकांनी याचिकादार आईला केव्हाही मदत लागल्यास ती पुरवावी. आई किंवा मुलीला बेडरूम व बाथरूम वगळून घरातील सामायिक भागांत सीसीटीव्ही कॅमेरा लावण्याची मुभा असेल', असे न्या. शाहरुख काथावाला व न्या. सुरेंद्र तावडे यांच्या खंडपीठाने अंतरिम आदेशात स्पष्ट केले.
निवृत्त सरकारी कर्मचारी असलेल्या लीला गुप्ता यांनी त्यांच्या पाच मुलींपैकी एक मयुरा आणि तिचा १९ वर्षीय मुलगा अर्णव यांच्याविरोधात अॅड. श्याम देवानी यांच्यामार्फत ही तातडीची याचिका केली (सर्व नावे बदललेली आहेत) आहे. 'मयुरा हिने १९९८मध्ये तुषार याच्याशी पळून जाऊन लग्न केले. तुषार याला दुबईमध्ये नोकरी देण्याचे आमिष दाखवून अनेकांना गंडा घातल्याच्या आरोपाखाली २०००मध्ये अटकही झाली होती. नंतर तो मयुरा व तिच्या मुलाला वसईमधील गहाण असलेल्या घरात सोडून पसार झाला.
त्याच वर्षी आम्ही अन्य अविवाहित मुलींसोबत कांदिवलीमधील फ्लॅटमध्ये राहायला आलो होतो. आम्ही तिला तात्पुरता निवारा दिला. तिला नोकरी लागल्यानंतर तिला दुसरीकडे व्यवस्था करण्यास सांगितले. मात्र, तिने आम्हालाच त्रास देणे सुरू केले. वडिलांविरोधातच विनयभंगाची पोलिस तक्रार करण्याची धमकी दिली. तणावाच्या वातावरणात माझ्या पतींचे २०११मध्ये निधन झाले. त्यानंतर मयुराने माझा छळ केला. मारहाण, एकदाच जेवण देणे, दबावाखाली ठेवणे, घराबाहेर पडू न देणे, कोणाशीही बोलू न देणे, असा छळ सुरू आहे. मारहाणीत माझा एक हात मोडला असून खांद्याजवळची नसही दबली गेली. मात्र, अनेक महिन्यांपासून मला उपचारांअभावी तसेच ठेवले,'असे लीला यांनी तक्रारीत म्हटले.
ज्येष्ठ नागरिक कायद्यांतर्गत दाद
'सिंगापूरहून आलेल्या मुलीसमोर धीर एकवटून कैफियत मांडल्यानंतर अखेर मी पोलिसांत तक्रार नोंदवली. नंतर मयुराला माझ्या घराबाहेर काढण्यासाठी ज्येष्ठ नागरिक व पालक कल्याण कायद्यांतर्गतच्या लवादाकडे दाद मागितली. मात्र, लॉकडाउनमुळे ती सुनावणीच होऊ शकली नाही. म्हणून उच्च न्यायालयात धाव घेतली', असे लीला यांनी याचिकेद्वारे निदर्शनास आणले.