मुंबईः महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्यावर १०० कोटी रुपयांच्या वसुलीचा आरोप करणारे मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह (Parambir Singh)यांना फरार घोषित करण्यात आलं आहे. तसा न्यायालयाचा आदेश त्यांच्या जुहू येथील घराबाहेर चिकटवण्यात आला आहे. व्यावसायिकाकडून खंडणी मागितल्याच्या कथित गुन्ह्यात आरोप म्हणून परमबीर सिंह यांना मुंबईतील अतिरिक्त मुख्य महानगर न्यायदंडाधिकारी न्यायालयाने फरार घोषित केले आहे. परमबीर यांच्याबरोबरच आरोपी निलंबित पोलिस अधिकारी रियाज भाटी व विनय सिंह उर्फ बबलू यांनाही न्यायालयाने फरार घोषित केले. परमबीर सिंह ३० दिवसांत न्यायालयात हजर न झाल्यास मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या अर्जाप्रमाणे व न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे त्यांची संपत्ती जप्त होण्याची कायदेशीर कारवाई सुरू होऊ शकते.
वाचाः तुमच्या महाराष्ट्रात चाललंय काय? असं लोक मला विचारतात: पंकजा मुंडे
दरम्यान, परमबीर सिंह यांच्याविरोधातील कारवाईला आता धार आली आहे. परमबीर सिंह यांना फरार घोषित करणारा न्यायालयाचा आदेश त्यांच्या जुहू येथील फ्लॅटबाहेर चिकटवण्यात आला आहे. तसेच पोलीसांनी परमबीर सिंग यांना ३० दिवसांत हजर राहण्याचे आदेश दिले आहेत.
काय आहे आरोप?
परमबीर यांच्यासह बडतर्फ पोलिस अधिकारी सचिन वाझे आणि रियाज भाटी व विनय सिंह यांनी गोरेगावमधील हॉटेल व्यावसायिक बिमल अग्रवाल यांना त्यांचे बोहो रेस्टॉरंट आणि बीसीबी रेस्टॉरंट अँड बार हे निर्विघ्नपणे सुरू राहायचे असल्यास खंडणी द्यावी लागेल, असे धमकावले. तसेच त्यांच्याकडून नऊ लाख रुपयांची खंडणी वसूल करण्यासह दोन लाख ९२ हजार रुपये मूल्याचे दोन स्मार्टफोनही उकळले, असा आरोप परमबीर सिंह यांच्यावर आहे.
वाचाः नवाब मलिकांनी शेअर केलेले ते चॅट बनावट?; क्रांती रेडकरने केला खुलासा
अटकेपासून संरक्षण
रमबीर सिंह यांना त्यांच्याविरोधात दाखल असलेल्या गुन्ह्यांप्रकरणी अटकेपासून संरक्षण मिळाले आहे. सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी त्यांना अटक करण्यास मनाई करणारा आदेश दिला. तसेच या काळात परमबीर यांनी चौकशीस सामोरे जावे. मात्र, पोलिसांनी त्यांना अटक करू नये, असे खंडपीठाने म्हटले आहे.
वाचाः तुमच्या महाराष्ट्रात चाललंय काय? असं लोक मला विचारतात: पंकजा मुंडे
दरम्यान, परमबीर सिंह यांच्याविरोधातील कारवाईला आता धार आली आहे. परमबीर सिंह यांना फरार घोषित करणारा न्यायालयाचा आदेश त्यांच्या जुहू येथील फ्लॅटबाहेर चिकटवण्यात आला आहे. तसेच पोलीसांनी परमबीर सिंग यांना ३० दिवसांत हजर राहण्याचे आदेश दिले आहेत.
काय आहे आरोप?
परमबीर यांच्यासह बडतर्फ पोलिस अधिकारी सचिन वाझे आणि रियाज भाटी व विनय सिंह यांनी गोरेगावमधील हॉटेल व्यावसायिक बिमल अग्रवाल यांना त्यांचे बोहो रेस्टॉरंट आणि बीसीबी रेस्टॉरंट अँड बार हे निर्विघ्नपणे सुरू राहायचे असल्यास खंडणी द्यावी लागेल, असे धमकावले. तसेच त्यांच्याकडून नऊ लाख रुपयांची खंडणी वसूल करण्यासह दोन लाख ९२ हजार रुपये मूल्याचे दोन स्मार्टफोनही उकळले, असा आरोप परमबीर सिंह यांच्यावर आहे.
वाचाः नवाब मलिकांनी शेअर केलेले ते चॅट बनावट?; क्रांती रेडकरने केला खुलासा
अटकेपासून संरक्षण
रमबीर सिंह यांना त्यांच्याविरोधात दाखल असलेल्या गुन्ह्यांप्रकरणी अटकेपासून संरक्षण मिळाले आहे. सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी त्यांना अटक करण्यास मनाई करणारा आदेश दिला. तसेच या काळात परमबीर यांनी चौकशीस सामोरे जावे. मात्र, पोलिसांनी त्यांना अटक करू नये, असे खंडपीठाने म्हटले आहे.