अ‍ॅपशहर

मुंबई: महापालिका शाळेत औषधातून विषबाधा

महापालिकेच्या आरोग्य केंद्रातून दिल्या जाणाऱ्या औषधांतून विषबाधा होऊन गोवंडीतील शाळेत एका विद्यार्थिनीचा मृत्यू झाला आहे. तर, शाळेतील इतर १४० विद्यार्थ्यांना उपचारासाठी राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 10 Aug 2018, 3:16 pm
मुंबई:
महाराष्ट्र टाइम्स.कॉम Govandi


महापालिकेच्या आरोग्य केंद्रातून दिल्या जाणाऱ्या औषधांतून विषबाधा होऊन गोवंडीतील एका महापालिका शाळेतील १४० विद्यार्थ्यांना विषबाधा झाली आहे. त्यातील एका विद्यार्थिनीचा मृत्यू झाला आहे. तर, इतर विद्यार्थ्यांना उपचारासाठी राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

गोवंडीच्या संजय नगर येथील उर्दू माध्यमाच्या शाळेत ही घटना घडली. यात १२ वर्षांच्या चाँदनी साहिल शेख या विद्यार्थिनीचा मृत्यू झाला. या शाळेतील विद्यार्थ्यांना कॅल्शियम तसंच, रक्तवाढीची औषधं दिली जात होती. सहा ऑगस्ट रोजी ही औषधं देण्यात आली होती. या औषधांची रिअॅक्शन झाल्याचं बोललं जातंय. मृत विद्यार्थिनी चाँदनी हिला टीबी होता, असंही आता सांगितलं जात आहे. या प्रकारामुळं गोवंडीतील पालकांमध्ये चिंतेचं वातावरण आहे. या घटनेची चौकशी करावी अशी मागणी केली जात आहे.

विषबाधा नेमकी कशामुळं?

शाळेत खिचडी खाल्ल्यानंतर ही गोळी घ्यायची असते. त्यामुळं विषबाधा नेमकी कशामुळं झाली? गोळ्यांमुळं की खिचडीमुळं याविषयी संभ्रम आहे. गोळ्यांची पाकिटं ताब्यात घेऊन उपायुक्तांमार्फत चौकशी केली जावी, अशी मागणी नगरसेवक रईस शेख यांनी केली आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज